एक्स्प्लोर

Ravikant Tupkar : सोयाबीनला 8 हजार 600 तर कापसाला 12 हजार 500 रुपयांचा आधारभूत भाव द्या, स्वाभिमानीची मागणी, 6 नोव्हेंबरला एल्गार मोर्चा

कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सोयाबीनला 8 हजार 600 तर कापसाला 12 हजार 500 रुपयांचा आधारभूत भाव द्यावा अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे.

Ravikant Tupkar : यावर्षी राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं यंदा पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विशेषत सोयाबीन (soybean) आणि कापूस ( cotton) पिकाला मोठा फटका बसला आहे. आता कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह कापसच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मात्र कमी होत आहेत. याकडं लक्ष देऊन सोयाबीनला किमान 8 हजार 600 आणि कापसाला 12 हजार 500 रुपये आधारभूत भाव द्यावा, अन्यथा 6 नोव्हेंबरला बुलडाण्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे.

रविकांत तुपकर यांनी केल्या विविध मागण्या

बुलडाण्यात तुपकर यांना पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सहा नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस पिकाची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या पिकासाठी लागणारा उत्पादन खर्चही वाढलेला आहे. त्या तुलनेत भाव मात्र कमी होत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ द्यावा, सोयाबीनला किमान 8 हजार 600 आणि कापसाला 12 हजार 500 रुपये आधारभूत भाव द्यावा, तसेच  पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ द्यावे  आणि सोयाबीनची आयात थांबवावी अशी विविध मागण्या तुपकर यांनी पत्रकार परिषदेत केल्या आहेत. याकडं सरकारने  5 नोव्हेंबर पर्यंत लक्ष न दिल्यास 6 नोव्हेंबरला बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती रविकांत तुपकर यांनी दिली आहे.

जयदेव ठाकरे यांना शेतीबद्दल ज्ञान आहे का? रविकांत तुपकरांचा निशाणा

 नुकत्याच मुंबई येथे झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये जयदेव ठाकरे हे शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढले त्याचा रविकांत तुपकर यांनी जाहीर निषेध केला. जयदेव ठाकरे यांना शेतीबद्दल ज्ञान आहे का? असा प्रतिप्रश्न रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला. जयदेव  ठाकरे हे जे अन्न खातात ते काही अदानी, अंबानी यांच्या कारखान्यातून येत नाही तर ते शेतकऱ्यांनी घामातून पिकवलेल्या शेतीतूनच येते याचं भान त्यांनी ठेवावं असं असा सल्लाही यावेळी तुपकर यांनी दिला. या पत्रकार परिषदेला विदर्भ स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले जिल्हाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर टाले, श्याम अवथळे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Embed widget