ह्रदयद्रावक... हिंगोलीच्या शेतकऱ्यानं स्वत:ला शेतातच घेतलं जाळून, भावानं सांगितली कर्जबाजारीपणाची व्यथा
Hingoli Crime News : आज हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील साळवा गावातील शेतकरी दत्तराव माखणे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
Hingoli Crime News : राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटालून शेतकरी आत्महत्या करत आहेत. आज हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील साळवा गावातील शेतकरी दत्तराव माखणे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शेतातील कापसाच्या पराठ्यावर स्वतःला पेटवून घेत त्यांनी आत्महत्या केली आहे
कापसाच्या पराठ्यांवर बसून स्वतःला पेटवून घेतलं
कळमनुरी तालुक्यातील साळावा येथील अल्पभूधारक शेतकरी दत्तराव माखणे यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँक आणि खाजगी सावकाराचे कर्ज होते या कर्जाला दत्तराव माखणे त्रासले होते. दिवसें दिवस कर्ज वाढत होते. परंतू, शेतातून उत्पन्न मात्र एकही रुपया होत नव्हता. या विवंचनेतून दत्तराव माखणे सतत कुटुंबियांना या कर्जाबाबत चर्चा करायचे. याच कर्जाच्या विवंचनेतून काल सायंकाळच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या शेतात जात कापसाच्या पराठ्यांवर बसून स्वतःला पेटवून घेतलं आहे. या घटनेमध्ये शेतकरी दत्तात्रय माखणे पूर्णपणे जळाले गेले होते या घटनेची नोंद कळमनुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई-वडील रागविल्याने एकुलत्या एका मुलानं संपवलं जीवन
आई-वडील रागविल्याने एकुलत्या एक मुलाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. विराज हरिदास भगत असे 21 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटना आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावात घडली आहे. घरातील कामाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरून विराजचे आई-वडील त्याच्यावर रागावले होते. याच रागातून विराजने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतात गेलेल्या बहिणीला ही बाब निदर्शनास आल्यानंतर सदरील घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच आई-वडील त्या ठिकाणी दाखल झाले. गळफास घेतलेली दोरी कापून विराजला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शुल्लक कारणावरून विराजने आपले जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक माहिती घेतली जात आहे.
प्रियकराने चरित्र्यावर संशय घेतल्यानं तरुणीनं गळफास लावून संपवलं जीवन






















