एक्स्प्लोर

Raju shetti : सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली; आता संघर्ष अटळ, राजू शेट्टींचा इशारा

उसासाठी देण्यात येणारी एफआरपी (FRP) दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.

Raju shetti : राज्य सरकारने उसासाठी देण्यात येणारी एफआरपी (FRP) दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर राज्यातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दराच्या एफआरपीचे तुकडे केलेल्या शासन निर्णयाची होळी  करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली आहे.  या आघाडीच्या विरोधात संघर्ष अटळ असून, याची जबर किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राज्य सरकारने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मातीत घालणारा निर्णय घेतला आहे. दोन टप्यात एफआरपी देण्याचा कायदा करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा कायदा करत असताना दरोडेखोर कारखानदारांना पाठिशी घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामानंतर रिकव्हरी काढून त्याचा हिशोब करून मग शेतकऱ्यांना उर्वरीत एफआरपी देण्याचा कायदा आपण केलेला आहे. तुमच्याच पक्षाचे प्रांताध्यक्ष असलेले व दोन टप्यात एफआरपी देण्याचे जनक असलेले जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याची गेल्या  काही वर्षातील रिकव्हरी काय होती हे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
 
राजारामबापू साखर कारखान्याची गेल्या काही वर्षातील रिकव्हरी 

सन 2016/17 मध्ये 12.80
सन 2017/18 मध्ये 12.82
 सन 2018/19 मध्ये 12.90 
सन 2019/20 मध्ये 12.90   
व सन 2020 /21 मध्ये 12.76 

गेल्या पाच वर्षातील जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याची इतकी रिकव्हरी आहे. कारखान्याची जास्तीत जास्त रिकव्हरी 12.90 असून कमीत कमी 12.76 आहे. म्हणजेच या कारखान्याचा 12.90 उताऱ्याला तोडणी वाहतूक वजा जाता 3 हजार 34 रुपये दर असून कमीत कमी रिकव्हरी असेलेल्या उताऱ्यास म्हणजे 12.76 रिकव्हरीस 3 हजार 22 रुपये एफआरपी मिळणार आहे. म्हणजे हिशोब केल्यानंतर एफआरपीच्या रकमेत 12 रुपयांचा फरक पडणार आहे. कारण तोडणी वाहतूक ही गेल्या वर्षाचीच धरली जाणार आहे. या 12 रुपये फरकासाठी शेतकऱ्यांना 16 ते 18 महिने थांबावे लागणार असल्याचे राजू शेट्टींनी म्हटले आहे.
 
जर कापूस घेणारा व्यापारी  कापसापासून कापड विकून हिशोब करुन मगच पैसे देतो असे म्हणत कोणताच व्यापारी आजपर्यंत आपल्याकडे आलेला नाही. भात उत्पादक शेतकऱ्यांकडून भात खरेदी करून त्याचा तांदूळ करून  हिशोबानंतर तो विकून मगच पैसे देतो असा कोणताच व्यापारी आपल्याकडे सांगत आला नाही. सोयाबीन खरेदी करणारा व्यापारी सोयाबीन विकून त्याची  डीओसी करुन त्याचे तेल विकून मगच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देतो असे म्हणत कोणताच व्यापारी आजपर्यंत आपल्याकडे आलेला नाही. मग साखर कारखानदारांचे एवढे लाड कशासाठी असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, या सर्व गोष्टीकडे आपण ध्रुतराष्ट्रासारखे न बघता दरोडेखोर कारखानदारांच्या पाठिशी न राहता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. दोन टप्यात एफआरपी देण्याचा कायदा तातडीने रद्द करावा ही मागणी करण्याचा नैतिक अधिकार राज्यातील शेतकऱ्यांना आहे. कारण हाच शेतकरी आपल्याला 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या महाविकास आघाडीच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
Embed widget