एक्स्प्लोर

Kolhapur: कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची रत्नागिरीत अडवणूक; कोरोनाचे कारण सांगत प्रशासनाची बंदी

कोल्हापुरातील छोटे व्यापारी आठवडी बाजाराच्या निमित्ताने रोज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जात असतात. मात्र त्यांना कोरोनाचे कारण सांगत जिल्ह्यात प्रवेश नाकारला जातोय. 

कोल्हापूर: जिल्ह्यातून आठवडी बाजारासाठी रत्नागिरीत जाणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून अडवणूक केली जात असल्याच समोर येतंय. कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत गेल्या महिन्याभरापासून या किरकोळ व्यापाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात येतोय. या प्रकारामुळे सुमारे आठशे ते हजार व्यापाऱ्यांना फटका बसत असून याचा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीवर देखील परिणाम झालाय.

कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहुवाडी, पन्हाळा, राधानगरी आजरा, चंदगड अशा तालुक्यातील अनेक किरकोळ व्यापारी रोज आठवडी बाजाराच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात जात असतात. पालेभाज्या, कडधान्य,फळ असा माल रोज कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधून खरेदी करून ते रत्नागिरी जिल्ह्यातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी जाऊन विकतात. जवळपास आठशे ते हजार किरकोळ व्यापारीच नाही तर या निमित्ताने टेम्पो चालक, हमाल यांच्याही हाताला काम मिळतेय. मात्र गेल्या महिन्याभरापासून हा सगळा व्यवहार ठप्प झालाय. आणि याला कारण ठरलाय रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला एक आदेश.

रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काढलेल्या आदेशानुसार इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना रत्नागिरीच्या आठवडी बाजारामध्ये येता येणार नाही. राज्यात कोठेही जिल्हा बंदी नसताना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतंय.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या या किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय आता कुठे सुरळीत होत होता. अशातच रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे या व्यापाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारला जातोय. हा निर्णय मागे घेतला जावा यासाठी हे व्यापारी गेल्या महिन्याभरापासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत.

दरम्यान, किरकोळ व्यापाऱ्यांना केलेल्या जिल्हा प्रवेश बंदीचा फटका फक्त व्यापाऱ्यांनाच नाही तर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला देखील बसतोय. मुळात गेल्या काही दिवसापासून बाजार समितीमधील मालाची आवक कमी झालीय. परिणामी फळ आणि पालेभाज्यांची दर देखील खाली आलेत. याच्या कारणांचा शोध कृषी उत्पन्न बाजार समितीनं घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रवेश बंदीचं हे प्रकरण समोर आलं.

राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने काही दिवसापूर्वी घातलेले कडक निर्बंध पुन्हा शिथिल करण्यात आलेत. शिवाय भाजीपाला कमी दरात मिळत असल्याने, रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांनाही गरज असताना कोल्हापूर आणि परिसरातीलच व्यापाऱ्यांची अडवणूक कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय.

महत्त्वाच्या बातम्या : 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शेती आपली आई, तिला रासायनिक खतांपासून वाचवावं लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन
शेती आपली आई, तिला रासायनिक खतांपासून वाचवावं लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन
Onion Farmers: कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो भाव! 73 पोती कांदा विकून हाती आले 400 रुपये; वाढत तापमान अन् अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकरी आले रडकुंडीला
कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो भाव! 73 पोती कांदा विकून हाती आले 400 रुपये; वाढत तापमान अन् अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकरी आले रडकुंडीला
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर, किलोला मिळतोय फक्त 50 पैशांचा दर, सरकारने दिलासा द्यावा अन्यथा... शेतकरी आक्रमक
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर, किलोला मिळतोय फक्त 50 पैशांचा दर, सरकारने दिलासा द्यावा अन्यथा... शेतकरी आक्रमक
सलग दुसऱ्या दिवशी वातावरणात मोठा बदल, तळकोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
सलग दुसऱ्या दिवशी वातावरणात मोठा बदल, तळकोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget