एक्स्प्लोर

BLOG | भाकरी

पण... एक विचार काही जात नव्हता तिथे विखरुन पडलेल्या भाकऱ्या. आपलं सगळं आयुष्य डोळ्यासमोर उभं करत होतो. प्रत्येकाचं जगणं वेगळं, मात्र जगण्याचे ध्येय एकच ते म्हणजे भाकरी...

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली....या ओळी आहेत कवी नारायण सुर्वे यांच्या. सारी हयात पोटाची खळी भागवण्यासाठी केली जाणारी धडपड कवीने अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे.

नारायण सुर्वे यांच्या याच कवितेची आठवण काल दिवसभर येत होती. त्याचं कारण असं होतं, शुक्रवारी औरंगाबाद करमाडजवळ झालेल्या रेल्वेचा अपघात. हा अपघात कव्हर करताना छिन्नविछिन्न मृतदेहाचे तुकडे जितके वेदनादायी होते, तेवढ्याच वेदना देत होत्या अपघाताने रेल्वे पटरीवर विखुरलेल्या भाकऱ्या.. याच भाकरीसाठी हे मजूर साडे आठशे किलोमीटर कामासाठी आले होते. उद्या आपल्या घरच्यांसोबत जाऊन पोटभर जेवण करावं आपल्या लहानग्याला घास भरवावा, या इच्छेने ते चालत होते. इकडे कोरोनाचं संकट आहे. हाताला काम नाही, उपासमारीची वेळ आली आहे. रस्त्याने गेलो तर पोलीस मारतील, इथेच थांबलो तर असेच मरु म्हणून ते 21 कामगार रेल्वे पटरीने चालत होते. 40 किलोमीटर चालल्यानंतर ते दमले, बसले आणि बसल्याजागी कधी झोप आली त्यांना कळले देखील नसेल. मनात एक विचार जी रेल्वे बंद आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या गावी जाता आलं नाही, ती रेल्वे तर बंद आहे. त्यांना एवढं समजतही नव्हतं की रेल्वे बंद आहे म्हणजे मालगाडी बंद नाही. सव्वा पाच- साडे पाचच्या दरम्यान धडधड करत मालगाडी आली आणि पापणी उघडेस्तोवर सोळा लोकांच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन गेली. हे प्रचंड वेदनादायी होतं. लॉकडाऊनच्या काळातील सर्वात वेदनादायी दृश्य होतं.

BLOG | भाकरी

पण.. पण... एक विचार काही जात नव्हता तिथे विखरुन पडलेल्या भाकऱ्या. आपलं सगळं आयुष्य डोळ्यासमोर उभं करत होते. प्रत्येकाचं जगणं वेगळं, मात्र जगण्याचे ध्येय एकच ते म्हणजे भाकरी... त्या कामगारांचं त्या दिवसाचं दुर्दैव बघा, त्यांना गावी जायचं होतं, गाडी नव्हती.. रेल्वे नव्हती. काम हवं होतं ते पण नव्हतं. काम नाहीतर पैसे नाही अन् पैसे नाहीतर भाकर नाही. भाकर नाही तर जगणं नाही. पण या लॉकडाऊनमध्ये आपल्या नशिबी मरणच लिहून ठेवलंय हे त्यांना कसं माहित असणार? त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना घेऊन जाण्यासाठी अॅम्ब्युन्स, त्यांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी स्पेशल विमानाने अधिकारी आले. त्यांच्या मृतदेहासाठी रेल्वे गाडीत एक डबाही मिळाला. त्यामुळे प्रश्न पडला जिवंतपणी या मजुरांना विचारणारे कोणीही नव्हतं पण मृत्यू झाल्यानंतर सरकारचे पन्नास-शंभर कर्मचारी शरीराचे विखुरलेले तुकडे एकत्र करण्यासाठी मात्र होते.

BLOG | भाकरी

मजुरांच्या मृत्युनंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने पाच -पाच लाख रुपये देण्याची घोषणाही केली. पण हेच आधी मिळालं असतं तर? बघा किती दुर्दैव आहे हे ते सगळे मजूर भाकरीसाठी गेले आता त्यांच्या पाठी राहिलेल्या कुटुंबातील इतरांसमोरही भाकरीचाच चंद्र मोठा झालेला असेल....

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case :  115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
Ajit Pawar & Sharad Pawar: पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
Bondi Beach Terror Attack: ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
BMC Election 2026: आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
Embed widget