एक्स्प्लोर

Wheat Flour Export : वाढत्या किंमती रोखण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध, केंद्र सरकारचा निर्णय   

अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर (Wheat Flour Export) निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Wheat Flour Export : गव्हाच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारनं (Central Government) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर (Wheat Flour Export) निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची (Cabinet Committee on Economic Affairs ) बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

परकीय व्यापार महासंचालनालय (Directorate General of Foreign Trade) याबाबत अधिसूचना जारी करणार असल्याची माहिती सरकारी पत्रकात दिली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. केंद्राने म्हटले आहे की दोन्ही देश हे गव्हाचे प्रमुख निर्यातदार  आहेत.  या दोन्ही देशांचा जागतिक गव्हाच्या व्यापारात सुमारे 1/4 भाग आहेत. मात्र, त्यांच्यात सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळे जागतिक गहू पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अशातच भारतीय गव्हाची मागणी वाढली आहे. त्यामुळं देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. देशातील 1.4 अब्ज लोकांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता असे देखील सरकारनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

गव्हाच्या मागणीत मोठी वाढ

गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळं, विदेशी बाजारपेठांमध्ये गव्हाच्या पिठाची मागणी वाढली आहे. एप्रिल ते जुलै 2022 मध्ये 2021 च्या तुलनेत गव्हाच्या पिठाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या पिठाच्या वाढत्या मागणीमुळं देशांतर्गत बाजारात गव्हाच्या पिठाच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती केंद्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पूर्वी, गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी किंवा कोणतेही निर्बंध न ठेवण्याचे धोरण होते. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि देशात गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या निर्यात धोरणात बदल करणे आवश्यक होते, असे सरकारनं म्हटलं आहे.

13 मे 2022 ला गव्हाच्या निर्यातीवर घातली होती बंदी

देशाची एकूण अन्न सुरक्षा व्यवस्थित करण्यासाठी आणि शेजारील असुरक्षित देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सरकारने गव्हाच्या निर्यातीवर 13 मे रोजी बंदी घातली होती. केंद्र सरकारनं इतर देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि त्यांच्या सरकारांच्या विनंतीनुसार निर्यातीस परवानगी दिली जाईल, असेही म्हटले आहे. निर्यातबंदीमुळे गहू उत्पादकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे का? असे कृषीमंत्री  तोमर यांना विचारले असता ते म्हणाले की, गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. कारण गव्हाच्या निर्यातीवर बंदी असतानाही शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget