एक्स्प्लोर

Kolhapur: कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची रत्नागिरीत अडवणूक; कोरोनाचे कारण सांगत प्रशासनाची बंदी

कोल्हापुरातील छोटे व्यापारी आठवडी बाजाराच्या निमित्ताने रोज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जात असतात. मात्र त्यांना कोरोनाचे कारण सांगत जिल्ह्यात प्रवेश नाकारला जातोय. 

कोल्हापूर: जिल्ह्यातून आठवडी बाजारासाठी रत्नागिरीत जाणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून अडवणूक केली जात असल्याच समोर येतंय. कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत गेल्या महिन्याभरापासून या किरकोळ व्यापाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात येतोय. या प्रकारामुळे सुमारे आठशे ते हजार व्यापाऱ्यांना फटका बसत असून याचा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीवर देखील परिणाम झालाय.

कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहुवाडी, पन्हाळा, राधानगरी आजरा, चंदगड अशा तालुक्यातील अनेक किरकोळ व्यापारी रोज आठवडी बाजाराच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात जात असतात. पालेभाज्या, कडधान्य,फळ असा माल रोज कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधून खरेदी करून ते रत्नागिरी जिल्ह्यातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी जाऊन विकतात. जवळपास आठशे ते हजार किरकोळ व्यापारीच नाही तर या निमित्ताने टेम्पो चालक, हमाल यांच्याही हाताला काम मिळतेय. मात्र गेल्या महिन्याभरापासून हा सगळा व्यवहार ठप्प झालाय. आणि याला कारण ठरलाय रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला एक आदेश.

रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काढलेल्या आदेशानुसार इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना रत्नागिरीच्या आठवडी बाजारामध्ये येता येणार नाही. राज्यात कोठेही जिल्हा बंदी नसताना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतंय.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या या किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय आता कुठे सुरळीत होत होता. अशातच रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे या व्यापाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारला जातोय. हा निर्णय मागे घेतला जावा यासाठी हे व्यापारी गेल्या महिन्याभरापासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत.

दरम्यान, किरकोळ व्यापाऱ्यांना केलेल्या जिल्हा प्रवेश बंदीचा फटका फक्त व्यापाऱ्यांनाच नाही तर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला देखील बसतोय. मुळात गेल्या काही दिवसापासून बाजार समितीमधील मालाची आवक कमी झालीय. परिणामी फळ आणि पालेभाज्यांची दर देखील खाली आलेत. याच्या कारणांचा शोध कृषी उत्पन्न बाजार समितीनं घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रवेश बंदीचं हे प्रकरण समोर आलं.

राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने काही दिवसापूर्वी घातलेले कडक निर्बंध पुन्हा शिथिल करण्यात आलेत. शिवाय भाजीपाला कमी दरात मिळत असल्याने, रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांनाही गरज असताना कोल्हापूर आणि परिसरातीलच व्यापाऱ्यांची अडवणूक कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय.

महत्त्वाच्या बातम्या : 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
Embed widget