एक्स्प्लोर

Aamir Khan : सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी अभिनेता अमीर खानचा पुढाकार, पाणी फाऊंडेशनने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन

पाणी फाऊंडेशनसाठी काम करणारा अभिनेता अमीर खान सध्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. त्याने राज्यातील सोयाबीनचे उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे.

Aamir Khan : अभिनेता अमीर खानने राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांची नुकतीच भेट घेतली आहे. पाणी फाऊंडेशनसाठी काम करणारा अभिनेता अमीर खान सध्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. त्याने राज्यातील सोयाबीनचे उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात सर्वात अधिकच्या क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढावे, शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे, यासाठी अमीर खानच्या टीमने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सोयाबीन शाळा घेतली होती. दर रविवारी ऑनलाईन माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणी पासून ते बाजारपेठेपर्यंतचे मार्गदर्शन केले जात होते. यावेळी पाणी फाऊंडेशन सोयाबीन उत्पादन वाढीबाबत तयार केलेल्या पुस्तिकेचे दादाजी भुसे आणि अमीर खान यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
 
शेतकऱ्यांना उत्पादन घेताना येणाऱ्या अडीअडचणी आणि त्यावर मात करायची कशी याविषयी माहिती देणारे 'सोयाबिन डिजिटल शेती शाळा-पूर्व मशागत ते कापणीपर्यंत' हे पुस्तक काढले आहे. यामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला लाभ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच सोयाबीन उत्पन्न वाढीस चालना मिळेल. शेतकऱ्यांची उत्पादकता व निर्यातक्षम माल कसा वाढवता येईल यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी कृषी विभाग प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणी फाऊंडेशन कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, संचालक (संशोधन व विस्तार शिक्षण) डॉ. शरद गडाख तसेच सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार उपस्थित होते.


Aamir Khan : सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी अभिनेता अमीर खानचा पुढाकार, पाणी फाऊंडेशनने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन

आतापर्यंत महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली आहेत. दरम्यानच, या टीमच्या निदर्शनास आले की सोयाबीनचे हे मुख्य पीक असूनही त्याची उत्पादकता कशी नाही? त्याच अनुशंगाने राज्यातील कृषी विद्यापीठातील संशोधकांशी चर्चा आणि प्रत्यक्ष बांधावरची स्थिती काय आहे पाहून या पाणी फाऊंडेशनच्यावतीने एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ज्याचा वापर आता सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी होणार आहे.

सोयाबीन डिजीटल शेती शाळा हे पुस्तक ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध असणार आहे.  याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. या फार्म शाळेसाठी 46 हजार 327 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी 13 लाईव्ह प्रश्नोत्तरांच्या सत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पाणी फाऊंडेशन कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ यांनी दिली. यामध्ये 5 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून सोयाबीन उत्पन्न वाढीसाठी विविध प्रश्न विचारण्यात आले. ट्रेनिंग व्हिडीओ आणि व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात आली. यामध्ये बियाणांची निवड, उगवण क्षमता, तपासणी, बीजप्रक्रिया, पेरणी, एकात्मिक खत व्यवस्थापन, पॅकिंग, मार्केटींग  या विषयीची माहिती शेतकऱ्यांना देण्यत आल्याची माहिती  राज्यात 21 मे ते 3 ऑक्टोबर यादरम्यान, शाळेत सहभागी होऊ इच्छिनाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पॉर्म भरणे गरजेचे होते. 

राहुरी विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राचीही मदत झाल्याचे पाणी फाउंडेशनचे संस्थापक अमीर खान यांनी सांगितले. आता पुढे यावर मोठ्या प्रमाणावर काम चालणार आहे. दुष्काळी भागात आमिर खान आणि त्यांच्या टीमने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठी कामे केली आहेत. यामुळे अनेक ठिकाणचा दुष्काळ कायमचा दूर गेला आहे. आता या कामात देखील असाच फायदा शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
Vidarbha Cow Scam: पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Embed widget