एक्स्प्लोर

हृदयविकाराचा धक्का बसतो तेव्हा फार दुखतं का हो?

रानात भाकर घेऊन बोलवणार म्हणून एवढं रागावतात का गं कुणी? ऑ? तू भाकर घेऊन रानात नको येऊ गं, तसा मीही राहात नाही गावाकडं. तू नुसतं राहायला हवं होतं मी असेपर्यंत तरी.

ठिगळाची खाकी चड्डी, विविध रंगांच्या बटणांचा पांढरा शर्ट आणि टोकं चुरगळलेली जवळपास गोल झालेली टोपी सांभाळत शाळेतून घरी येताना पोरं म्हणाली “आज पाटलाच्या वाड्यासमोर व्हिडीववर चांदणी पिच्चर हाय” ‘आविष्यातला पयला पिच्चर’ बघणार होतो. घराच्या दारातनंच महाबीज बियाण्याच्या पिशवीचं बनवलेलं दफ्तर फेकून पाटलाच्या वाड्यासमोर गेलो. तिथं कुणीच नव्हतं. गोळीपेंडीचं घमेलं घेऊन परड्यात गेलो. गायी-बैलांना पेंड घातली. परत घरी येताना मुद्दाम पाटल्याच्या वाड्याम्होरनं चक्कर मारली. एक लोखंडी बॅरल ठेवला होता. त्यावर पोतं श्रीदेवीच्या स्वागताला..! कोण श्रीदेवी माहित नव्हतं, पोरं म्हणत होती म्हणून कळलं होतं श्रीदेवी नावाच्या हिरॉईनचा पिच्चर. ज्वारीची भाकरी-काळ्या घेवड्याचं कालवण खाऊन चड्डीला हात पुसत पाटलाच्या वाड्यासमोर पयल्या रांगेत फतकाल मांडलं. व्हिडीववाल्याचं कायतरी चाललं होतं. लाल-पांढऱ्या-पिवळ्या-काळ्या आणि कसल्याकसल्या रंगाच्या पट्ट्या होत्या टीव्हीवर. बाप्ये जमू लागले, पोरं तर आधीच येऊन बसली होती. घरातली भांड्याकुंड्यांची काम उरकून बाया जमू लागल्या. पिच्चर सुरु झाला... मध्यरात्री कधीतरी झोप लागली तिथंच. चांदणीSSS ओ मेरी चांदणीSSS अर्धमेल्या झोपेत गाणं डोक्यात घोळत होतं. झोप लागण्याआधी पाहिलेली श्रीदेवी मनात होतीच... तेव्हाच ठरलेलं, लग्न करायचं तर हिच्याशीच. मी रानात जाईन, ती डोक्यावर भाकर घेऊन येईल. अजून बरंच काय काय ठरवलं होतं. एक-दोन-चार-सहा-दहा वर्ष सरत होती. मी वयाने मोठा होत गेलो. श्रीदेवी तेवढीच राहात होती. तिनं तसंच राहावं वाटायचं मी मोठा होईपर्यंत. मग कळलं तिचं बोनी कपूर नामक इसमाशी लग्न झालं. हर किसी को नही मिलता, यहा प्यार जिंदगी मे... तेव्हा फार दु:ख झालं होतं, पण म्हटलं जाऊद्या, लग्न करूद्यात बोनी का फिनी कपूरशी. पिच्चरात अन् स्वप्नात दिसणारी श्रीदेवी काय त्यो बोनी-फिनी कपूर न्हेत न्हाय. श्रीदेवी अशी वर्षा-दोन वर्षातनं भेटायची पिच्चरातनं मला आणि मी तिला. बोनी कपूरशी लग्न केलं हे सोडलं तर बाईनं कधीच दु:ख नाही दिलं. मनात, कानांत आणि डोळ्यांत नेहमी साठत गेली आणि अचानक आज धक्का. हृदयविकाराने गेली बिचारी. रानात भाकर घेऊन बोलवणार म्हणून एवढं रागावतात का गं कुणी? ऑ? तू भाकर घेऊन रानात नको येऊ गं, तसा मीही राहात नाही गावाकडं. तू नुसतं राहायला हवं होतं मी असेपर्यंत तरी. नीट जा, पोहोचल्यावर फोन कर, बॅलन्स कमी असला तर मिस कॉल दे. मी करेन. हुश्श्श... हृदयविकाराचा धक्का बसतो तेव्हा फार दुखतं का हो?
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget