एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीत एक अट राज्यातील जिल्हा सहकारी बँकांची यंत्रणा टिकवण्यासाठी ठेवल्याचं म्हटलं.

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 12 वर्ष पंतप्रधान पदाची कारकिर्द पूर्ण केलीय. हे करत असताना 4 हजार 398 दिवस हा लाॅगेस्ट इलेक्टेड पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम मोडला. या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीसंदर्भात माहिती दिली आहे. 

कर्जमाफीत फक्त एक अट

कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्थी आम्ही टाकलेल्या नाहीत. एकच अट आम्ही टाकलेली आहे ती महाराष्ट्रातील बँकिंग यंत्रणा आहे, त्यातल्या त्यात जिल्हा सहकारी बँका टिकल्या पाहिजेत, यासाठी ती अट टाकली आहे. ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे, त्यांच्याकरता आम्ही यावेळी माफी करणार आहोत. मात्र, ती एका फिक्स रकमेपर्यंत त्यांची माफी करणार आहोत, उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. अन्यथा आपली बँकिंग यंत्रणा पूर्णपणे उद्धवस्त होईल. 

बाकी 40 लाख शेतकऱ्यांना विना अट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आम्ही कर्जमाफी संदर्भात एक उपसमिती तयार केलीली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर काही मंत्र्यांचा त्यात समावेश असेल. ही कर्जमाफी जशी पुढं जाईल त्यातील अडचणी समोर येतील, त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी या उपसमितीची असेल. कुठल्याही निवडणुका समोर नसताना ही कर्जमाफी केलेली आहे. विरोधी पक्षांनी कोणतीही ठोस मागणी न करता केलेली कर्जमाफी आहे. शासनानं स्वत: केलेली कर्जमाफी आहे. आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही, आपल्या शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल. अन्यथा 2029 ची निवडणूक असल्यानं डिसेंबर 2028 ला कर्जमाफी करता आली असती,ते आम्ही केलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.   

आज राज्यात अनेक शेतकरी असे आहेत आपला माल निर्यात करत आहेत. अनेक शेतकरी असे आहेत जे शेतीत परिवर्तन करत माॅडेल शेती तयार करत आहेत. शेतीला फायद्यात आणत आहेत. मात्र  गरीब शेतकऱ्यांना मदत करावी लागेल आणि सक्षम करावं लागेल. सरकार ते करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. याशिवाय वित्त विभागासंदर्भात बोलायचं तर आता तरी अर्थ विभाग माझ्याकडेच आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  

शेतकऱ्यांनी सरकारच्या सूचनांचा वापर करावा

एल निनोसंदर्भात आपण तयारी करत आहोत.  राज्यावर त्याचा परिणाम होईल आणि टास्कफोर्स आपण तयार केला आहे. जलसंधारणावर आपण भर दिला आहे. पाऊस कमी असला तरी आपण मार्ग काढूयात. राज्य सरकारच्या सल्ल्याच्या आधारे पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, ॲडव्हायजरीकडे लक्ष द्यावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget