एक्स्प्लोर

नेपाळनं टोमॅटोच्या बदल्यात भारताकडून काय मागितलं? जे मागितलंय त्यावर मोदी सरकारनं आधीच लादलेयत निर्बंध

टोमॅटोच्या वाढत्या किमतीत भारताच्या शेजारी देशानं मदतीचा हात पुढे केला आहे. नेपाळमधून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आयात केली जात आहे.

Tomato Import: टोमॅटोच्या (Tomato Rates) वाढलेल्या दरांनी सर्वसामान्यांना पुरतं हैराण करुन सोडलं आहे. संपूर्ण देशभरात टोमॅटोचे दर वधारल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच या अटीतटीच्या परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी शेजारील देश नेपाळ धावून आला आहे. नेपाळनं भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नेपाळमधून मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची आयात केली जात आहे. परंतु, शेजारील देश नेपाळनं भारताकडून अत्यावश्यक वस्तूंसोबतच तांदळाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. किंबहुना, देशांतर्गत बाजारपेठेतील किमती रोखण्यासाठी नुकतंच भारत सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मोदी सरकारनं उचललेल्या या पावलामुळे अनेक देशांमध्ये खळबळ माजली होती. मात्र, नेपाळच्या मागणीवर सरकारनं काय निर्णय घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

पीटीआयशी बोलताना नेपाळच्या कृषी मंत्रालयाच्या प्रवक्त्या शबनम शिवकोटी म्हणाल्या की, "नेपाळ टोमॅटो भारतात पाठवण्यास तयार आहे. त्या बदल्यात, भारत सरकारला हे सर्व टोमॅटो बाजारपेठेत सहजरित्या पोहोचवावे लागतील आणि काही जीवनावश्यक वस्तू पाठवाव्या लागतील. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळनं सरकारला पत्र लिहून टोमॅटोऐवजी तांदूळ आणि साखर निर्यात करण्याचं आवाहन भारत सरकारला केलं आहे.

नेपाळमधून येणारे टोमॅटो देशातील बाजारपेठेत पाठवले जातील, जेणेकरून टोमॅटोच्या वाढलेल्या किमती नियंत्रित ठेवता येतील, अशी माहिती मिळत आहे. जास्तीत जास्त टोमॅटो उत्तर प्रदेशात पाठवले जातील. नेपाळमधील काठमांडू, ललितपूर आणि भक्तपूरमध्ये टोमॅटोचे सर्वाधिक पीक घेतल्याची माहिती आहे. येथून टोमॅटोचा अवैध व्यापार भारतात सुरू आहे. मात्र आता सरकारनं ते स्वत:च्या हातात घेतलं आहे.

गेल्या एक-दोन महिन्यांपासून भारतात टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याची माहिती आहे. काही ठिकाणी टोमॅटो 200 रुपये, काही ठिकाणी 250 रुपये तर काही ठिकाणी 300 रुपये किलोनं विकलं जात होतं. मात्र, केंद्र सरकारनं नुकतंच अनुदानावर टोमॅटोची विक्री सुरू केली होती, त्यामुळे टोमॅटोचे भाव काही प्रमाणात आटोक्यात आले आहेत. आता दर 50 रुपये किलोपर्यंत खाली आला आहे.

घाऊक बाजारात दर घटल्याने टोमॅटो स्वस्त

केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडला (NAFED) टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याच्या सूचना दिल्या आहेत. अलीकडच्या काळात घाऊक बाजारात टोमॅटोच्या किमतीत घट झाली असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितलं आणि त्यामुळे टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इतर राज्यांत टोमॅटोची स्वस्त दरात विक्री सुरू

मंत्रालयाने सांगितलं की, 14 जुलै 2023 पासून दिल्ली-एनसीआरमध्ये स्वस्त दरात टोमॅटोची विक्री सुरू झाली आहे. 13 ऑगस्ट 2023 पर्यंत नाफेड आणि NCCFने किरकोळ बाजारात 15 लाख किलो टोमॅटोची खरेदी आणि विक्री केली आहे. दिल्ली एनसीआर व्यतिरिक्त राजस्थानमधील जोधपूर कोटा, उत्तर प्रदेशातील लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि बिहारमधील पटना, मुझफ्फरपूर, आराह, बक्सरमध्ये टोमॅटो स्वस्त दरात विकले गेले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
70 टक्के कांदा व्यापाऱ्यांच्या हातात, नाफेडने थेट शेतकऱ्यांच्या बांधावरुन खरेदी करावी, अमोल कोल्हेंची मागणी
70 टक्के कांदा व्यापाऱ्यांच्या हातात, नाफेडने थेट शेतकऱ्यांच्या बांधावरुन खरेदी करावी, अमोल कोल्हेंची मागणी

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Embed widget