एक्स्प्लोर

Kolhapur: कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची रत्नागिरीत अडवणूक; कोरोनाचे कारण सांगत प्रशासनाची बंदी

कोल्हापुरातील छोटे व्यापारी आठवडी बाजाराच्या निमित्ताने रोज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जात असतात. मात्र त्यांना कोरोनाचे कारण सांगत जिल्ह्यात प्रवेश नाकारला जातोय. 

कोल्हापूर: जिल्ह्यातून आठवडी बाजारासाठी रत्नागिरीत जाणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून अडवणूक केली जात असल्याच समोर येतंय. कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत गेल्या महिन्याभरापासून या किरकोळ व्यापाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात येतोय. या प्रकारामुळे सुमारे आठशे ते हजार व्यापाऱ्यांना फटका बसत असून याचा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीवर देखील परिणाम झालाय.

कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहुवाडी, पन्हाळा, राधानगरी आजरा, चंदगड अशा तालुक्यातील अनेक किरकोळ व्यापारी रोज आठवडी बाजाराच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात जात असतात. पालेभाज्या, कडधान्य,फळ असा माल रोज कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधून खरेदी करून ते रत्नागिरी जिल्ह्यातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी जाऊन विकतात. जवळपास आठशे ते हजार किरकोळ व्यापारीच नाही तर या निमित्ताने टेम्पो चालक, हमाल यांच्याही हाताला काम मिळतेय. मात्र गेल्या महिन्याभरापासून हा सगळा व्यवहार ठप्प झालाय. आणि याला कारण ठरलाय रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला एक आदेश.

रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काढलेल्या आदेशानुसार इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना रत्नागिरीच्या आठवडी बाजारामध्ये येता येणार नाही. राज्यात कोठेही जिल्हा बंदी नसताना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतंय.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या या किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय आता कुठे सुरळीत होत होता. अशातच रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे या व्यापाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारला जातोय. हा निर्णय मागे घेतला जावा यासाठी हे व्यापारी गेल्या महिन्याभरापासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत.

दरम्यान, किरकोळ व्यापाऱ्यांना केलेल्या जिल्हा प्रवेश बंदीचा फटका फक्त व्यापाऱ्यांनाच नाही तर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला देखील बसतोय. मुळात गेल्या काही दिवसापासून बाजार समितीमधील मालाची आवक कमी झालीय. परिणामी फळ आणि पालेभाज्यांची दर देखील खाली आलेत. याच्या कारणांचा शोध कृषी उत्पन्न बाजार समितीनं घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रवेश बंदीचं हे प्रकरण समोर आलं.

राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने काही दिवसापूर्वी घातलेले कडक निर्बंध पुन्हा शिथिल करण्यात आलेत. शिवाय भाजीपाला कमी दरात मिळत असल्याने, रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांनाही गरज असताना कोल्हापूर आणि परिसरातीलच व्यापाऱ्यांची अडवणूक कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Embed widget