By: एबीपी ब्युरो | Updated at : 12 Feb 2024 11:06 AM (IST)
Sovereign Gold Bond 4th Series ( Image Source : Getty )
Sovereign Gold Bond 4th Series: नवी दिल्ली : आधीपासूनच महागाईन पिचलेला सर्वसामान्य माणूस वाढलेल्या सोन्याच्या किमतींनीसुद्धा हैराण झाला आहे. तरीदेखील तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तर स्वस्तात सोनं खरेदी करण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. ही संधी म्हणजे, सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond). रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड (Gold Bond) योजनेची चौथी सीरिज (Sovereign Gold Bond 4th Series) आजपासून सुरू होत आहे. या योजनेतंर्गत केंद्र सरकार बाजारभावापेक्षा कमी किमतीत शुद्ध सोनं विकतं. या योजनेंतर्गत सोनं खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी करता येतंच, पण त्यासोबतच मोठा परतावाही मिळतो. केंद्र सरकारची योजना गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून उत्तम पर्याय ठरते.
सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजना 16 फेब्रुवारीपर्यंत खुली राहील म्हणजेच, तुमच्याकडे स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे फक्त 5 दिवसांसाठीच आहे. यापूर्वी, आर्थिक वर्ष 2023-24 साठी सॉव्हरिन गोल्ड बॉन्डचा (SGB Scheme) तिसरा हप्ता गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता, जो 22 डिसेंबरपर्यंत सुरू होती. या योजनेंतर्गत सरकारमार्फत विकलं जाणारं सोनं हे कागदी सोनं किंवा डिजिटल सोन्याचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही किती प्रमाणात सोनं कोणत्या दरानं खरेदी करत आहात याचं प्रमाणपत्र दिलं जातं. हे डिजिटल सोनं खरेदी करून उत्तम परतावा तुम्ही मिळवू शकता.
सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेच्या चौथ्या टप्प्याची इश्यू प्राईज 6,263 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, बाजारापेक्षा कमी किमतींत तुम्ही येथून सोनं खरेदी करून गुंतवणूक करू शकता. एवढंच नाही तर तुम्ही यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास प्रति ग्रॅम 50 रुपये अतिरिक्त सूटही दिली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेतील (Sovereign Gold Bond Scheme) गुंतवणुकीचा मॅच्युरिटी पीरियड 8 वर्ष आहे. सरकारनं नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना सुरू केली आणि आतापर्यंत गेल्या 8 वर्षांत ज्या गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना 12.9 टक्के इतका उत्कृष्ट परतावा मिळाला आहे.
सोन्याची मागणी कमी करण्याच्या उद्देशानं सरकारनं ही सरकारी गोल्ड बॉन्ड योजना सुरू केली होती. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सरकार सुरक्षिततेची हमी देतं. गुंतवणूकदार हे डिजिटल सोनं रोखीनं देखील खरेदी करू शकतात आणि त्यांना खरेदी केलेल्या सोन्याच्या रकमेइतक्या मूल्याचे सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड जारी केले जातात. जरी त्याचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्ष असला तरी तुम्ही 5 वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय निवडू शकता. सॉव्हरिन गोल्ड बॉन्डमध्ये तुम्ही 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता.
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून चालवण्यात येतं, त्यामुळे ही सरकारी योजना असून यामध्ये सुरक्षेची हमी मिळते. या योजनेअंतर्गत तुम्ही एका वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोनं खरेदी करू शकता. तर ट्रस्ट आणि संस्था एका वर्षात 20 किलो सोने खरेदी करू शकतात.
तुम्ही ऑनलाईन माध्यमातून सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला सोन्याच्या किमतींमध्ये प्रति ग्रॅम 50 रुपये अतिरिक्त सूट मिळते. सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेअंतर्गत, तुम्ही एकूण आठ वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक करू शकता. महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही पाच वर्षांनंतर या योजनेतून बाहेर पडू शकता, तुम्हाला हा पर्याय देखील उपलब्ध आहे. 2015 मध्ये केंद्र सरकारने नोव्हेंबर सर्वात पहिल्यांदा सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये (SGB) गुंतवणूक केल्याने तुम्हाला प्रतिवर्ष 2.50 टक्के व्याजदराचा लाभ देखील मिळतो. हा व्याज दर सहामाही आधारित असतो.
इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड
1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे
Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य