एक्स्प्लोर

'तोंडी तलाक'ला आता न्यायाची प्रतिक्षा

‘तोंडी तलाक’, ‘ट्रीपल तलाक’, ‘त्रिवार तलाक’ असे अनेक शब्द गेल्या अनेक दिवसांपासून कानावर पडतायेत. मुस्लिम महिलांसाठी जाचक आणि त्यांचा ‘मानवी हक्क’ हिरावून घेणारी ही प्रथा तशी अनेक दिवसांपासून आस्तित्त्वात आहे. मात्र, भारतीय संविधानातील मानवी हक्काची पायमल्ली करणारा हा कायदा कितपत लोकांच्या पचनी पडतो? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तीनदा ‘तलाक’ ‘तलाक’ ‘तलाक’ बोललो की, झाला तलाक. झालो विभक्त कायमचे. यावेळी हा पती-पत्नीचा संसार 40 वर्षाचा असू द्या किंवा मग 1-2 दिवसांचा. यानंतर तसा पती या सगळ्या जाचातून मुक्त होतो. कारण तलाक देण्याचा अधिकार हा फक्त पतीला आहे. शिवाय मुलं सांभाळण्याचा अधिकारसुद्धा तो बायकोवर सोपवून देतो आणि दुसऱ्या लग्नासाठी तयार होतो. या सगळ्यात मात्र बायकोची फसगत होते. कारण नवरा स्वीकारत नाही त्यामुळे बायको आपल्या मुलाबाळांसोबत रस्त्यावर येते. ‘कुरआन’मध्ये विवाहाला ‘मीसाक-ए-गलीज़’ (मजबूत समझौता) असं म्हटलं आहे. त्यामुळे हा करार पती-पत्नीच जोपर्यंत पटतं तोपर्येंत राहतो. एकदा का पती-पत्नीचे संसारात भांडणं, खटके उडायला सुरू झाले, की मग हा करार कायमचा मोडायला पती तयार असतो. मात्र, यावेळी मुस्लिम प्रथेत तलाकचा अधिकार जसा पुरूषाला आहे, तसा महिलेला पण आहे. मुळात तलाकचे इस्लाममध्ये चार प्रकार आहे. तलाक, तफवीज़-ए-तलाक़, खुलअ आणि फ़स्ख़-ए-निकाह. यामध्ये तफवीज़-ए-तलाक़, खुलअ आणि फ़स्ख़-ए-निकाह या चार प्रकारात पत्नी पतीला आपल्या मर्जीने तलाक देऊ शकते. आता नेमके काय आहेत हे प्रकार - तफवीज़-ए-तलाक़- यामध्ये पत्नी आपल्या पतीला तलाक देऊ शकते. यात महत्वाचं म्हणजे हा तलाक पत्नीने स्वतःहून देण्याचा अधिकार पतीने पत्नीला द्यायला हवा. तरच, हा तलाक होऊ शकतो. कारण, हा अधिकार फक्त पती आपल्या पत्नीला देऊ शकतो. या तलाकमध्ये पत्नी मुस्लिम अदालतमध्ये मुस्लिम काझीच्या मदतीने हा तलाक घेऊ शकते. यामध्ये तलाक देण्याचं कारण पत्नीला काझींना द्याव लागत. काझी या कारणांची पडताळणी करतो आणि त्यानंतर यावर निर्णय होतो. ख़ुलअ- यामध्ये पत्नी लग्नानंतर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही असं जेव्हा पत्नीला वाटतं. तेव्हा हा तलाक ती घेऊ शकते. यामध्ये सुध्दा तलाक देण्याआधी महर म्हणजे लग्नानंतर पती कडून पत्नीने घेतलेली रक्कम पतीला वापस करावी लागते फ़स्ख़-ए-निकाह- या तलाकमध्ये पत्नी मुस्लिम अदालतमध्ये मुस्लिम काझीच्या मदतीने हा तलाक घेऊ शकते. यामध्ये तलाक देण्याचं कारण पत्नीला काझींना द्याव लागत. यामध्ये पती पैसे कमवत नाही, जबरदस्ती करतो, पती हरवला आहे, पतीला मानसिक आजार आहे. अशा कारणांची मग काझी पडताळणी करतात आणि त्यानंतर यावर निर्णय होतो. तलाक़- सर्व वाद या प्रकारामुळे आहे. कारण यामध्ये पतीला तलाक देण्याचा अधिकार इस्लाम मध्ये देण्यात आला आहे. खरं तर फक्त हेच तलाक देण्याचे मार्ग इस्लाम धर्मात नाहीत. याशिवाय, इस्लाममध्ये तीन अजून मार्ग आहेत. ते म्हणजे, तलाक-ए-हसन, तलाक-ए-अहसन आणि तलाक-ए-बिद्अत. खरं तर ‘तलाक’ ‘तलाक’ ‘तलाक’ चा जन्म तलाक-ए-बिद्अत मधून झाला. खरं तर तलाक-ए-हसन, तलाक-ए-अहसन ह्या तलाक देण्याच्या योग्य प्रकाराला शिय्या-सुन्नी मुस्लिमांचा विरोध आहे. तलाक-ए-बिअद्त मध्ये जर कोणी पती पत्नीला तोंडी ‘तलाक’ ‘तलाक’ ‘तलाक’ बोलला तरी तो तलाक मानला जातो. यानंतर पती, पत्नी कधीच एकत्र राहू शकत नाही, हा तलाक ते मागे घेऊ शकत नाही किंवा मग ते पुन्हा एकमेकांशी लग्न करू शकत नाही. आता जर इस्लामी शरीअतमध्ये (मुस्लिम पर्सनल लॉ) जर तलाक बाबत असा नियम तयार केलेला असेल, तर या नियमांमध्ये छेडछाड होऊ शकते का ?  हा प्रश्न आहे. तर आपण शरीअतमधील नियमांमध्ये छेडछाड करू शकतो. मात्र, हदिस किंवा कुरआनमध्ये करू शकत नाही. शरीअतमध्ये नियम करतांना हदिस आणि कुरआनचा उपयोग करून मानवाने हे नियम तयार केले. आता दुसरीकडे इस्लाम धर्मात मानवाला चुकीचा पुतळा सांगितलं गेलयं. त्यामुळे सहाजिकच, शरीअत तयार करताना मानवाकडून जर चूक झाली असेल, ती सुधारली जाऊ शकते. म्हणजेच, शरिअतमध्ये(मुस्लिम पर्सनल लॉ) मध्ये आपण बदल करू शकतो. आता जर या तीन तलाकमध्ये ज्या महिलांचे शोषण झाले, त्या महिलांशी आपण या बाबत चर्चा केली, तर या प्रथेमुळे कितेक महिलांचे संसार, आयुष्य उध्दवस्त झाल्याच दिसून आलं. यामध्ये कोणाला व्हॉटस् अपवर पतीकडून तीन तलाक देण्यात आला, तर कोणाला झोपेत असताना पतीने तोंडी तलाक दिला. एका तीन तलाकच्या चर्चासत्रात जेव्हा या प्रथेमुळे पिडीत सर्व महिला एकत्र आल्या तेव्हा अनेकांनी याबाबच विरोध दर्शवतांना आपल्या कैफियत मांडल्या. एका मुस्लिम महिलेशी पतीने विवाह करून घरी आणल्यानंतर तिला कऴालं कि, आपल्या पतीचं अगोदरचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे ती तिच्या पतीसोबत राहायला तयार नव्हती. मात्र, तलाक पती देत नव्हता, उलट तलाक न देता तिच्या जबरदस्ती करायचा. याच चर्चासत्रात एका महिला सांगते, ‘माझे लग्न माझ्या घरच्यांनी मौलवीशी लावून दिले. त्यांनी मला लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी तोंडी तलाक दिला. आता मला 6 महिण्याची मुलगी आहे. मी कुठे जाऊ ?, या मुलीला तुझ्या वडिलांनी का सोडले ? याचं काय कारण सांगू’ . कोणाला 6 महिण्याच मुलं आहे तर कोणाला 10 वर्षाचं. आता हे मुल घेऊन या मुस्लिम महिला या अनिष्ट प्रथेविरूध्द दाद मागायला निघाल्या आहेत. ज्या मुस्लिम महिला शिकल्यासवरल्या आहेत, त्या कुठे ना कुठे काम करून आपल्या आणि आपल्या मुलाचा उदर्निवाह करत आहेत. मात्र, ज्या शिकलेल्या नाहीत त्या आपल्या उदर्निवाहासाठी अजूनही भटकत आहेत. यात सगळं पाहिलं तर याचं काडीचही दु:ख त्यांना तीन तलाक दिलेल्या पतींना नाही. या कायद्याबाबत वाद हायकोर्टात अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण येत्या काही दिवसात या प्रथेबाबत लवकरच ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाकडून लागेल. हा निर्णय यासाठी ऐतिहासिक असेल, कारण यामध्ये एका धर्माची प्रथा म्हणजेच मानवाने धर्मासाठी तयार केलेले नियम महत्वाचे ठरतात? का मग देशाच्या संविधानाने दिलेला समान मानवी अधिकार ? हा निर्णय लागेल. निर्णय कोणाच्याही बाजूने लागेल, मात्र इतके दिवस पती असून सुद्धा जबरदस्ती तलाक मिळालेल्या महिला, वडिलांचे जिवंतपणी छत्र हरवलेले मुलंबाळं यांना हा निर्णय कितपत न्याय मिळून देईल ? हा सर्वांसमोर अजूनही मोठा प्रश्न आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Embed widget