एक्स्प्लोर

Krishna Janmashtami Special : श्रीकृष्णाने मथुरा सोडण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या जन्माष्टमीच्या दिवशी 'ही' रंजक गोष्ट

Krishna Janmashtami Special : तुम्हाला माहीत आहे का कृष्णाला त्यांचे जन्मस्थान मथुरा का सोडावे लागले? जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर या रंजक गोष्टीबद्दल जाणून घेऊया.

Krishna Janmashtami 2022 : कृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आज अनेक ठिकाणी जन्माष्टमी साजरी केली जात असली तरी, बहुतांश ठिकाणी 19 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. मथुरेतही 19 ऑगस्टला जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. पुराणात भगवान श्रीकृष्णाच्या अनेक रंजक कथांचा उल्लेख आहे. त्यांच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या अनेक आश्चर्यकारक घटनांबद्दल बहुतेकांना माहिती आहे. पण तुम्हाला माहीत आहे का कृष्णाला त्यांचे जन्मस्थान मथुरा का सोडावे लागले? जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर या रंजक गोष्टीबद्दल जाणून घेऊया.

कृष्णाला फार प्रिय होती त्यांची 'जन्मनगरी' 
भगवान श्रीकृष्णाचे त्यांची जन्मनगरी मथुरेवर खूप प्रेम होते. त्यांचे बालपण गोकुळ, वृंदावन, नांदगाव, बरसाणा आदी ठिकाणी गेले. क्रूर मामा कंसाचा वध केल्यानंतर त्यांनी आपल्या आई-वडिलांना तुरुंगातून मुक्त केले. जनतेच्या विनंतीवरून कृष्णाने मथुरेचे संपूर्ण राज्य आपल्या ताब्यात घेतले. तिथल्या लोकांनाही कंसासारख्या क्रूर शासकापासून स्वातंत्र्य हवे होते, पण ते इतके सोपे नव्हते. कंसाचा वध केल्यानंतर त्याचा सासरे जरासंध कृष्णाचे कट्टर शत्रू झाले. क्रूर जरासंध मगधचा अधिपती होता. हरिवंश पुराणानुसार जरासंधाला आपले साम्राज्य वाढवायचे होते. यासाठी त्याने अनेक राजांना पराभूत करून त्यांन मारले होते. कंसाचा मृत्यू झाल्यानंतर जरासंधाला कृष्णाकडून सूड घ्यायचा आणि मथुरा काबीज करायचे होते.

जरासंधाने 18 वेळा मथुरेवर हल्ला केला
पुराणानुसार, जरासंधाने 18 वेळा मथुरेवर हल्ला केला, ज्यामध्ये तो 17 वेळा अयशस्वी झाला. शेवटच्या वेळी जरासंधाने या हल्ल्यासाठी एक शक्तिशाली शासक कालयवन यालाही आपल्यासोबत घेतले. मात्र कालयवन युद्धात मारला गेला, त्यानंतर त्याच्या देशातील लोक कृष्णाचे शत्रू झाले. या वारंवार होणाऱ्या युद्धामुळे मथुरेतील सामान्य जनताही त्रस्त झाली होती. शहरातील सुरक्षा भिंतीही हळूहळू कमकुवत होत होत्या. शेवटी कृष्णाने सर्व रहिवाशांसह मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला. कृष्णाने याबाबत असे सांगितले की, ते युद्धातून पळून जाणार नाही, परंतु त्यांनी ठरविलेल्या आणि निवडलेल्या जागेनुसारच लढणार.


कृष्णाने केली द्वारका शहराची स्थापना
मथुरेतील सर्व लोकांसह कृष्ण गुजरातच्या किनार्‍यावर आले. येथे त्यांनी आपले भव्य द्वारका शहर नव्याने वसविले. लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी संपूर्ण शहराला चारही बाजूंनी मजबूत तटबंदी केली. पुराणानुसार श्रीकृष्णाने येथे 36 वर्षे राज्य केले.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Janmashtami 2022 Shubh Yog: कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी 4 ग्रह बनवत आहेत दुर्मिळ योग, जाणून घ्या याचे महत्त्व

Janmashtami 2022 : जन्माष्टमीला कृष्णाला अर्पण करा 56 प्रकारचे नैवेद्य, कशी सुरू झाली परंपरा?

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 25 जूनचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरुंच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
25 जूनचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरुंच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Hindu Religion: आश्चर्यच..'या' मुस्लिम देशात देवी दुर्गेचा महिमा? तब्बल 300 वर्षांपासून अखंड ज्योत, प्राचीन मंदिराबद्दल जाणून थक्क व्हाल
आश्चर्यच..'या' मुस्लिम देशात देवी दुर्गेचा महिमा? तब्बल 300 वर्षांपासून अखंड ज्योत, प्राचीन मंदिराबद्दल जाणून थक्क व्हाल
Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
Hindu Religion: परीक्षा असो...की नोकरीसाठी मुलाखत..सर्वात आधी दही-साखर खायला का देतात? धार्मिक, आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक महत्त्व...
परीक्षा असो...की नोकरीसाठी मुलाखत..सर्वात आधी दही-साखर खायला का देतात? धार्मिक, आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक महत्त्व...

व्हिडीओ

Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY
Sanjay Raut : हे ‘नार्वेकर’ नसून ‘नॉर्वेकर’! संजय राऊत यांचा सणसणीत टोला, राहुल नार्वेकरांवर निशाणा
MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
Gold-Silver Price Today: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
FIFA World Cup Marathi Post: इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
Embed widget