एक्स्प्लोर

BLOG | दिल्लीचा Serological Survey काय सांगतो?

दिल्लीत जवळपास 45-50 लाख लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेलीय आणि ते त्यातून बरेही झालेत.

National Centre for Disease Control (NCDC) आणि दिल्ली सरकारने जूनच्या शेवटच्या आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीच्या काही भागात Serological Survey केला, ज्यात 21,387 लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. या रक्ताच्या नमुन्यांची कोरोनासाठी तपासणी केली असता त्यात 23% लोक असे आढळले ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे आणि त्यांच्या शरीरात कोरोनाविरुद्ध antibodies तयार झालेल्या आहेत. या नमुना तपासणीला दिल्लीच्या 2 कोटी लोकसंख्येसाठी मानक म्हणून वापरले तर दिल्लीत जवळपास 45-50 लाख लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेलीय आणि ते त्यातून बरेही झालेत.

या अनुषंगाने मला काही प्रश्न पडतात

1. दिल्लीतल्या सर्व्हेनुसार 45-50 लाख लोकांना कोरोना होऊन गेलेला आहे. पण सरकारी आकडा 1.25 लाख केसेस दाखवतोय. कोरोनाच्या संसर्गात 15-20% लोकांनाच लक्षणे येतात, म्हणजे 1.25 लाख लोकांना लक्षणे दिसली होती तर जास्तीत जास्त 10 लाख लोकांना हा संसर्ग व्हायला झालेला दिसायला हवा होता, जिथे 45-50 लाख लोकांना हा संसर्ग झालेला दिसतोय. याला दोन कारणे असू शकतात, एकतर खूप कमी लोकांच्या टेस्ट करणे किंवा टेस्टची अचूकता कमी असणे.

2. दिल्ली, केंद्र आणि तमाम राज्य सरकारे आजवर सांगत होती की कोरोनाचा समूह संसर्ग (community spread) झालेला नाहीये. 23% लोक serologically positive असणे हेच दर्शवते की समूह संसर्ग खूप आधी सुरू झाला होता आणि सरकारे लोकांना खोटं सांगत होती.

3.आतापर्यंतचे आकडे पाहता दिल्लीत कोरोनाने 3690 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 45-50 लाख लोक सर्व्हेत बाधित असताना त्याने फक्त 3690 लोकांचा मृत्यू होणे, हे मृत्यूचे प्रमाण 0.1% पेक्षाही कमी आहे. आपल्या सरकारांनी कमी टेस्ट केल्याने किंवा community transmission सतत नाकारत राहिल्याने मृत्यूचा हा नगण्य दिसणारा आकडा 1.25 लाख केसेसच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा दिसत होता. जर मृत्यूचे प्रमाण इतके कमी आहे हे कळले असते तर भीतीचा इतका मोठा बागुलबुवा उभा झालाच नसता. कदाचित लॉकडाऊन करण्याची किंवा वाढवण्याची गरजही पडली नसती.

एखाद्या प्रश्नाला आधी नाकारण्याची आणि जर तो सिद्ध झालाच तर त्या प्रश्नाचे योग्य तऱ्हेने मूल्यमापन न करता त्यावर मनमर्जीने काहीही उपाय करत बसण्याची बाबू लोकांची आणि राजकारणी लोकांची सवय आपल्या देशात कुठल्याही छोट्या प्रश्नाला भीषण बनवू शकते. दिल्लीसारखा एखादा सर्व्हे मुंबईत किंवा पुण्यात केला तर त्याचेही निष्कर्ष खूप वेगळे येणार नाहीत. सरकारने आपल्याकडे कोरोना community transmission मध्ये आहे हे आधीच मान्य केले असते आणि हे serological survey वेगवेगळ्या ठिकाणी 2-3 महिने आधी केले असते तर कदाचित या आजाराची भीती तेव्हाच संपली असती आणि जनजीवन सामान्य होऊन लॉकडाऊनने देशाचे आर्थिक नुकसान झाले नसते, आणि कोणतेही 100% प्रभावी औषध नसताना फक्त ऍडमिट करून लाखोंची बिले लावत रुग्णांना लुबाडण्याचा धंदाही झाला नसता.

दिल्लीसारखेच सर्व्हे बाकीच्या राज्यांमध्येही करण्याची गरज आहे. फक्त अत्यावस्थ कोरोना रुग्णांना दवाखान्यात भरती करणे आणि बाकीच्या वैद्यकीय सेवा पुर्ववत करणे ही आजची गरज आहे. कोरोनाच्या एका साथीत काही हजार जीव वाचवण्यासाठी आपण बाकीच्या असंख्य जीवघेण्या आजारांनी बाधित लाखो लोकांना विसरून गेलो होतो, आणि जे बेरोजगारी-उपासमारीने मेले त्यांचा तर हिशोबच नाही. राजकारणात आणि प्रशासनात प्रामाणिकपणा, शहाणपण आणि नफा-नुकसान बघून निर्णय घेण्याची धमक असायला हवी ही काळाची गरज आहे!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today:  मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Ajit Pawar NCP : एकत्र येणार? नाही..नाही..नाही, अजित पवारांचं उत्तर ऐकलं का? Special Report
BMC Election 2026 Ravikiran Deshmukh :ठाकरे vs फडणवीस?मुंबईत कुणाचं पारडं जड?पालिकेचं सोपं विश्लेषण
Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत
Naresh Arora Action : कारवाईचा अलार्म, सल्लागाराला घाम! अजित पवारांचे सल्लागार क्राईम ब्रँचच्या रडारवर Special Report
Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today:  मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Eknath Khadse On Irrigation Scam: अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
अजित पवारांना 25 वर्षांनी 'त्या' फाईलची आठवण, म्हणजे तुम्हीदेखील भ्रष्टाचाराला संरक्षण दिलंय; सिंचन घोटाळ्यावरुन एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Pune Election 2026: मतदानापूर्वी पुण्यात मोठी घडामोड, रात्रीच्या अंधारात मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्या, वसंत मोरे आक्रमक
मतदानापूर्वी पुण्यात मोठी घडामोड, रात्रीच्या अंधारात मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्या, वसंत मोरे आक्रमक
Embed widget