एक्स्प्लोर

गोष्ट छोटी उंदराएवढी..!

महाराष्ट्राच्या मंत्रालयातच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप नाथाभाऊंनी केला आहे. दिवसाला 46 हजार उंदीर मारणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाचे कपडे या उंदरांनी कुरतडून त्यांना पार नागडं करून टाकलं आहे. विशेष म्हणजे, हा विभाग नाथाभाऊंचे स्नेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित येतो.. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना मूषकबाधेनं ग्रासलंय.

  गोष्ट तशी छोटी उंदराएवढी... मात्र आहे डोंगराएवढी... भाजप सत्तेच्या या डोंगराला पोखरण्यासाठी नाथाभाऊंनी खास ‘उंदीरा’स्त्र डागलं… महाराष्ट्राच्या मंत्रालयातच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप नाथाभाऊंनी केला आहे. दिवसाला 46 हजार उंदीर मारणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाचे कपडे या उंदरांनी कुरतडून त्यांना पार नागडं करून टाकलं आहे. विशेष म्हणजे, हा विभाग नाथाभाऊंचे स्नेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित येतो.. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना मूषकबाधेनं ग्रासलंय.. नाथाभाऊंच्या उंदीर बॉम्बनं सरकारच्या पारदर्शक कारभाराला किती बिळं पाडली आहेत, याची प्रचिती आपल्याला येईल... तसं नाथाभाऊ आजपर्यंत जे बोलत आले, ते सरकारनं फार सीरियसली घेतलं नाही. स्वकीयांवर बरसणाऱ्यांना नाथाभाऊंना विरोधकांना खांदा देण्याचा प्रयत्न करून आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न केला... पण नाथाभाऊंनी आजपर्यंत त्यांना झुलवत ठेवलंय... पण परवा मंत्रालयात त्यांनी उंदीर सोडून स्वतःच्याच पक्षाचे वाभाडे काढले. सर्वसामान्य जनता या अशा घोटाळ्यांना चांगलीच जाणते. किंबहुना हा अनुभव प्रत्येकजण घेतच असतो. पण हा भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, हे खडसेंच्या आरोपांमधून सिद्ध होतं आहे. खडसे आज मंत्री असते, तर त्यांनी कदाचित हा आरोप त्यांनी केलाच नसता. हा घोटाळा उघड़ झालाही नसता. याचा अर्थ असा की, सत्ता उपभोगताना होणाऱ्या गैरप्रकारांना सत्ताधाऱ्यांची मूक संमती असते. नव्हे, त्यांचा अप्रत्यक्ष त्यात सहभागही असतो, असं म्हणायला हरकत नाही. उंदरांनी सरकारी कारभाराच्या केलेल्या या चिंध्या भ्रष्टाचाराचं प्रतिक आहेत. भ्रष्टाचाऱ्यांचे हात एवढे सरावलेत की, ते आता अकल्पित, विश्वास न बसणारी आकडेवारी दाखवून करोडोंचा मलिदा घशात घालत आहेत. कारण त्यांना कुठलंही भय नाही. जिथून राज्याचा कारभार चालतो, जिथे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांची उठबैस असते. अशा मंत्रालयातच भ्रष्टाचाराचे एवढे पेव फुटले असतील, तर गावागावात असलेल्या तलाठ्यापासून झेडपीतल्या बाबूपर्यंत कोणालाच भय असण्याचं कारण नाही. हे या व्यवस्थेला असेच उंदरासारखे अखंड पोखरत राहणार आहेत. सरकार दरबारी खेटे मारून पॅरागॉनचे दहा-बारा जोड झिजवत आयुष्याची हयात घालवणारे, हजारो लोक आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. यातलेच एक धर्मा पाटील मंत्रालयात आले. नेहमीसारखी त्यांची निराशा झाली. आणि त्यांनाही जीव गमवावा लागला. एरवी किड्यामुंग्यांप्रमाणे मरणारा शेतकरी पहिल्यांदाच उंदरासारखा मेला. ज्य़ाचं या व्यवस्थेला काही सोयरसुतक नाही. ''पिपात ओल्या मेले उंदीर, माना टाकून मुरगळलेल्या'' या मर्ढेकरांच्या कवितेच्या ओळीला दुसऱ्या हत्याकांडात मारल्या गेलेल्या ज्युंचा संदर्भ आहे. आज आमचे धर्मा पाटील गेले. उद्या आणखी कोणी जाईल. जात राहतील... 'उडदामाजी काळे गोरे' म्हणण्याची आपली सवय आहे. मात्र, मंत्रालयातल्या घोटाळ्यानंतर 'उंदरामाजी काळे गोरे' म्हणायची वेळ आली आहे. गेल्यावेळी मंत्रालयात आग लागून सगळी कागदपत्रं जळाली. आता उंदरांना लालफितशाही कुरतडण्यासाठी सरकारनं उंदीर पाळले तर नवल नको. यात बिचाऱ्या मूषकराजाची बदनामी होते. तसं पाहिलं तर इंग्लंडच्या मंत्रालयातही उंदरांना आळा घालण्यासाठी मांजरी पाळल्या जातात. आपल्य़ाकडेही खडसेंनी उपहासानं जरी म्हटलं तरी, खरोखरच दोन चार मांजरी, बोके सोडले असते तरी देखील उंदरांचा उच्छाद रोखता आला होता. किंबहुना तशी प्रथा आपल्या मंत्रालयात याआधीपासून आहे. मंत्रालयातले कागदपत्रं कुरतडणाऱ्या उंदरांना रोखण्यासाठी मांजर, बोका पाळले जातात. मग हे उंदीर मारण्याचं कंत्राट हा प्रकार कशासाठी? पण कंत्राट हा आमच्या नेत्यांचा अधिकाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, त्याबद्दल न बोललेलं बरं. यावरूनच आमची व्यवस्था किती लयास गेली आहे, हे दिसून येते. आता गणरायांनीच हे कागदी उंदीर सोडले, असं उपहासानं म्हणावं लागेल. हे उंदीर खुर्चीखालची जागा भुसभुशीत केल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटी सतीश देवपूरकरांच्या चार ओळी आठवतात, बिळातले उंदीर निघाले, शिकारींस ढाण्या वाघांच्या, फडताळांची झुरळे सुद्धा पडली मागे मागे त्यांच्या! एक काफिला तो भ्याडांचा खुराड्यामधे चिवचिव करतो! कुणी खास तोतया त्यांस मग, अनाहूत सल्लेही देतो!!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, भारतात येऊन नोकरी करावी, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, भारतात येऊन नोकरी करावी, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Embed widget