एक्स्प्लोर

Farmer Protest: संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आक्रमक, 10 मार्चनंतर रामलीला मैदानावर करणार आंदोलन?

विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

Farmer Protest : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी तब्बल वर्षभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले होते. केंद्र सरकारने कायदे रद्द केल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, सरकारने त्यावेळी शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देखील शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत लवकरच संयुक्त किसान मोर्चाची बैठक देखील होणार आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर पुन्हा एकदा शेतकरी त्यांच्या अन्य मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. हमीभावासह उर्वरित मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी केली आहे. 10 मार्चनंतर शेतकरी संघटना दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाबमधील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदानाचा 10 मार्चला निकाल लागणार आहे. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाचा आंदोलन करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत ज्या शेतकरी संघटना सामील झाल्या आहेत, त्या देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. आंदोलन पुन्हा सुरू करण्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या संघटनांनाही बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे. दरम्याान, याबाबत किसान सभेचे अध्यक्ष सतनाम सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. आमच्या उर्वरित मागण्यांमध्ये हमीभावाचा कायदा, आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर नोंदवलेले पंचनामे, लखीमपूर खीरी प्रकरणात मंत्र्यांच्या मुलाची अटक, 700 हून अधिक शेतकऱ्यांच्या मृत्यूची भरपाई यांचा समावेश आहे. आमच्या या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सध्या देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान प्रक्रिया पार पडसी आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे चार टप्पे झाले आहेत. तर मणिपूरमध्ये आणखी मतदान प्रक्रिया झालेली नाही. अशातच आता संयुक्त किसान मोर्चाचे नेते पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी तब्बल वर्षभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले होते. केंद्र सरकारने कायदे केल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या अन्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देखील सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, अद्याप त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा संयुक्क किसान मोर्चाचे नेते आक्रमक झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget