एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचं कर्ज

शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) तारणमुक्त कर्जाची रक्कम 2 लाख रुपये केली आहे. वाढीचा हा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.

Reserve Bank of India : शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) तारणमुक्त कर्जाची रक्कम 2 लाख रुपये केली आहे. वाढीचा हा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. विशेष बाब म्हणजे या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणतही तारण न ठेवता 2 लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे. यापूर्वी 1.60 लाख रुपयांचे कर्ज मिळत होते. या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येतही वाढ होणार आहे. दरम्यान, याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी बँकांना मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने शेतकऱ्यांसाठी कोणतेही तारण न घेता कर्ज मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये केली आहे, जी 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार

भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्जाचा सहज प्रवेश सुलभ होणार आहे. सरकारच्या सुधारित व्याज सवलत योजनेला पूरक ठरेल, जी 4 टक्के प्रभावी व्याज दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. या उपक्रमाकडे कृषी क्षेत्रातील आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांना कृषी कार्यात गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्या अनेक खाजगी क्षेत्रातील बँका कर्जावर 8 टक्के ते 12 टक्के व्याजदर आकारत आहेत. RBI च्या या निर्णयामुळं बँकांच्या जाळ्यात अडकण्यापासून शेतकरी वाचतील.

नवीन वर्षात RBI घेणार मोठा निर्णय

नवीन वर्षात कर्जदारांना आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. कारण नवीन वर्षात व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे.  RBI ने सलग अकराव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही. तज्ज्ञांच्या मते व्याजदर कपातीचा निर्णय 2025 च्या सुरुवातीला होण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून महागाईचा दर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, नवीन वर्षात महागाईचा दर कमी होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय. त्यामुळं महागाईचा दर कमी आल्यास व्याजदरात देखील कपात होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

महत्वाच्या बातम्या:

नवीन वर्षात RBI घेणार मोठा निर्णय? सामान्य नोकरदारांना अच्छे दिन येणार? जाणून घ्या सविस्तर माहिती 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आता सोन्याच्या खरेदीवर मर्यादा, सरकारनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन नियमासंदर्भात माहिती
मोठी बातमी! आता सोन्याच्या खरेदीवर मर्यादा, सरकारनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन नियमासंदर्भात माहिती
बीडमध्ये बस प्रवासात महिलेच्या जवळील 15 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; महिलेचा आक्राोश, पोलिसांकडून तपास सुरु
बीडमध्ये बस प्रवासात महिलेच्या जवळील 15 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; महिलेचा आक्राोश, पोलिसांकडून तपास सुरु
Gautam Adani Case : अमेरिका गौतम अदानींवरील आरोप मागे घेण्याच्या तयारीत? अमेरिकन माध्यमांमधून मोठा दावा
अमेरिका गौतम अदानींवरील आरोप मागे घेण्याच्या तयारीत? अमेरिकन माध्यमांमधून मोठा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला गोएंका ग्रुपचा प्रतिसाद, कंपनीनं घेतला मोठा निर्णय, नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला गोएंका ग्रुपचा प्रतिसाद, कंपनीनं घेतला मोठा निर्णय, नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी 

व्हिडीओ

Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
Embed widget