एक्स्प्लोर

सिंचन विभागाच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका, पाण्याअभावी गहू जळण्याच्या मार्गावर

सिंचन विभागाच्या आडमुठ धोरणाचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना बसत आहे. सिंचन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतातील उभे पीक वाया जाण्याचा मार्गावर आहे.

यवतमाळ : शेतकऱ्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो. एकीकडे येणारी नैसर्गीक संकटे तर दुसरीकडे असणारी सरकारची धोरणे याचा वेळोवेळी फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता सिंचन विभागाच्या आडमुठ धोरणाचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना बसत आहे. सिंचन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतातील उभे पीक वाया जाण्याचा मार्गावर असल्याने तेथील बळीराजा संकटात सापडला आहेय 

गव्हाचे पीक जळण्याच्या मार्गावर

पुसद येथील बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या धोरणाचा फटका बसत असून रब्बी हंगामातील गहू पीक जळण्याच्या मार्गावर आहे. पूस धारणातील उजव्या कालव्याच्या भरोशावर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गहू पीक घेतले. सिंचन विभागाची रीतसर पाणीपट्टी भरूनसुद्धा बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे पीक जळण्याच्या मार्गावर आहे. सिंचन विभागाच्या उदासीन धोरणामुळे कालव्यातील गाळ रब्बी हंगामापूर्वी काढण्यात आला नाही. तसेच गाळ जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने गाळ काढण्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांना पाणी मिळत नसल्याचे सांगूनसुद्धा कारवाई होत नसल्याने दाद मागावी तरी कुठे? असा यक्ष प्रश्न बळीराजाला पडला आहे.

नियमाप्रमाणे आम्ही पाणी मागत आहोत, तरी ते आम्हाला पाणी देत नाहीत. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून गव्हाला पाणी नाही. आमच्या गव्हाचे पीक जळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. गेल्या 2 ते 3 वर्षापासून अशीच परिस्थिती आहे. शासनाकडून येणाऱ्या फंडातून कालव्याचे काम अधिकारी करत नाहीत. शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन कालवा साफ केला जातो अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget