एक्स्प्लोर

Krishna Janmashtami Special : श्रीकृष्णाने मथुरा सोडण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या जन्माष्टमीच्या दिवशी 'ही' रंजक गोष्ट

Krishna Janmashtami Special : तुम्हाला माहीत आहे का कृष्णाला त्यांचे जन्मस्थान मथुरा का सोडावे लागले? जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर या रंजक गोष्टीबद्दल जाणून घेऊया.

Krishna Janmashtami 2022 : कृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आज अनेक ठिकाणी जन्माष्टमी साजरी केली जात असली तरी, बहुतांश ठिकाणी 19 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. मथुरेतही 19 ऑगस्टला जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. पुराणात भगवान श्रीकृष्णाच्या अनेक रंजक कथांचा उल्लेख आहे. त्यांच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या अनेक आश्चर्यकारक घटनांबद्दल बहुतेकांना माहिती आहे. पण तुम्हाला माहीत आहे का कृष्णाला त्यांचे जन्मस्थान मथुरा का सोडावे लागले? जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर या रंजक गोष्टीबद्दल जाणून घेऊया.

कृष्णाला फार प्रिय होती त्यांची 'जन्मनगरी' 
भगवान श्रीकृष्णाचे त्यांची जन्मनगरी मथुरेवर खूप प्रेम होते. त्यांचे बालपण गोकुळ, वृंदावन, नांदगाव, बरसाणा आदी ठिकाणी गेले. क्रूर मामा कंसाचा वध केल्यानंतर त्यांनी आपल्या आई-वडिलांना तुरुंगातून मुक्त केले. जनतेच्या विनंतीवरून कृष्णाने मथुरेचे संपूर्ण राज्य आपल्या ताब्यात घेतले. तिथल्या लोकांनाही कंसासारख्या क्रूर शासकापासून स्वातंत्र्य हवे होते, पण ते इतके सोपे नव्हते. कंसाचा वध केल्यानंतर त्याचा सासरे जरासंध कृष्णाचे कट्टर शत्रू झाले. क्रूर जरासंध मगधचा अधिपती होता. हरिवंश पुराणानुसार जरासंधाला आपले साम्राज्य वाढवायचे होते. यासाठी त्याने अनेक राजांना पराभूत करून त्यांन मारले होते. कंसाचा मृत्यू झाल्यानंतर जरासंधाला कृष्णाकडून सूड घ्यायचा आणि मथुरा काबीज करायचे होते.

जरासंधाने 18 वेळा मथुरेवर हल्ला केला
पुराणानुसार, जरासंधाने 18 वेळा मथुरेवर हल्ला केला, ज्यामध्ये तो 17 वेळा अयशस्वी झाला. शेवटच्या वेळी जरासंधाने या हल्ल्यासाठी एक शक्तिशाली शासक कालयवन यालाही आपल्यासोबत घेतले. मात्र कालयवन युद्धात मारला गेला, त्यानंतर त्याच्या देशातील लोक कृष्णाचे शत्रू झाले. या वारंवार होणाऱ्या युद्धामुळे मथुरेतील सामान्य जनताही त्रस्त झाली होती. शहरातील सुरक्षा भिंतीही हळूहळू कमकुवत होत होत्या. शेवटी कृष्णाने सर्व रहिवाशांसह मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला. कृष्णाने याबाबत असे सांगितले की, ते युद्धातून पळून जाणार नाही, परंतु त्यांनी ठरविलेल्या आणि निवडलेल्या जागेनुसारच लढणार.


कृष्णाने केली द्वारका शहराची स्थापना
मथुरेतील सर्व लोकांसह कृष्ण गुजरातच्या किनार्‍यावर आले. येथे त्यांनी आपले भव्य द्वारका शहर नव्याने वसविले. लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी संपूर्ण शहराला चारही बाजूंनी मजबूत तटबंदी केली. पुराणानुसार श्रीकृष्णाने येथे 36 वर्षे राज्य केले.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Janmashtami 2022 Shubh Yog: कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी 4 ग्रह बनवत आहेत दुर्मिळ योग, जाणून घ्या याचे महत्त्व

Janmashtami 2022 : जन्माष्टमीला कृष्णाला अर्पण करा 56 प्रकारचे नैवेद्य, कशी सुरू झाली परंपरा?

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Krishna Janmashtami 2026: आज कृष्णजन्माष्टमी...बाळकृष्णाला पाळण्यात ठेवण्याचा शुभ मुहूर्त, पूजेची योग्य पद्धत, महत्त्व, उपवास कधी सोडणार? पौराणिक कथा...
आज कृष्णजन्माष्टमी...बाळकृष्णाला पाळण्यात ठेवण्याचा शुभ मुहूर्त, पूजेची योग्य पद्धत, महत्त्व, उपवास कधी सोडणार? पौराणिक कथा...
Horoscope Today 4 September 2026: आज कृष्णजन्माष्टमीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आज कृष्णजन्माष्टमीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Krishna Janmashtami 2026:  मध्यरात्रीचा जन्म.. तुरुंगाचे दरवाजे उघडले अन् यमुनेने दिला मार्ग! जन्माष्टमीच्या रात्री नेमकं काय घडलं? कृष्ण जन्माची 'ही' कथा वाचाच...
मध्यरात्रीचा जन्म.. तुरुंगाचे दरवाजे उघडले अन् यमुनेने दिला मार्ग! जन्माष्टमीच्या रात्री नेमकं काय घडलं? कृष्ण जन्माची 'ही' कथा वाचाच...
Janmashtami 2026 Wishes : गोकुळाष्टमीच्या आपल्या प्रियजनांना खास मराठमोळ्या पद्धतीने द्या हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' मेसेजेस
गोकुळाष्टमीच्या आपल्या प्रियजनांना खास मराठमोळ्या पद्धतीने द्या हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' मेसेजेस

व्हिडीओ

Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Embed widget