एक्स्प्लोर

Pandharpur Rain : पंढरपूर तालुक्यात अवकाळी पाऊस, द्राक्ष बागांना मोठा फटका, डाळिंब आणि आंबा उत्पादक शेतकरीही चिंतेत 

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका द्राक्षाच्या बागांना (Grapes crop) बसला आहे.

Pandharpur Rain News : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. याचा शेती पिकांना फटका बसत आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहे. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका द्राक्षाच्या बागांना (Grapes crop) बसला आहे. पावसाचे पाणी द्राक्षाच्या घडात जाऊन मणी गळायला सुरुवात झाली आहे. पाणी घडात राहिल्यानं आता कुजीने हे घड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच डाळिंब आणि आंबा उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत.  

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, करकंब, खर्डी परिसरात जोरदार पाऊस

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्री वादळाचा परिणाम महाराष्ट्र राज्यातही दिसून येत आहे. वादळाच्या स्थितीमुळं राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. तर कुठे ढगाळ हवामान असल्यानं फळ बागायतदार शेतकरी धास्तावला आहे. काल सायंकाळी पंढरपूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळं द्राक्ष बागांना फटका बसला आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, करकंब, खर्डी परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. द्राक्ष बागेत माल कमी असताना आता या पावसानं झाडांना लागलेला फुलोरा गाळून पडू लागला आहे. याशिवाय पाणी घडात जाऊन मणी गळायला सुरुवात झाली आहे. हे पाणी घडात राहिल्यानं आता कुजीने हे घड पडणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

फवारणीसाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागणार

या पावसाच्या फटक्यातून वाचलेल्या द्राक्ष बागांना दवण्या आणि भुरीपासून वाचण्यासाठी पुन्हा हजारो रुपयांची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळं बळीराजा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या चार वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकरी विविध कारणाने संकटात सापडत आहे. त्यामुळं अडचणीत असणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेत येऊन सरसकट पंचनामे करावेत. तसेच शासनानं नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.

अवकाळी पावसाचा आंबा पिकावरही परिणाम

कासेगाव, करकंब हे द्राक्ष उत्पादक हब म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. मात्र, सातत्यानं येणाऱ्या नैसर्गिक संकटाने ही ओळख आता पुसायची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. द्राक्षासोबतच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला असून, पुन्हा तेल्या आणि मर रोगानं द्राक्ष आणि डाळिंब बागा वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच अनेक ठिकाणी सध्या आंब्याला मोहोर लागला आहे. या पावसानं मोहोर गळून पडू लागल्यानं आंबा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आहे. ज्वारीच्या पेरण्या अनेक ठिकाणी लांबल्या असल्या तरी ज्या ठकाणी ज्वारी येऊ लागली आहे, तिथे दाणे काळे पडण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. गहू आणि हरभरा उत्पादक शेतकरी देखील या पावसामुळं अडचणीत आले आहेत. सध्या गव्हावर तांबवा रोगाची भीती वाढली आहे. अजून तीन ते चार दिवस हा अवकाळी पाऊस राहिल्यास फळबागायत शेतकऱ्यांना पुन्हा फवारणीसाठी जादाचे लाख ते दीड लाख रुपये फवारणीसाठी घालवावे लागणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Mango farmers : बदलत्या वातावरणाचा हापूसला फटका, आंब्याची फळ प्रक्रिया विस्कळीत; लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
Maharashtra Weather Update: मोठी बातमी : IMD च्या दुसऱ्या अंदाजाने धाकधूक वाढली, महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाट अधिक
IMD च्या दुसऱ्या अंदाजाने धाकधूक वाढली, महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाट अधिक
मंत्रीमंडळानं घेतला शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका, कांदाप्रश्नी आज तोडगा निघाला तर ठिक नाहीतर...रोहित पवारांचा सरकारला इशारा
मंत्रीमंडळानं घेतला शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका, कांदाप्रश्नी आज तोडगा निघाला तर ठिक नाहीतर...रोहित पवारांचा सरकारला इशारा

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Embed widget