एक्स्प्लोर

‘मन’ की बात… है भाई...

थोडं मशीन ओरिएन्टेड जगण्यापेक्षा माणूस ओरिएन्टेड जगूया की, कारण ही मशीन्स, हे तंत्रज्ञानही माणसानेच बनवलंय ना. तेव्हा माणसासाठी तंत्रज्ञान जन्माला आलंय किंबहुना ते माणसानेच घातलंय, तंत्रज्ञानासाठी माणूस जन्माला आलेला नाही, हे लक्षात ठेवूया आणि मानसिक आरोग्य जपूया.

मायानगरी मुंबई.... स्वप्ननगरी मुंबई...बॉलिवूड म्हणजे मुंबई....देशाची आर्थिक राजधानी मुंबई.... ‘धिस सिटी नेव्हर स्लीप्स’ हेही वर्णन मुंबईचंच. या यादीत आता एक नकोशी भर पडलीय ती मानसिक विकार झालेल्यांची मुंबई अशी. कारण, एका अहवालानुसार, देशात सर्वात जास्त मानसिक उपचारांची गरज मुंबईकरांना आहे. या यादीत खरं म्हणजे कोणालाच यायला आवडणार नाही....अव्वल तर नाहीच नाही....त्या यादीत मुंबई आलीय. त्यातही इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ही परिस्थिती मुंबईकरांना फेस करावी लागतेय. असा धक्कादायक निष्कर्षही समोर आलाय. परिस्थिती खरोखरच चिंताजनक, फार खोलवर विचार करायला लावणारी आहे. मुंबईकर पायाने नव्हे तर घड्याळ्याच्या काट्याने चालतात, म्हणजे तास मिनिटं नव्हे तर सेकंदाचा हिशेब ठेवत त्यांना पावलं टाकावी लागतात. मग नोकरी-व्यवसाय, शाळा-कॉलेज गाठणं असेल किंवा अगदी सुट्टीच्या दिवशी नातेवाईकांकडे जाणं असेल. त्यातही मुंबईत रोज लाखो जण लाईफलाईन अर्थात रेल्वेने प्रवास करतात. ८.१२, ९.१८ हे मुंबईकरांसाठी फक्त आकडे नाहीत, तर ते त्यांचं भन्नाट वेगाने जगणं आहे. किंबहुना मुंबई आणि बहुतेक शहरांमधला हा बेसिक फरक आहे, तो म्हणजे इथल्या जगण्याला असलेला अफलातून पेस. ती ट्रेन गाठण्यासाठी, बस पकडण्यासाठी, ट्रॅफिक टाळण्यासाठीची धडपड, जेव्हा फक्त शरीर नव्हे तर मनही धावत असतं, शरीरावर आलेला ताण काही काळाने कमी होतो, पण, धावलेल्या मनाचं काय? त्याला रिकव्हर व्हायला मिळतच नाही, ऑफिस गाठलं की ऑफिसमधलं प्रेशर, काम संपवून घरी परतलं की तिथल्या वातावरणातलं प्रेशर....कुणाची आजारपणं, कुणाचे घरगुती वादविवाद, कुणाला पैशाची चणचण. या सगळ्याचा ताण जो मन घेतं, त्याला रिलॅक्स करायला तुमच्याकडे वेळच नाहीये किंवा किंबहुना तो आपण वेळेचं नियोजन काढत नाहीये का? आपणच आपल्याला विचारायला हवं. सकाळी ट्रेन पकडण्यापासून ते रात्री उद्या सकाळी उठायच्या टेन्शनपर्यंतचं सगळा दबाव हे एकटं मन घेत असतं, त्यातच आता सोशल मीडिया नावाच्या अपरिहार्य घटकाने आपल्या आयुष्यात एन्ट्री घेतलीय. किंबहुना सोशल मीडियाने जग जवळ आलंय, पण माणसं दूर जातायत अशी स्थिती आहे. तासन् तास माणसं सतत मोबाईलमध्ये नाहीतर पीसीवर डोकं घालून बसलेली, कधी कुणाशी चॅटिंग, कधी सेल्फी तर कधी कुणाच्या पोस्ट केलेल्या फोटोवर किंवा कमेंटवर आपण रिएक्ट होणं...यात काही कन्स्ट्रक्टिव्ह आणि उपयुक्त कारणांचा अपवाद सोडला तर माणूस आता सोशल मीडिया नावाच्या नशेत अडकत चाललाय, अशी स्थिती आहे. हाडामासाचा माणूस बाजूला बसलेला असतो, पण आपलं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर. सतत अनेक तास. त्यामुळे आपण अॅडिक्ट झालोय. आहारी गेलोय, या सोशल मीडियाच्या. त्यातूनच मग डोळ्यासोबतच मेंदूवर, मनावर येणारा असह्य ताण. रात्र रात्र चॅटिंग करत बसणं, बऱ्याचदा अनावश्यक किंवा निव्वळ टाईमपासच्या गप्पा यात असतात. ज्याचा तुमचं आयुष्य घडवण्यात शून्य उपयोग असतो, बरं रिलॅक्सेशनसाठी काही काळ मोबाईलवर किंवा पीसीवर घालवायचा असं म्हटलं तरी तो काही काळ हा काही काळापुरता मर्यादित राहत नाही, तुम्ही तुमचे राहतच नाही. एकदा ती किक लागली की. तो चक्रव्यूह आहे आहे, ज्यात तुम्ही अडकत जाता, फसत जाता. ज्याचा अंतिम परिणाम फक्त निगेटिव्हच असतो. मोबाईलवर रेंगाळण्याची किंवा मोबाईलच्या आधीन होण्याची ही सवय फक्त मोठ्यांनाच नाही तर अगदी वर्षा दोन वर्षांच्या मुलांनाही लागलीय. आज मोबाईलवर गाणं किंवा कार्टून लागलं नाही तर दूधाचं भांडं तोंडाला लागत नाही किंवा घास घशाखाली उतरत नाही, ही सवय लावणारेही आपल्यासारखे आईवडीलच आहेत. तेव्हा ही मुलांची ही सवयदेखील आपण बदलण्यासाठी आता तरी कटिबद्ध होऊया. शरीराप्रमाणेच मनालाही विश्रांती हवी असते, हे आपण समजून घेणार आहोत की नाही ? असंख्य भावभावनांचा कल्लोळ, कोलाहल सुरु असलेलं मन, कधी आनंदाने उधाणलेलं तर कधी दु:खाने होरपळलेलं, कधी रागाने करपलेलं तर वेदनेने जखमी झालेलं मन. मन हा आपला आरसा असतो, आपल्या सभोवतालच्या परिस्थितीने आपल्यामध्ये होणाऱ्या बदलांचं प्रतिबिंब मनात उमटत असतं. प्रत्येक दिवसाच्या, प्रत्येक तासाला नव्हे प्रत्येक मिनिट अगदी प्रत्येक सेकंदालाही या मनात काहीतरी सुरु असतं, मला तर असं वाटतं की आपण झोपतो तेव्हाही मनात काही तरी सुरु असतं, म्हणूनच स्वप्न पडतात, म्हणूनच कधी दचकून आपण उठतो, तर कधी आपण झोपेतच बडबडतो. हे सारं आपलं मन करत असतं. मला तर वाटतं की, जगातील सर्वात वेगवान काय असं म्हटलं तर मी मन हेच उत्तर देईन. म्हणजे अगदी रिटायर झालेल्या उसेन बोल्टसारख्या धावपटूलाही मागे टाकण्याची ताकद फक्त कोणात असेल तर ती मनात आहे. मग इतकं वेगवान, इतक्या भावभावनांचा मुक्त संचार सुरु असलेल्या मनाला विश्रांती हवीच. जी आपण वेळेचं उत्तम नियोजन करुन घेऊ शकतो. मनाला रिलॅक्स करण्यासाठी साधेसोपे उपाय केले तरी चालतील. ज्यात दिवसातून किमान एकदा १५ मिनिटं शांत बसून ध्यान करणं. हा उपाय फायदेशीर ठरु शकतो. शांत असतानाही माणूस स्वत:शी बोलत असतो, असं म्हणतात. पण, त्या वेळी कोणत्याही गोष्टींचा विचार न करणं किंवा केलाच तर नकारात्मक गोष्टींचा अजिबात न करणं हे गरजेचं. दुसरं म्हणजे १५ मिनिटं तर उत्तम संगीत जे तुमच्या मनाला शांत करेल, नवसंजीवनी देईल ते ऐकणं. तुम्ही ज्या माणसांसोबत रिलॅक्स फिल करत असाल त्यांच्याशी बोलणं. असे काही छोटे छोटे उपाय केले तर मनाला शांत वाटू शकेल. मुद्दा तुम्ही कोणता उपाय करता हा नसून मनाला ताण न देणं हा आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक चांगली नोकरी मिळवण्याची, अधिकाधिक पैसे मिळवण्याची पर्यायाने जगण्याची स्पर्धा वाढतच जाणार, त्यातही मुंबईत उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आणि मुंबईची लोकसंख्या हे गणित इतकं विस्कटलेलं आहे की, त्याबद्दल न बोललेलंच बरं. म्हणून या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याबद्दल बोलण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे ते करुया. थोडं मशीन ओरिएन्टेड जगण्यापेक्षा माणूस ओरिएन्टेड जगूया की, कारण ही मशीन्स, हे तंत्रज्ञानही माणसानेच बनवलंय ना. तेव्हा माणसासाठी तंत्रज्ञान जन्माला आलंय किंबहुना ते माणसानेच घातलंय, तंत्रज्ञानासाठी माणूस जन्माला आलेला नाही, हे लक्षात ठेवूया आणि मानसिक आरोग्य जपूया, अधिक चांगलं कसं राहील याकडे जास्त लक्ष देऊया. या मनाची महती किंवा त्याचे गुणधर्म सांगताना समर्थ रामदास म्हणतात, अचपळ मन माझे नावरे आवरीता तुजविण शीण होतो धाव रे धाव आता त्याच वेळी आमच्या बहिणाबाई लिहून जातात, मन पाखरु पाखरु याची काय सांगू मात.... आता होतं भुईवर....गेलं गेलं आभाळात अशा या चंचल, वेगवान, भाव-भावनांचे अनेक पदर एकाच वेळी ल्यालेल्या आपल्या मनाची काळजी आपल्याला घ्यायलाच हवी. मन की बात है भाई...ध्यान दो.....
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
Uddhav Thackeray Vs Shah सत्ताधारी, विरोधकांची एकमेकांवर आरोपाची चिखलफेक, डायलॉगबाजी Special Report
Pune Crime Special Report पुण्यात दहावीतील मुलाची हत्या,  शाळकरी मुलाकडून वर्गमित्राचीच हत्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
Embed widget