एक्स्प्लोर

BLOG | माणूस 'लॉक', कोरोना 'डाऊन'

संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आणि त्यात मुंबई-पुणे शहरात अधिक आहे. कोरोनाबाधितांचा सध्या आकडा बघून राज्यातील संपूर्ण लॉकडाऊन उठवावा अशी सकारात्मक परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आहे.

>> संतोष आंधळे

संपूर्ण जगात धुमशान घातलेल्या कोविड -19 म्हणजेच कोरोन व्हायरसला आळा घालण्याकरता लॉकडाऊनचा अवलंब पूर्ण देशात केला गेलाय. आता दुसरा देशव्यापी लॉकडाऊन संपण्यास पाच दिवस बाकी असताना, नागरिकांमध्ये लॉकडाऊन संपणार की चालू राहणार या चर्चेला उधाण आलंय. येत्या 3 मे रोजी देशात लॉकडाऊन लागू होऊन 40 दिवस होणार असले तरी म्हणावी तितकी कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. किंबहुना रुग्ण संख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढच झाली आहे. वास्तवात या लॉकडाऊनचा परिणाम एकंदरच सर्व मानवी जीवनावर झाला असून प्रत्येकजण याची झळ सोसत आहे. मात्र सरकारला लॉकडाऊन ठेवण्यात स्वारस्य नसून केवळ नागरिकांच्या आरोग्याच्या हिताकरिता शासन परिस्थिती बघून निर्णय घेत असते. त्यामुळे या लॉकडाऊन विषयी विचार करताना, अगोदर आपण निरोगी कसे, राहू उत्तम आयुष्य कसे जगू याचाही प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आजच्या घडीला लॉकडाऊन या विषयवार काही निर्णय झाला नसून योग्य वेळी राज्य सरकार नागरिकांना माहिती देईल.

कोरोना पेक्षा आपल्याकडे लॉकडाऊनचं कौतुक फार असल्याचं चित्र दिसत आहे. संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आणि त्यात मुंबई-पुणे शहरात अधिक आहे. कोरोनाबाधितांचा सध्या आकडा बघून राज्यातील संपूर्ण लॉकडाऊन उठवावा अशी सकारात्मक परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आहे. मात्र काहीजण आमच्या जिल्ह्यात कुणी रुग्ण नाही अशा अविर्भावात वागत असून आमच्या जिल्ह्यात कामकाज आणि व्यवहार सुरळीत करण्यास काय हरकत आहे. याबद्दल बोलताना दिसत आहे. त्या मंडळींचा मुद्दा बरोबर जरी असला तरी त्याकरिता प्रशासनाला काही नियोजन आणि उपाय काळजीपूर्वक खबरदारी घेत करत असतं. यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 3 मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात 20 एप्रिलनंतर शासनाने काही व्यवहार सुरु करण्याला अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वसतूंची वाहतूक सुरुच आहे. कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. फळ वाहतूक सुरु आहे. महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत हे यापूर्वीच मुखमंत्र्यांनी जाहीर केले आहे. 40 प्रयोगशाळांच्या मदतीने राज्याने कोरोना चाचण्यांचा एक लाखांचा टप्पा गाठला आहे. संपूर्ण देशात सगळ्यात जास्त टेस्ट या महाराष्ट्रात झाल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात ज्या गोष्टी अत्यावश्यक सेवा आहे, त्या सर्व तर चालूच आहे. नागरिकांनी संयम ठेवण्याची हीच ती वेळ आहे. सर्व जे काही चाललंय ते सुरु आहे.

सरकारकडून लॉकडाउन का वाढवला जातो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. केंद्रातील आणि राज्यातील सरकारला लॉकडाउन वाढवण्यास काही आनंद होत नाही, उलटकरवी कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर त्यांनी पाणी सोडलंय. फक्त देशातील नागरिक सुरक्षित राहावे, त्यांना कुठल्याही पद्धतीचा आरोग्याचा त्रास होऊ नये, म्हणून त्यांच्याकडून ही टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात येत असतो . कोरोनाबाधितांचा राज्यातील आकडा वाढत चाललाय. खबरदारी म्हणून प्रशासन विविध पावले उचलत आहेत. उपाय योजना राबवत आहे. आरोग्य यंत्रणा त्यांचं काम करत आहेत. सध्या जे घरी आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये आणि केवळ नागरिकांचं हीत लक्षात घेऊन असे निर्णय शासन घेत असतं.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने जी माहिती देण्यात आली आहे, त्यात मुंबईतील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्व पातळीवरच्या उपाययोजना परिणामकारक ठरत आहेत. सुमारे दीड कोटी मुंबईकर जनतेच्या दैनंदिन जीवनाची काळजी वाहत असताना कोरोना बाधितांना योग्य, दर्जेदार उपचार देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यात देखील आरोग्य यंत्रणा प्रभावी ठरली आहे. यामुळेच 24 एप्रिलपर्यंत आढळलेल्या 4 हजार 870 रुग्णांपैकी 762 जण बरे होऊन घरी परतले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा वेग वाढल्याने प्रतिबंधित क्षेत्र कमी होवून नागरिकांची दिनचर्या सुरळीत होण्यास आणखी मदत मिळते आहे.

सध्या आशादायक चित्र म्हणजे आपलायकडे अनेक रुग्ण बरे होऊन घरी जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःला 'लॉक' करून कोरोनाला कसं 'डाउन' करता येईल, सोबत आरोग्य कसं सेफ ठेवता येईल, याचा विचार केला पाहिजे. आपण घाबरण्याची वेळ आता निघून गेली आहे. आपण कशा पद्धतीने सजग आणि सुरक्षित राहू शकतो याच विचार प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे. सर्व नागरिकांना कोरोना किती गंभीर रूप घेतोय हे लक्षात आलं आहे. यापुढे फक्त शासनाने नाही तर सगळ्यांनी मिळून कोरोनावर कशाप्रकारे विजय मिळवता येईल याचा विचार करत सुरक्षित आयुष्य जगलं पाहिजे.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
Nashik News: खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
Kantara Fame Actress Rukmini Vasanth Deepfake Video: 'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेकचा तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...
'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेक तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...

व्हिडीओ

Donald Trump daughter  Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
Nashik News: खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
Kantara Fame Actress Rukmini Vasanth Deepfake Video: 'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेकचा तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...
'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेक तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...
NEET Paper Leak Pune Crime : मांढरेसोबत कनेक्शन; पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; पुरावे मिळू नये म्हणून मनिषा हवालदारने काय केलं?
मांढरेसोबत कनेक्शन; पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; पुरावे मिळू नये म्हणून मनिषा हवालदारने काय केलं?
Maharashtra Weather : अस्मानी संकट अधिक गडद होणार! कोकणासह घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; हवामान विभागाचा अंदाज काय?
अस्मानी संकट अधिक गडद होणार! कोकणासह घाट परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी; तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Vidhan Parishad Election 2026: भंडारा - गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?
भंडारा - गोंदिया विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ नाही, पण नाना पटोले बॅलेट पेपरवर चमत्कार करणार?
Saie Tamhankar On Prajakta Mali Cannes Look: 'काय परिधान करावं आणि काय नाही...'; प्राजक्ता माळीच्या कान्समधल्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरचं 'ते' वक्तव्य
'काय परिधान करावं आणि काय नाही...'; प्राजक्ता माळीच्या कान्समधल्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरचं 'ते' वक्तव्य
Embed widget