एक्स्प्लोर

भारत-पाकिस्तानचा व्यापार किती? प्रत्येक भारतीयांच्या घरात 'या' आहेत पाकिस्तानी वस्तू

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशादरम्यान मोठा व्यापार होतो. पाकिस्तानमधील अनेक वस्तू भारतीय लोक वापरतात.

India pakistan trade : उद्या (14 ऑक्टोंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना (india pakistan Match) होणार आहे. याकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. हा सामना प्रेक्षकांच्या संख्येचे सर्व विक्रमही मोडेल अशी शक्यता आहे. या सामन्यादरम्यान कोट्यवधी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज आपण दोन्ही देशांमधील व्यापाराबद्दल माहिती पाहणार आहोत. विशेषत: पाकिस्तानमध्ये ज्या वस्तू तयार होतात त्या भारतातील प्रत्येक घरात वापरल्या जातात. पाकिस्तानकडे अशा काही गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक भारतीयांच्या घरात वापरल्या जातात. भारतातील लोकांना पाकिस्तानचा कोणता माल आवडतो आणि दोन्ही देशांमध्ये किती व्यापार चालतो याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. 

एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये 11 हजार कोटी रुपयांचा म्हणजेच 1.35 अब्ज डॉलरचा व्यापार झाला आहे. तर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये हा व्यवसाय 516.36 दशलक्ष डॉलर्स होता. तर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये हा व्यवसाय 329.26 दशलक्ष डॉलर्स होता. मोठ्या प्रमाणावर दोन्ही देशांमध्ये व्यापार होतो. पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या अनेक वस्तू भारतामध्ये वापरल्या जातात. 

पाकिस्तानातील 'या' वस्तू भारतात वापरल्या जातात

बिनानी सिमेंटचे नाव तुम्हाला माहित असेल. भारतात विकले जाणारे हे सिमेंट पाकिस्तानमध्ये तयार होते. विशेष बाब म्हणजे भारतात उपवासासाठी वापरण्यात येणारे मीठही पाकिस्तानातून आयात केले जाते. त्याची भारतात मोठ्या प्रमाणात विक्री होते. तसेच मुलतानी माती देशातील प्रत्येक घरात उपलब्ध आहे. नावाप्रमाणेच ते पाकिस्तानमधूनही आयात केली जाते. ही माती सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरली जाते. बरेच लोक याचा वापर फेस पेस्ट म्हणून करतात.

कुर्त्यापासून ते चप्पलपर्यंत पाकिस्तानच्या वस्तू भारतात

भारत पाकिस्तानकडून कुर्त्यापासून चप्पलपर्यंत सर्व काही आयात करतो. लाहोरचा कुर्ता आणि पेशावरी चप्पल भारतातील लोकांना खूप आवडतात. ज्या भारतात मोठ्या प्रमाणात आयात केल्या जातात. त्याचबरोबर साखरेपासून बनवलेल्या कन्फेक्शनरीशी संबंधित काही उत्पादने केवळ पाकिस्तानमधून येतात. भारतही पाकिस्तानातून कापूस आयात करतो. काही वैद्यकीय उपकरणे आणि चष्म्यांमध्ये वापरले जाणारे ऑप्टिक्सही पाकिस्तानमधून आयात केले जातात. भारत पाकिस्तानमधून चामड्याच्या वस्तू मोठ्या प्रमामात आयात करतो.

11 हजार कोटींहून अधिक उलाढाल

वर्षाच्या सुरुवातीला सरकारकडून संसदेत माहिती देण्यात आली होती की पाकिस्तान आणि भारतामध्ये किती व्यापार होतो? भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार अधिकृतपणे बंद असला तरीही, त्यानंतर एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 या काळात दोन्ही देशांमध्ये 11 हजार कोटी रुपयांचा म्हणजेच 1.35 अब्ज डॉलरचा व्यापार झाला आहे. तर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये हा व्यवसाय 516.36 दशलक्ष डॉलर्स होता. तर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये हा व्यवसाय 329.26 दशलक्ष डॉलर्स होता. भारताने जम्मू-काश्मीरमधून ज्यावेळी कलम 370 हटवले होते त्यावेळी पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार बंद केला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

IND vs PAK Preview: महामुकाबल्यात भारताचे पारडे जड, पाहा सामन्याआधी दोन्ही संघाचे विश्लेषण

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget