एक्स्प्लोर

ब्रिटनमधून भारतात आलं तब्बल 100 टन सोनं, आरबीआयने घेतला मोठा निर्णय!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ब्रिटनमध्ये असलेले 100 टन सोने भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे सोने आता भारतात येणार आहे.

मुंबई : जागतिक पातळीवरील स्थिती पाहता वेगवेगळे देश सोन्याच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. भारताची मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह सोन्याची खरेदी केली जात आहे. भारताने ब्रिटनमध्ये सोने ठेवले होते. हेच 100 टन सोने आता भारतात आणण्यात आले आहे. 33 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या तिजोरीत एवढे सारे सोने जमा केले आहे. आता भारताने खरेदी केलेले सोने ब्रिटनच्या तिजोरीत राहणार नाही. आता हेच सोने रिझर्व्ह बँकेच्या वॉलेट्समध्ये ठेवण्यात आले आहे.  

भारताचं 413.8 टन सोनं विदेशात

मिळालेल्या माहितीनुसार मार्चच्या शेवटपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे 822.1 टन सोनं होतं. यातील साधारण 413.8 टन सोनं बँकेने विदेशात ठेवले होते. याआधीच्या आर्थिक वर्षात आरबीआयने नव्याने 27.5 टन सोन्याची खरेदी केली होती. 

भारत सोन्याची खरेदी नेमकं का करत आहे? (Why India Purchasing Gold)

भारताने अनेक टन सोनं विदेशात ठेवलं आहे. आता हेच सोनं रिझर्व्ह बँक आपल्या देशात परत आणत आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत व्हावी म्हणून हा निर्णय घेतला जातोय. भारताच्या तिजोरीतील सोन्याची वाढ व्हावी आणि या सोन्याचा उपयोग भारतासाठीच व्हायला हवा, असा यामागचा उद्देश आहे. 

आरबीआयजवळ किती सोनं आहे? 

मार्च महिन्यापर्यंत RBI कडे एकूण 822.11 टन सोने आहे. यातील 413.8 टन सोनं हे विदेशात ठेवण्यात आलंय. याआधीच्या आर्थिक वर्षात RBI ने साधारण 27.5 टन सोन्याची खरेदी केली होती. भविष्यातही आणखी सोनं खरेदी करण्याचा आबरीआयचा कल आहे. 2023 सालाच्या तुलनेत RBI ने केवळ जानेवारी-मार्च या काळात साधारण दुप्पट सोन्याची खरेदी केली आहे. देश कठीण काळातून जात असेल किंवा काही आव्हान निर्माण झाल्यास या सोन्याची मदत होईल, असा यामागचा उद्देश आहे.

सोनं ब्रिटनहून भारतात 

जगभरातील अनेक देश ब्रिटनच्या बँक ऑफ इंग्लंड या बँकेत सोनं ठेवतात. त्यासाठी या देशांना ब्रिटनच्या बँकेला पैसेदेखील द्यावे लागतात. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीपासून भारताचे काही सोने ब्रिटनकडे आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार आरबीआयने गेल्या काही वर्षांपासून सोन्याची खरेदी चालू केली आहे. त्यामुळे खरेदी केलेले सोने कोठे ठेवायचे, यावर सरकारकडून विचार केला जातोय. खरेदी केलेल्या सोन्यापैकी काही सोनं हे विदेशात ठेवलं जात होतं, त्यामुळे ते भारतात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकारला 1991 साली संकटकाळात सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget