एक्स्प्लोर

दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना

कोरोनाच्या या ओढावलेल्या परिस्थितीत बाहेर पडणं शक्य नसल्याने नातेवाईक मित्रपरिवारातील कुणाचं निधन झालं असलं तरी त्यात सहभागी होता येत नाहगीए, सुखात नाही तर आता दु:खातही सहभाग घेता येत नाही इतकी वाईट परिस्थिती कोरोनाने उभी केलीय.

आपण कायम म्हणत असतो किंवा तुम्ही हे अनेकांकडून ऐकलं असेल, एखाद्या वेळेस आपण जवळच्या व्यक्तीच्या आनंद सोहळ्यला जाऊ नये पण दुःखाच्या प्रसंगी कायम हजेरी लावावी. जर एखादा मित्र किंवा कुटुंब परिवारातील निधनाची बातमी ऐकली किंवा कुणी आजारी असेल तर आपण क्षणांचाही विलंब न लावता त्या ठिकाणी सांत्वन किंवा आपल्या जवळच्या त्या व्यक्तीचं मनोबल उंचवण्यासाठी हजर राहतो. मात्र कोरोना सारख्या जाली दुश्मन ठरलेल्या या आजराने या सगळ्या नात्या-गोत्यावर पाणी फेरलंय. अगदी घरच्या व्यक्तीच्या आजरपणात किंवा दुर्दैवी निधनात सगळ्यांना दूर ठेवणारा हा आजार जगाच्या पाठीवर अनेक पिढ्यानी पहिल्यांदाच अनुभवला असेल.

आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघितलं असेल की, अनेक नागरिकांनी म्हणजे मुलाने आपल्या आईचा, पत्नीने पतीचा, अंत्यविधी मोबाईल मधील व्हिडिओ द्वारे बघून जिथे आहे त्या ठिकाणावरून श्रद्धांजली वाहिली. हे केवळ एका देशाचं चित्र नाही तर अशा घटना बऱ्याच देशात घडल्या आहेत. आजारी आई-बाबांना मुलं सध्या या महाभयंकर परिस्थितीत मोबाईलवरूनच विचारपूस करताना आढळत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण कितीही जवळचा व्यक्ती असला तरी भेटण्यावर कडक निर्बंध आहेत. संपूर्ण जगामध्ये सुद्धा सध्या हीच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत आहे त्यामुळे असे वाटत नाही की हा आजार इतक्यात लगेच आटोक्यात येईल. आरोग्य तज्ज्ञांच्या मते अजून हा पूर्ण महिना जाऊ शकतो त्यामुळे सगळ्यांनीच काटेकोरपणे काळजी घेतली पाहिजे.

यावर प्रतिक्रिया देताना जेष्ठ साहित्यिक रा. रं बोराडे सांगतात की, "माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मनुष्य इतका भित्रा आहे ते पाहिलं. मात्र हे ही तितकंच खरं आहे की हा आजार संसर्गजन्य आहे याचं सगळयांनी भान ठेवलं पाहिजे. शासनाने आणि पोलिसांनी जे नियम घालून दिले आहेत त्यांचा मान सगळ्यांनीच राखला पाहिजे. हे खरं आहे की आपल्या जवळचा कुणीही नातेवाईक आजारी असेल किंवा त्यांचे निधन झाले असेल तर आपण सर्व जण एरव्ही तेथे हजर राहतो. परंतु, सध्याचा काळ हा भयानक आहे. या काळात जेव्हा कुठे कुण्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर तेव्हा त्या घरचे लोकच सर्वांना कळवतात की सध्या कोरोना सारख्या परिस्थतीत कुणीही येऊ नये. शिवाय अशा परिस्थितीत प्रेत जाळावं की पुरावं हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो कारण, आपल्याकडे प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे अंत्यविधी केले जातात. मात्र या काळात डॉक्टरांच्या सांगण्यानुसार निर्णय घ्यावे लागतात कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता घेतलेली ही काळजी असते."

स्वकीयांच्या दुःखातही सहभागी न होऊ देणाऱ्या या आजाराला पायबंद घालायचा असेल तर नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणत अपेक्षित आहे शिवाय कडक शिस्त आणि निमयांचं पालन करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने केरळ राज्याने यशस्वी लढा देऊन या रोगावर मात करून विजय मिळविला आहे, तशाच काहीशा पद्धीत्ने आपल्यालाही वागण्याची गरज आहे. जर आपण सगळ्यांनीच मिळून सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्याचे ठरवले तर नक्कीच या जोरावर आपण विजयी मिळवू शकतो.

दोन मे च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजार 296 झाला असून 521 जणांचा मृत्यू झाला आहे, तर त्यापैकी एकट्या मुंबई परिसरात 8 हजार 359 रुग्ण असून 322 जण मृत पावले आहेत. राज्याची आरोग्य यंत्रणा या आजाराला आळा घालण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत दोन हजार रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. अशा या रोगट वातावरणात आजारी पडू नये म्हणून प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण अशा वेळी आजारी पडू नये अशी स्थितीच आहे.

एकंदर काय तर रुतलेलं अर्थव्यवस्थेचं चक्र हळूहळू चालू होईल, शासनाने काही ठिकाणी लॉकडाऊन मध्ये अटी शर्तीसह शिथिलता आणायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आपल्याला कोरोनासहित जीवन जगायचे हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे. ज्या विषयवार इतके दिवस चर्चा रंगात होती, तो विषय म्हणजे दारुची दुकानं उघडण्यास काय हरकत आहे, त्यामुळे राज्याला महसूल मिळणार आहे. अंतिमतः त्यावर निर्णय झालेला दिसतोय कंटेन्मेंट भाग वगळता रेड झोन मधील परिसरातील दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्तवाहिनीवर येत आहे. मात्र यामुळे आधीपेक्षा नागरिकांना जास्त सजग राहावं लागणार आहे. कारण यापुढे प्रत्येक जण एकमेकाला संशयाने बघण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण लक्षणंविरहित कोरोनाबाधितांची संख्या ही फार मोठी आहे, त्यामुळे समोर येणाऱ्या व्यक्तीला भलेही कोणती लक्षणं नसतील मात्र तरी आपण नाका-तोंडावर मास्क लावून एक ठराविक अंतरावर उभे राहूनच बोललं पाहिजे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil :  राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil :  राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
Embed widget