एक्स्प्लोर

Astrology : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप! चक्रीवादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींचा ग्रहणांशी काय संबंध?

Earthquake & Eclipse Astrology News : ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व आहे. या भूकंपाचा संबंध चंद्रग्रहणाशी तर नाही ना? असे विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Earthquake & Eclipse Astrology News : मंगळवारी म्हणजेच काल वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) झाले. चंद्रग्रहणाच्या वेळेबाबत तसेच अनेक गोष्टींवर अनेक मत-मतांतरे पाहायला मिळाली, मात्र हे चंद्रग्रहण संपताच त्याच रात्री भारताच्या उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या (Earthquake In UP Nepal) जोरदार धक्क्याने नागरिक हादरले. या भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपामुळे अनेक जण भयभीत झाले असून सोशल मीडीयावर (Social Media) लोकं आपला अनुभव सांगताना दिसत आहे. तसेच या भूकंपाचा संबंध चंद्रग्रहणाशी तर नाही ना? असे विविध प्रश्न विचारले जात आहेत. 

भूकंप, चक्रीवादळसारख्या नैसर्गिक आपत्तींचा ग्रहणांशी संबंध आहे का?
चंद्रग्रहणाच्याच रात्री म्हणजचे मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली सहित अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतावर दिसून आला. ज्याची तीव्रता 6.3 इतकी होती.  पण भूकंप, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा ग्रहणांशी काही संबंध आहे का? नेमकं काय गणित आहे? ज्योतिषांच्या मते, चंद्रग्रहणाचा थेट संबंध भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीशी असतो. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. यापूर्वीची घटना पाहिली तर, 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण झाले होते, तेव्हा देखील दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती. ज्योतिषांच्या मते, कालही चंद्रग्रहण झाले, आणि पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. चंद्रग्रहण पूर्ण झाल्यानंतर काही तासांतच भूकंपाचे जोरदार धक्के बसले आणि पृथ्वी हादरली. प्राचीन गणिततज्ज्ञांच्या बृहत संहितेनुसार भूकंप होण्यामागे काही कारणे आहेत, ज्याचे संकेत आधीच मिळतात. यापैकी एक म्हणजे ग्रहण योग आहे. 

'या' 80 दिवसांमध्ये कधीही भूकंप येऊ शकतो?
विज्ञानातील माहितीनुसार, टेक्नोटिक प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतात आणि मग त्यातून त्सुनामी येते, तर ज्योतिषशास्त्रानुसार टेक्टोनिक प्लेट्स ग्रहांच्या प्रभावाने हलतात आणि आदळतात. भूकंपाची तीव्रता प्लेट्सवरील ग्रहांच्या प्रभावावर अवलंबून असते. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते, जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा ग्रहण होते किंवा येणार आहे, तेव्हा त्याच्या 40 दिवस आधी किंवा 40 दिवसानंतर भूकंप होतो. म्हणजेच 80 दिवसांमध्ये कधीही भूकंप येऊ शकतो. कधीकधी हा कालावधी आणखी कमी असतो आणि 15 दिवस आधी किंवा 15 दिवसांनी भूकंप होतो.

ज्योतिषशास्त्र तसेच धार्मिक मान्यता काय?
धार्मिक मान्यतांनुसार चंद्रग्रहणाचा परिणाम जल आणि समुद्रावर होतो. ग्रहण आधीच येणार्‍या नैसर्गिक आपत्तीबद्दल सूचित करतात. यावर अनेकांचा विश्वास असला तरी काहींना नसतो. साधारणपणे, सूर्यास्त होईपर्यंत आणि मध्यरात्री सूर्योदय होईपर्यंत भूकंप होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या भागात ग्रहणाचा स्पष्ट प्रभाव दिसतो, जिथे पृथ्वीच्या भूगर्भात अनेक विचित्र हालचाली जाणवतात, त्या भागात भूकंप होण्याची शक्यता जास्त असते. भूकंप पृथ्वीच्या विशेष प्लेट्सजवळच होतात. ग्रहणात ग्रह एकमेकांवर सावल्या पाडतात. ही सावली चंद्रावर पडते आणि त्याचा पृथ्वीवर, दोन्हीवर परिणाम होतो. याशिवाय, जेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडत नाहीत, तेव्हा चंद्र आणि पृथ्वी दोन्ही प्रभावित होतात. ग्रहणानंतर वाऱ्याचा वेग बदलतो. पृथ्वीवर गडगडाट आणि वादळांचा प्रभाव वाढतो. 

ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व
ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मते, ग्रहणाच्या वेळी जेव्हा पृथ्वी आणि चंद्र सूर्याच्या पुढील दिशेने एका सरळ रेषेत येतात, तेव्हा भूगर्भीय हालचालींची शक्यता वाढते. कारण त्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर होतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा सर्वात जास्त परिणाम होतो. यामुळे, पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात सर्वाधिक भरती येते आणि ग्रहणाचा प्रभाव आणखी वाढतो. गुरुत्वाकर्षण वाढल्यामुळे आणि कमी झाल्यामुळे हे भूकंप होतात, असे बोलले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

इतर महत्वाच्या बातम्या

Earthquake : दिल्ली-NCR ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र; 3 जणांचा मृत्यू

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी नवीन आठवडा थोडं सांभाळून राहा! खर्च वाढणार आहेत, वाद टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी नवीन आठवडा थोडं सांभाळून राहा! खर्च वाढणार आहेत, वाद टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींसाठी नवीन आठवडा पैसा, करिअर बाबत लाभाचा! नव्या नोकरीचे ऑफर लेटर मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ राशींसाठी नवीन आठवडा पैसा, करिअर बाबत लाभाचा! नव्या नोकरीचे ऑफर लेटर मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
Shukraditya Rajyog 2026: अखेर सुख-संपत्तीचा योग आलाच! 15 मार्चचा शुक्रादित्य राजयोगानं 3 राशींना खरं सुख कळेल, 'असं' नशीब पालटेल की, पैसा, नोकरी, प्रेम...
अखेर सुख-संपत्तीचा योग आलाच! 15 मार्चचा शुक्रादित्य राजयोगानं 3 राशींना खरं सुख कळेल, 'असं' नशीब पालटेल की, पैसा, नोकरी, प्रेम...
Surya Grahan 2026: चंद्रग्रहणानंतर आता 2026 चं दुसरं सूर्यग्रहण लवकरच! दुर्मिळ घटना घडणार, कधी होणार सूर्यग्रहण? भारतात दिसणार का?
चंद्रग्रहणानंतर आता 2026 चं दुसरं सूर्यग्रहण लवकरच! दुर्मिळ घटना घडणार, कधी होणार सूर्यग्रहण? भारतात दिसणार का?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Embed widget