एक्स्प्लोर

Ahmednagar : भाज्यांचे दर कडाडले; बदलत्या हवामानामुळे आवक घटल्याने दरांमध्ये वाढ

पालेभाज्या आणि फळभाज्या यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

Ahmednagar : राज्यात मागील काही दिवस अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच काहीशी परिस्थिती अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात देखील आहे. बदलत्या हवामानामुळे फळभाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या किंमतीवर झाला आहे. मंडईत भाजीपाल्यांचे भाव चांगलेच कडाडलेत. अहमदनगरमध्ये गवारीने 150 रुपये प्रति किलोचा भाव घेतला आहे. तर इतर भाज्यांचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. जिल्ह्यात कमी अधिक फरकाने सर्वत्र भाजीपाल्यांचे भाव वाढल्याचे चित्र आहे. भाजीपाल्यांचे दर सरासरी 30 ते 50 रुपये किलो असतात. हवामानातील बदलामुळे सर्व पिकांच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला. मात्र, तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकं वाढवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात या भाव वाढीमुळे काहीही पडत नसून व्यापारी एका दिवसात 20 ते 40 टक्के नफा कमवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे आवक घटल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत, मागील काही दिवसांपासून गवार, शेवगा यांची आवक फारच कमी होत आहे. त्यामुळे ठोक बाजारात गवारीला 110 ते 120 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे तर शेवग्याला 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे भाव मिळत आहेत असं व्यापारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. आवक आणि मागणीचा समतोल राखण काहीसं कठीण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
बाजारात भाज्यांचे भाव जरी वाढले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे शेतकरी 
रमेश खामकर यांनी म्हटले आहे. लागवड,  फवारणी , मजुरी यांचा खर्च वजा केला असता शेतकऱ्यांना केवळ 4 ते 5 रुपये मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

भाज्यांचे  होलसेल-किरकोळ  भाव खालील प्रमाणे
गवार - 110 रुपये (होलसेल) - 150 रुपये  (किरकोळ) 
शेवगा-  80 रुपये (होलसेल) -  120 (किरकोळ)
कारले-  50 (होलसेल)- 80 (किरकोळ)
बटाटा-  25 (होलसेल)- 30 (किरकोळ)
टोमॅटो-  22 (होलसेल)- 40(किरकोळ)
वाटाणा- 20 (होलसेल)- 30(किरकोळ)
मिरची - 60 (होलसेल)- 80 (किरकोळ)
सिमला मिरची- 50 (होलसेल)- 80 (किरकोळ)

तीन ते चार महिने पीक सांभाळून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळवणे जिकरीचे झाले आहे,शेतमजुरांना तीनशे रुपये मंजुरी मिळते. मात्र, किरकोळ बाजारात भाजीला 100 रुपये किलोचा भाव आहे त्यामुळे ग्राहकांच्या खिसालाही हे दर परवडणारे नाहीत. मात्र, व्यापारी मोठा नफा कमवून मोकळे होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget