एक्स्प्लोर

BLOG | आम्ही बिनधास्त काम करू

केंद्र सरकारने डॉक्टर आणि (पॅरामेडिकल स्टाफ) यांच्याविरोधातील हिंसेबाबत अध्यादेश जारी केला असून आता सर्व आरोग्य कर्मचारी आता भयमुक्त वातावरणात काम करू शकणार आहेत. त्यामुळे यापुढे आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्याची गय केली जाणार नाही.

>> संतोष आंधळे

संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील डॉक्टर आणि (पॅरामेडिकल स्टाफ) त्यासोबत असणारे वैद्यकीय सहाय्यकांपासून ते आशा कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. रुग्णांना उपचार देण्यापासून ते रुग्ण शोधण्याचं काम आरोग्य व्यवस्था करत आहेत. त्याचप्रमाणे घरोघरी जनजागृतीसोबत त्यांना समुपदेशन देण्याचं काम आरोग्य कर्मचारी करत आहेत. देशभरात या आरोग्य कर्मचाऱ्यांवर देशातील विविध भागात हल्ले झाल्याच्या घटनाही समोर आल्या. अनेक ठिकाणी अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावं लागत असून वेळप्रसंगी काही समाजकंटकांचे हल्ले झेलले आहेत. एवढंच कमी की काय तर रुग्णांना उपचार देता-देता जर एखाद्या डॉक्टर्सला या आजाराचा प्रादुर्भाव झाला आणि दुर्दैवी मृत्यू ओढावला तर त्याच्या वाट्याला सन्मानपूर्वक अंत्यविधीही येत नसल्याच्या घटना काही दिवसात घडल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने डॉक्टर आणि (पॅरामेडिकल स्टाफ) यांच्याविरोधातील हिंसेबाबत अध्यादेश जारी केला असून आता डॉक्टर आणि त्यासोबत असणारे वैद्यकीय सहाय्यकांपासून ते आशा कर्मचारी भयमुक्त वातावरणात काम करू शकणार आहेत. यापुढे आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्याची गय केली जाणार नसून अशा हल्लेखोरांना सात वर्षांपर्यंतचा कारावास होणार असून हा गुन्हा अदखलपात्र असणार आहे.

21 एप्रिल रोजी 'त्या 'डॉक्टरांना' मरणाने छळले होते' या शीर्षकाखाली डॉक्टरची कशा प्रकारे अवहेलना केली जाते यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. यामध्ये गेल्या सात दिवसात देशाच्या विविध प्रांतातील तीन डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना धारातीर्थ झाले. रुग्णांना उपचार देत असताना त्यांना या रोगाची लागण झाली यात त्यांचे निधन झाले. मात्र या तीन डॉक्टरांच्या अंत्यविधीला समाजातील काही समाजकंटकांनी अडथळे निर्माण केले. पोलिसांची मदत घेऊन त्यांचे विधी पार पाडावे लागले होते.

या सर्व घटनेनंतर डॉक्टरांची शिखर संस्था असलेली इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) कडक भूमिका घेऊन या सर्व गोष्टीचा निषेध करण्याचे ठरवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपले गाऱ्हाणे मांडले होते. मात्र यानंतर आयएमएचे प्रमुख पदाधिकारी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यात सकारात्मक बैठक झाली. त्या बैठकीनंतर केंद्र सरकारने डॉक्टराच्या हल्ल्याविरोधात देशपातळीवर अध्यादेश जारी केला. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी केंद्र सरकारकडून संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आलाय.

संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा 1897, यामध्ये सुधारणा करत केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला असून, त्यान्वये आता आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास, दोषींना 6 महिन्यांपासून ते 7 वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हा गुन्हा अदखलपात्र असून 30 दिवसाच्या आत पोलीस तपास करण्यात येईल. तसेच दोषींना 50 हजारांपासून ते 2 लाखाचा दंड ठोठावण्यात येईल. त्याप्रमाणे डॉक्टरांच्या क्लिनिक, हॉस्पिटलची नासधूस केल्यास त्या वेळेच्या बाजारभावाने त्या नुकसान भरपाईची किंमत असेल त्याच्या दुप्पट खर्च दोषींकडून वसूल करण्यात येईल.

कोरोनाच्या या काळात अनेक डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, पॅरा मेडिकल स्टाफला राहत्या ठिकाणी लोकांच्या टीकेला समोर जावे लागत आहे. काही ठिकाणी तर तुम्ही येथे राहू नका असा तगादा सुद्धा लावला जायचा. अनेक संकटावर मात करून आरोग्य कर्मचारी हा इमाने इतबारे सेवा देत आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असून याचा आम्हाला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी व्यक्त केली. ते स्वतः आज गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत उपस्थित होते. ते पुढे असेही म्हणतात की, "या अध्यादेशामुळे डॉक्टरांना काम करण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळेल. यापूर्वी आम्ही काम करत होतोच आता आणखी आणि बिनधास्त काम करू."

तर, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे सांगतात की, "डॉक्टरांच्या हा हिताचा निर्णय असून आम्ही सगळे डॉक्टर यांचे स्वागत करत आहोत. आम्ही केंद्र सरकारचे आभारी आहोत. मात्र हा अध्यादेश केवळ संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा 1897 पर्यंत मर्यादित न ठेवता, हा अध्यादेश कायमस्वरूपी सरसकट करावा ही आमची विनंती आहे. यामुळे डॉक्टर भयमुक्त वातावरणात काम करू शकतील."

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
ABP Premium

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Embed widget