एक्स्प्लोर

अन्नदात्याचा संप हा विनोदाचा विषय आहे?

शेतकऱ्याला अन्नाचं महत्व सांगणं म्हणजे कृष्णाला गीता शिकवण्यासारखं आहे. आणि मुख्य गोष्ट ही आहे की आपण शिकवणारे कोण? आपण धुतल्या तांदळाचे आहोत का हा विचार करणार का नाही? तुम्ही टोल भरताना कर्जबाजारी असल्यासारखा चेहरा करता. कर चुकवायला गाडीची पासिंग दुसऱ्या शहरात करता. घरचं लाईट बिल कमी यावं म्हणून ऑफिस मध्ये फोन चार्ज करणारे नग पण माहिती आहेत आम्हाला. तुम्ही कुठं नैतिकता शिकवायला लागले राव? वाकून बघितल्याशिवाय गाय का बैल हे न कळणाऱ्या चावट लोकांनो, शेतीतलं आपल्याला ढेकळं कळत नाही. कशाला उगीच तोंड चालवता? संपावरचं लक्ष हटवायला तुम्ही अन्नाची नासाडी चाललीय म्हणून बोंब मारत आहात. तुमच्यापैकी अर्ध्या लोकांच्या लक्षात सुद्धा येत नाही की तुम्ही मुख्य समस्येवरून लक्ष विचलित करत आहात. आताच काही दिवसापूर्वी हे असेच टमाटे गावोगाव शेताच्या बाहेर पडलेले होते. भाव नाही म्हणून. व्यापारी काय भिकारी सुद्धा हात लावायला तयार नव्हते. आणि तुम्ही सांगतात गावात गरिबांना वाटा. पंधरा पंधरा दिवस तूर घेऊन शेतकरी उभे होते. तेव्हा त्याच्या तुरीची काळजी वाटली नाही तुम्हाला. ते नुकसान नव्हतं का? तुरीसोबत पंधरा पंधरा दिवस उन्हा तान्हात होरपळून निघालेला शेतकरी रस्त्यावर आला आहे. त्याला शहाणपणा शिकवू नका. आम्ही कर भरतो म्हणे. आणि शेतकरी काय भरतो? बियाणं असेल, खत असेल ते विकत घेताना काय शेण भरतो का? आणि शेतकरी रागात माल रस्त्यात टाकून देतो ते त्याला अन्नाची किंमत कळत नाही म्हणून नाही. त्याने ते उगवलं पण त्याला त्याची किंमत मिळत नाही म्हणून. त्याची निराशा झाली आहे. तुम्ही दुधाच्या रिकाम्या पिशव्या विकून पण पैसे कमवता आणी त्याला दूध विकून पण पैसे मिळत नसतील तर त्याचा राग किती टोकाचा असेल याचा जरा विचार करा. तुम्ही तुमचे जुने वापरलेले कपडे देऊन पण भांडे घेता. आणि शेतकऱ्याच्या कापसाला मात्र भाव नसतो. ही वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या अंतरंगात जाऊ द्या, स्वतःच्या डस्टबिन मध्ये डोकवून बघा. शेतकऱ्याने त्यामानाने कमीच नासाडी केली आहे. आई दूध तापवते. तिच्या लक्षात येतं दूध नासलं आहे. ती दूध फेकून देते. तुम्ही तिला नाव ठेवता का? मग शेतकऱ्याला का शहाणपणा शिकवता? त्याच दूध नासलंय राव. हे आंदोलन शरद जोशी नावाच्या थोर माणसाने खूप आधीच सांगितलं होतं. आता उशिरा का होईना शेतकरी जागा झाला आहे. हे पण सत्य आहे की एक पाउस झाला की शेतकरी सगळं विसरून शेतात कामाला लागेल. पण आपण विसरून चालणार नाही. कर्जमाफी हा शब्द सुद्धा तुम्हाला नको असेल तर आधी हमीभाव दिला पाहिजे. हमीभाव हा हक्क आहे. तो देणार का? त्याच्यावर तोंड उघडायला सांगा नेत्यांना. आंदोलनाची गरजच उरणार नाही. स्वातंत्र्यानंतर एवढा दुबळा विरोधी पक्ष पहिल्यांदा दिसतो आहे. त्याला फुकट आंदोलनाचं श्रेय देऊ नका. चार दिवस पांचट विनोद न करता शांत राहिलात तर शहर विरुद्ध गाव ही दरी वाढणार नाही. अन्नाला नाव ठेवू नये हे संस्कार आहेत ना? मग अन्नदात्याची का वाट लावता? राजकीय पक्षाच्या भक्तिभावात लिहिताना तुम्हाला गंमत वाटते पण याची फार मोठी किंमत मोजावी लागेल हे लक्षात ठेवा. देशात फूट पडू देऊ नका. अजून तरी या देशातल्या सैनिकाला आणि शेतकऱ्याला फेसबुकवरून देशभक्ती शिकायची वेळ आलेली नाही. जय जवान! जय किसान!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंडेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
IAS तुकाराम मुंढेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
Ahilyanagar Blast: अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
Amruta Khanvilkar Sonalee Kulkarni Catfight Controversy: 'इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी...'; अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्यात खरंच कॅटफाईट? दोघींनी स्वतःच करुन टाकलं खरं-खोटं
'इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी...'; अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्यात खरंच कॅटफाईट? दोघींनी स्वतःच करुन टाकलं खरं-खोटं
What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंडेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
IAS तुकाराम मुंढेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
Ahilyanagar Blast: अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
Amruta Khanvilkar Sonalee Kulkarni Catfight Controversy: 'इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी...'; अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्यात खरंच कॅटफाईट? दोघींनी स्वतःच करुन टाकलं खरं-खोटं
'इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी...'; अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्यात खरंच कॅटफाईट? दोघींनी स्वतःच करुन टाकलं खरं-खोटं
What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
Jalgaon News: शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Embed widget