एक्स्प्लोर

BLOG | कोरोनासोबतचा गनिमी कावा

सध्या वास्तवाचं भान ठेवून नागरिकांनी सुरक्षिततेच्या अटी आणि शर्ती लक्षात घेऊन टाळेबंदीनंतरच आयुष्य कसं असेल यावर आताच विचार करणे सुरु केले पाहिजे. सामाजिक माध्यमांमुळे सध्या माहितीचा ओघ वाढला आहे, त्यात माहिती चूक कि बरोबर हा नंतरचा मुद्दा आहे. या सगळ्या प्रकारामुळे लोकं संभ्रमाअवस्थेत आहे.

कोविड - 19 किंवा कोरोनाच्या नावाने नाकं मुरडत बसण्यापेक्षा सध्या कोरोनासोबत सुरु असलेल्या युद्धात आता 'गनिमी कावा' वापरून कोरोनासोबत जगून त्याला हरविण्याची रणनिती निश्चित करावी लागणार आहे. काही केल्या कोरोना आपली साथ इतक्यात सोडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. या अशा विचित्र परिस्थितीत कोरोनासोबतचं युद्ध चालू पण ठेवायचं मात्र आपण घाबरलो नाही असं दाखवून सावध राहून नवीन जीवनशैली विकसित करून रोजचं जगणं सुरु करायची वेळ आता आपल्या सगळ्यांवर आली आहे. एका ठराविक टप्प्यापर्यंत टाळेबंदी ही नक्कीच महत्वाची होती आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा झाला असून एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आता आणखी काही दिवस वाढवलेली टाळेबंदी संपून अर्थव्यवस्थेला गती द्यावीच लागेल.

भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 59 हजारच्या पुढे गेला आहे. नुकतंच, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकारा परिषदेत सांगितले की, आपल्याला कोरोना विषाणू बरोबर जगणे शिकले पाहिजे. त्यांच्या या वाक्यवरून हे सिद्ध झाले आहे की कोरोना इतक्यात काही लवकर हद्दपार होत नाही. त्यामुळे आपणच आता ह्या संकटाचा सामना युक्तीने करायची गरज आहे. युक्ती फार वेगळी किंवा मोठी नसून प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी व्यवस्थित घेत टाळेबंदीनंतर हलून हलून आयुष्मान सुरु केले पाहिजे. 40 दिवसाचे दोन लॉकडाऊन पाहिलेले नागरिक सध्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात असून सगळ्यांनाच आपापल्या नोकरी-धंद्याची चिंता भेडसावत आहे. कोरोनाची धास्ती मनात आहेच पण सोबत प्रत्येकाला सध्या व्यवसाय-उद्योगाचे वेध लागले आहेत. शेवटी कोरोनासोबत अर्थाजन पण महत्वाचे आहे, कारण उपाशी पोटी कोरोनाचा सामना करणे शक्य नाही. कारण लॉकडाऊनचा अवलंब केलेला भरात हा एकाच देश नसून ज्या ठिकाणी कोरोनाचा कहर आहे अशा सर्वच देशांनी त्या-त्या देशात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाउन जाहीर केलेला आहे.

गेले काही दिवस खूप पंडितानी आपलं कोरोनामय आयुष्यावर मत मांडलं आहे आता गरज आहे ती ह्या परिस्थितीसोबत कशा पद्धतीने जगता येईल याकरता आपल्या आयुष्यात काय बदल करावे लागतील याचा शोध घेण्याची, कारण ह्या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याची हीच ती योग्य वेळ आहे. केंद्र आणि राज्य सरकर आप-आपल्या मार्गदर्शक सूचना देतील परंतु मनाने आपण काही गोष्टी आता स्वीकारल्या पाहिजे. एकदा का आपण एखादी गोष्ट स्वीकारली कि त्यावर उत्तर शोधणं खूप सोपे जाते. सध्या वास्तवाचं भान ठेवून नागरिकांनी सुरक्षिततेच्या अटी आणि शर्ती लक्षात घेऊन टाळेबंदीनंतरच आयुष्य कसं असेल यावर आताच विचार करणे सुरु केले पाहिजे. सामाजिक माध्यमांमुळे सध्या माहितीचा ओघ वाढला आहे, त्यात माहिती चूक कि बरोबर हा नंतरचा मुद्दा आहे. या सगळ्या प्रकारामुळे लोकं संभ्रमाअवस्थेत आहे. अशावेळी लोकांनी मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती कशी चांगली ठेवण्यासाठी नियमित सकस आहार घेण्याबरोबर रोज व्यायाम केला पाहिजे. ज्या व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे अशा व्यक्तींना कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही असे अनेक वेळा आपल्याला आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.

डॉ. राजन वेळूकर, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, सांगतात की, "कोरोनासोबत जगणं ही खरंच काळाची गरज आहे. सगळ्याच प्रगतशील देशात ज्यांनी लॉकडाउनचा अवलंब केला आहे त्यांनी तो हळू हळू कमी करत व्यवसाय सुरु केले आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे कोविड -19 हा विषाणू असून तो असा तात्काळ नष्ट किंवा गायब होणार नाही. आपले वैद्यकीय तज्ज्ञ सध्या यावर योग्यपद्धतीने काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे. त्यांचा लढा ते त्यांच्या पद्धतीने सुरु ठेवतील. मात्र आपण या वातावरणात आपण कसे सुरक्षित राहू शकतो याचा आपण विचार करून एक स्वतःचा असं आराखडा आखून ठेवला पाहिजे. शासन योग्य वेळी नागरिकांना सूचना देईलच त्याचं पालन करून आता आयुष्य कोरोनासोबत जगायचं हे मनाशी पक्कं केले पाहिजे. आपली आरोग्य यंत्रणा कोरोनाला लवकरच हरवेल असा मला विश्वास आहे".

याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनानेही लॉकडाऊन नंतर आता कोरोनासोबत जगायला शिका या धर्तीवर मोठी जनजागृती राज्यात करावी लागणार आहे. या काळात लोकांनी काय करावे किंवा काय करू नये यावर सर्व वयोगटातील आणि सर्व समाजातील घटकांबाबत विचार करून सर्वाभिमुख कॅम्पेन तयार केले पाहिजे, यावर निश्चितच शासन उपाय योजना करत असेलच. शाळेतील मुले हा तास बघायला गेला तर संवेदनशील मुद्दा. याकरिता शिक्षण विभागाने शाळेतील मुले आणि त्यांच्या पालकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने वर्कशॉपचे आयोजन करणे गरजेचे आहे. आता आपण काही गोष्टी या मान्यच केल्या पाहिजे आणि त्यांना गृहीत धरुनच आपले दैनंदिन जीवनमान सुरु ठेवले पाहिजे. नागरिकांनी शक्यतो नवीन जीवनशैली आत्मसात करणे गरजेचं आहे. टाळेबंदीनंतर तुम्ही जेव्हा घराबाहेर पडाल त्यावेळी मास्क घालून बाहेर पडायच, सॅनिटायझरचा योग्य तो वापर करून हात स्वच्छ धुणे. विशेष म्हजे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि सोशल डिस्टंनसिंगचा वापर करणे, ह्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजे.

संपूर्ण जगाला कोरोनाने बदलून टाकले आहे. प्रत्येक जण कोरोनाच्या धास्तीने त्याच्या आयुष्यात त्यानुसार बदल करून घेत आहे. काही दिवसांपासून समाज माध्यमावर एक फोटो व्हायरल होत आहे, त्यावर एक नवीन जीवनशैलीला साजेशी अशी हिंदी भाषेत दोन वाक्य आहे ती कोणाची माहित नाही कारण त्यावर त्याचं नाव नाही. पण वाक्य असे आहे, "सिखना पडेगा अब आँखो से मुस्कुराना, क्योकीं होठो की मुस्कान तो मास्क ने छुपा ली.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Embed widget