एक्स्प्लोर

Raju shetti : सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली; आता संघर्ष अटळ, राजू शेट्टींचा इशारा

उसासाठी देण्यात येणारी एफआरपी (FRP) दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.

Raju shetti : राज्य सरकारने उसासाठी देण्यात येणारी एफआरपी (FRP) दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर राज्यातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दराच्या एफआरपीचे तुकडे केलेल्या शासन निर्णयाची होळी  करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली आहे.  या आघाडीच्या विरोधात संघर्ष अटळ असून, याची जबर किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राज्य सरकारने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मातीत घालणारा निर्णय घेतला आहे. दोन टप्यात एफआरपी देण्याचा कायदा करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा कायदा करत असताना दरोडेखोर कारखानदारांना पाठिशी घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामानंतर रिकव्हरी काढून त्याचा हिशोब करून मग शेतकऱ्यांना उर्वरीत एफआरपी देण्याचा कायदा आपण केलेला आहे. तुमच्याच पक्षाचे प्रांताध्यक्ष असलेले व दोन टप्यात एफआरपी देण्याचे जनक असलेले जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याची गेल्या  काही वर्षातील रिकव्हरी काय होती हे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
 
राजारामबापू साखर कारखान्याची गेल्या काही वर्षातील रिकव्हरी 

सन 2016/17 मध्ये 12.80
सन 2017/18 मध्ये 12.82
 सन 2018/19 मध्ये 12.90 
सन 2019/20 मध्ये 12.90   
व सन 2020 /21 मध्ये 12.76 

गेल्या पाच वर्षातील जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याची इतकी रिकव्हरी आहे. कारखान्याची जास्तीत जास्त रिकव्हरी 12.90 असून कमीत कमी 12.76 आहे. म्हणजेच या कारखान्याचा 12.90 उताऱ्याला तोडणी वाहतूक वजा जाता 3 हजार 34 रुपये दर असून कमीत कमी रिकव्हरी असेलेल्या उताऱ्यास म्हणजे 12.76 रिकव्हरीस 3 हजार 22 रुपये एफआरपी मिळणार आहे. म्हणजे हिशोब केल्यानंतर एफआरपीच्या रकमेत 12 रुपयांचा फरक पडणार आहे. कारण तोडणी वाहतूक ही गेल्या वर्षाचीच धरली जाणार आहे. या 12 रुपये फरकासाठी शेतकऱ्यांना 16 ते 18 महिने थांबावे लागणार असल्याचे राजू शेट्टींनी म्हटले आहे.
 
जर कापूस घेणारा व्यापारी  कापसापासून कापड विकून हिशोब करुन मगच पैसे देतो असे म्हणत कोणताच व्यापारी आजपर्यंत आपल्याकडे आलेला नाही. भात उत्पादक शेतकऱ्यांकडून भात खरेदी करून त्याचा तांदूळ करून  हिशोबानंतर तो विकून मगच पैसे देतो असा कोणताच व्यापारी आपल्याकडे सांगत आला नाही. सोयाबीन खरेदी करणारा व्यापारी सोयाबीन विकून त्याची  डीओसी करुन त्याचे तेल विकून मगच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देतो असे म्हणत कोणताच व्यापारी आजपर्यंत आपल्याकडे आलेला नाही. मग साखर कारखानदारांचे एवढे लाड कशासाठी असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, या सर्व गोष्टीकडे आपण ध्रुतराष्ट्रासारखे न बघता दरोडेखोर कारखानदारांच्या पाठिशी न राहता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. दोन टप्यात एफआरपी देण्याचा कायदा तातडीने रद्द करावा ही मागणी करण्याचा नैतिक अधिकार राज्यातील शेतकऱ्यांना आहे. कारण हाच शेतकरी आपल्याला 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या महाविकास आघाडीच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget