एक्स्प्लोर

Astrology : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप! चक्रीवादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींचा ग्रहणांशी काय संबंध?

Earthquake & Eclipse Astrology News : ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व आहे. या भूकंपाचा संबंध चंद्रग्रहणाशी तर नाही ना? असे विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Earthquake & Eclipse Astrology News : मंगळवारी म्हणजेच काल वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) झाले. चंद्रग्रहणाच्या वेळेबाबत तसेच अनेक गोष्टींवर अनेक मत-मतांतरे पाहायला मिळाली, मात्र हे चंद्रग्रहण संपताच त्याच रात्री भारताच्या उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या (Earthquake In UP Nepal) जोरदार धक्क्याने नागरिक हादरले. या भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपामुळे अनेक जण भयभीत झाले असून सोशल मीडीयावर (Social Media) लोकं आपला अनुभव सांगताना दिसत आहे. तसेच या भूकंपाचा संबंध चंद्रग्रहणाशी तर नाही ना? असे विविध प्रश्न विचारले जात आहेत. 

भूकंप, चक्रीवादळसारख्या नैसर्गिक आपत्तींचा ग्रहणांशी संबंध आहे का?
चंद्रग्रहणाच्याच रात्री म्हणजचे मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली सहित अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतावर दिसून आला. ज्याची तीव्रता 6.3 इतकी होती.  पण भूकंप, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा ग्रहणांशी काही संबंध आहे का? नेमकं काय गणित आहे? ज्योतिषांच्या मते, चंद्रग्रहणाचा थेट संबंध भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीशी असतो. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. यापूर्वीची घटना पाहिली तर, 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण झाले होते, तेव्हा देखील दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती. ज्योतिषांच्या मते, कालही चंद्रग्रहण झाले, आणि पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. चंद्रग्रहण पूर्ण झाल्यानंतर काही तासांतच भूकंपाचे जोरदार धक्के बसले आणि पृथ्वी हादरली. प्राचीन गणिततज्ज्ञांच्या बृहत संहितेनुसार भूकंप होण्यामागे काही कारणे आहेत, ज्याचे संकेत आधीच मिळतात. यापैकी एक म्हणजे ग्रहण योग आहे. 

'या' 80 दिवसांमध्ये कधीही भूकंप येऊ शकतो?
विज्ञानातील माहितीनुसार, टेक्नोटिक प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतात आणि मग त्यातून त्सुनामी येते, तर ज्योतिषशास्त्रानुसार टेक्टोनिक प्लेट्स ग्रहांच्या प्रभावाने हलतात आणि आदळतात. भूकंपाची तीव्रता प्लेट्सवरील ग्रहांच्या प्रभावावर अवलंबून असते. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते, जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा ग्रहण होते किंवा येणार आहे, तेव्हा त्याच्या 40 दिवस आधी किंवा 40 दिवसानंतर भूकंप होतो. म्हणजेच 80 दिवसांमध्ये कधीही भूकंप येऊ शकतो. कधीकधी हा कालावधी आणखी कमी असतो आणि 15 दिवस आधी किंवा 15 दिवसांनी भूकंप होतो.

ज्योतिषशास्त्र तसेच धार्मिक मान्यता काय?
धार्मिक मान्यतांनुसार चंद्रग्रहणाचा परिणाम जल आणि समुद्रावर होतो. ग्रहण आधीच येणार्‍या नैसर्गिक आपत्तीबद्दल सूचित करतात. यावर अनेकांचा विश्वास असला तरी काहींना नसतो. साधारणपणे, सूर्यास्त होईपर्यंत आणि मध्यरात्री सूर्योदय होईपर्यंत भूकंप होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या भागात ग्रहणाचा स्पष्ट प्रभाव दिसतो, जिथे पृथ्वीच्या भूगर्भात अनेक विचित्र हालचाली जाणवतात, त्या भागात भूकंप होण्याची शक्यता जास्त असते. भूकंप पृथ्वीच्या विशेष प्लेट्सजवळच होतात. ग्रहणात ग्रह एकमेकांवर सावल्या पाडतात. ही सावली चंद्रावर पडते आणि त्याचा पृथ्वीवर, दोन्हीवर परिणाम होतो. याशिवाय, जेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडत नाहीत, तेव्हा चंद्र आणि पृथ्वी दोन्ही प्रभावित होतात. ग्रहणानंतर वाऱ्याचा वेग बदलतो. पृथ्वीवर गडगडाट आणि वादळांचा प्रभाव वाढतो. 

ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व
ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मते, ग्रहणाच्या वेळी जेव्हा पृथ्वी आणि चंद्र सूर्याच्या पुढील दिशेने एका सरळ रेषेत येतात, तेव्हा भूगर्भीय हालचालींची शक्यता वाढते. कारण त्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर होतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा सर्वात जास्त परिणाम होतो. यामुळे, पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात सर्वाधिक भरती येते आणि ग्रहणाचा प्रभाव आणखी वाढतो. गुरुत्वाकर्षण वाढल्यामुळे आणि कमी झाल्यामुळे हे भूकंप होतात, असे बोलले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

इतर महत्वाच्या बातम्या

Earthquake : दिल्ली-NCR ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र; 3 जणांचा मृत्यू

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 2 July 2026: जुलैचा दुसरा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! गुरूवारचा शुभ संयोग, दत्तगुरूंच्या कृपेने संकट टळेल, आजचे राशीभविष्य...
जुलैचा दुसरा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! गुरूवारचा शुभ संयोग, दत्तगुरूंच्या कृपेने संकट टळेल, आजचे राशीभविष्य...
Ekadashi 2026: तब्बल 2 एकादशींचा पॉवरफुल संयोग! जुलै महिना खास, 5 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळेल, तिथी, महत्त्व, उपवासाची वेळ..
तब्बल 2 एकादशींचा पॉवरफुल संयोग! जुलै महिना खास, 5 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळेल, तिथी, महत्त्व, उपवासाची वेळ..
Lucky Zodiac Signs : 2 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी
2 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget