एक्स्प्लोर

हापूस आंब्यावर निसर्गाची अवकृपा, अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात

सिंधुदुर्ग : कोकणची अर्थव्यवस्था असलेल्या हापूस आंबा संकटात सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील देवगडच्या किनारपट्टी भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार अडचणी सापडले आहेत.

सिंधुदुर्ग : कोकणची अर्थव्यवस्था असलेल्या हापूस आंबा (Alpanso Mango) संकटात सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील देवगडच्या किनारपट्टी भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार अडचणी सापडले आहेत. किनारपट्टी भागांतील देवगड, मालवण, वेंगुर्ले हे तालुके सिंधुदुर्गातील आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आता अवकाळी पावसाच्या अवकृपेमुळे आंब्यावर केलेल्या औषध फवारण्या वाया गेल्या परिणामी खर्च वाढला आहे. आंब्याचा मोहोर काळा पडतो किंवा आंब्याला झालेली फळधारणा गळून पडते वाया जातेय. 

गेल्या काही वर्षांत ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात अवकाळी पाऊस पडत आहे. तर यावर्षी जानेवारीमध्ये देवगड पट्ट्यात 7 आणि 8 तारीखेला अवकाळी पाऊस झाला. अगोदरच ऑक्टोबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं. त्यात थंडीमुळे पुन्हा आंब्याला मोहोर आला तर काही ठिकाणी आंब्याला फळधारणा सुद्धा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकलं आहे. 
 
निसर्गाच्या अवकृपेमुळे कोकणातील हापूस आंबा उत्पादन शेतकरी अडचणीत आला असून शेतकऱ्यांच्या आशा संपुष्टात येत असल्याच्या व्यथा शेतकरी मांडत आहेत. अवकाळी पावसाच्या अवकृपेने हापूस आंब्याचं उत्पादन घटतं आहे, परिणामी दिवसेंदिवस चित्र निराशाजनक होत आहे. अवकाळी पावसामुळे मोहोर काळा पडून नाहीसा होत आहे. मात्र थंडी पडत असल्याने पुन्हा मोहोर येतो. परंतु तो मोहोर टिकवण्यासाठी सहा ते सात वेळा फवारण्या कराव्या लागत आहेत. औषध फवारण्या करून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकरी यावर्षी उत्पादन चागला मिळेल या आशेवर जगत आहे. 
 
आंबा बागेत खत, मजुरी, कीटकनाशके, रखवाली याचा खर्च उत्पादना पेक्षा जास्त होतोय. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी तोट्यात असून मेटाकुटीला आला आहे. कर्ज काढून आंबा बागायतदार औषध फवारण्या, खत व्यवस्थापन करतात. मात्र शेतकरी कर्ज काडून कर्जबाजारी होण्याची वेळ कोकणातील शेतकऱ्यांवर आली आहे. आंबा पिकावर अनेक घटक अवलंबून असतात. त्यातून अनेक उत्पादने बनवणारे कारखाने चालतात. रोजगार निर्मिती होते. मात्र आंबा पीक संकटात आल्याने त्यावर अवलंबून असलेले घटक अडचणीत सापडण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावत आहे. 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget