एक्स्प्लोर

Farmer Protest: संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आक्रमक, 10 मार्चनंतर रामलीला मैदानावर करणार आंदोलन?

विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

Farmer Protest : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी तब्बल वर्षभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले होते. केंद्र सरकारने कायदे रद्द केल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, सरकारने त्यावेळी शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देखील शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत लवकरच संयुक्त किसान मोर्चाची बैठक देखील होणार आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर पुन्हा एकदा शेतकरी त्यांच्या अन्य मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. हमीभावासह उर्वरित मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी केली आहे. 10 मार्चनंतर शेतकरी संघटना दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाबमधील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदानाचा 10 मार्चला निकाल लागणार आहे. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाचा आंदोलन करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत ज्या शेतकरी संघटना सामील झाल्या आहेत, त्या देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. आंदोलन पुन्हा सुरू करण्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या संघटनांनाही बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे. दरम्याान, याबाबत किसान सभेचे अध्यक्ष सतनाम सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. आमच्या उर्वरित मागण्यांमध्ये हमीभावाचा कायदा, आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर नोंदवलेले पंचनामे, लखीमपूर खीरी प्रकरणात मंत्र्यांच्या मुलाची अटक, 700 हून अधिक शेतकऱ्यांच्या मृत्यूची भरपाई यांचा समावेश आहे. आमच्या या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सध्या देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान प्रक्रिया पार पडसी आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे चार टप्पे झाले आहेत. तर मणिपूरमध्ये आणखी मतदान प्रक्रिया झालेली नाही. अशातच आता संयुक्त किसान मोर्चाचे नेते पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी तब्बल वर्षभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले होते. केंद्र सरकारने कायदे केल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या अन्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देखील सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, अद्याप त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा संयुक्क किसान मोर्चाचे नेते आक्रमक झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Embed widget