एक्स्प्लोर

2047 मध्येही भारत गरीबच राहणार का? RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं भाकित काय? 

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी 2047 मध्ये भारताच्या आर्थिक स्थितीबाबत भाकीत व्यक्त केले आहे.

Raghuram Rajan : 2047 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील. अलीकडेच भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत  ( Indian Economy)अनेक अंदाज समोर आले आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था अनेक पटींनी मोठी होईल. भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा देशाची अर्थव्यवस्था फक्त टॉप-3 मध्येच समाविष्ट होणार नाही, तर भारत चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय. अशातच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी 2047 मध्ये भारताच्या आर्थिक स्थितीबाबत भाकीत व्यक्त केले आहे. रघुराम राजन यांनी 2047 मध्येही भारत गरीब राहण्याची भीती व्यक्त केली आहे.

6 टक्के वार्षिक वाढीनंतरही भीती

रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनीही 2047 मध्ये भारताची आर्थिक स्थिती कशी असेल यावर आपले मत मांडले आहे. रघुराम राजन यांना 2047 मध्ये भारत गरीब राहण्याची भीती वाटत आहे. भारताचा आर्थिक विकास दर वार्षिक 6 टक्के राहिला, तर 2047 पर्यंत लोकसंख्या वाढली नाही, तरी भारत कमी मध्यम उत्पन्न असलेला देश राहील असे भाकित रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. भारत श्रीमंत होण्यापूर्वी म्हातारा होण्याचा धोका आहे. म्हणजे वृद्ध लोकांच्या संख्येत वाढ होत असल्याच राजन म्हणाले.  वृद्ध लोकसंख्येची काळजी घेण्यासाठी अर्थव्यवस्थेवर दबाव येईल असेही राजन म्हणाले.

डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय?

डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे भारताला सध्या लोकसंख्येच्या परिस्थितीतून मिळणारे फायदे. जरी भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला असला, तरीही प्रचंड लोकसंख्या देशासाठी समस्या होण्याऐवजी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. याचे कारण लोकसंख्येचा मोठा भाग तरुण आहे. भारत हा सध्या तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला देश आहे. यामुळे भारताला उत्कृष्ट कार्यशक्तीचा लाभ मिळत आहे. लोकसंख्येचे सरासरी वय जसजसे वाढते तसतसा हा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश कमी होतो.

रघुराम राजन यांनी असं मांडल गणित

राजन यांच्या म्हणण्यानुसार, 6 टक्के आर्थिक वाढीसह दरडोई उत्पन्न दर 12 वर्षांनी दुप्पट होते. अशा स्थितीत पुढील 24 वर्षांत दरडोई उत्पन्न आताच्या 4 पट असेल. सध्या भारताचे दरडोई उत्पन्न 2,500 डॉलर पेक्षा थोडे कमी आहे. अशा स्थितीत भारताचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत 10 हजार डॉलरपेक्षा कमी राहील. म्हणजे आपण कमी मध्यम उत्पन्न असलेला देश राहू असे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय अर्थव्यवस्था चमत्कारांवर अवलंबून, असं का म्हणाले रघुराम राजन?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi News : साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
Ahilyanagar News : 'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Diksha Bhumi Nagpur :  पंतप्रधान मोदींकडून संघाच्या स्मृती मंदिरासह दिक्षाभूमीला वंदनABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10AM 30 March 2025PM Narendra Modi Nagpur Reshim Bagh :  पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील रेशीम बागेत, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीला केलं अभिवादनPM Narendra Modi Nagpur :  मोदी नागपुरातील रेशीम बागेत, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi News : साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
Ahilyanagar News : 'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
Nashik Crime : हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
Embed widget