एक्स्प्लोर

Agriculture News : अवकाळीमुळं खडकाळ जमिनीवर फुलवलेली आंब्याची बाग उध्वस्त, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संकटात 

नांदेड जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळं कंधार तालुक्यातील बारुळ येथील शेतकऱ्याच्या केशर आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे.

Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी (Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण बदलत्या हवामानाचा (Climate Change) शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. सध्या राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. कुठे अवकाळी तर कुठे उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळं आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी होत आहे. नांदेड जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळं कंधार तालुक्यातील बारुळ येथील शेतकऱ्याच्या केशर आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. मोठ्या कष्टानं उभारलेली बाग अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं वाया गेली आहे. 

या हंगामात तीन लाख रुपयाचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती

कंधार तालुक्यातील बारुळ येथील प्रकाश बळीराम वाखरडे या तरुण शेतकऱ्यानं व्यवसाय करत गावाकडील खडकाळ जमिनीवर तीन एकरात नैसर्गिक पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलवली आहे. केशर आंब्याला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. शिवाय चांगला भाव मिळाल्याने एका हंगामातच तीन लाख रुपयाचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपीटीने खडकाळ जमिनीवरील सगळ्या आंब्याच्या बागेचं नुकसान झालं आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी प्रकाश बळीराम वाखरडे यांना बसला आहे. 

अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार गेल्या आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं बारुळ, तालुका कंधार येथील प्रकाश बळीराम वाखरडे या शेतकऱ्याचे मोठं नुकसान केलं आहे. नांदेड येथे व्यवसाय करत असताना प्रकाश वाखरडे यांनी आपल्या शेततात केशर आंबा आणि चिकू बागेची लागवड केली होती. चागलं उत्पन्न होईल या अपेक्षेने खडकाळ जमिनीची त्यांनी चांगली देखभाल केली. मात्र, अवकाळी पावसाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं आहे. 

प्रकाश बळीराम वाखरडे यांनी खडकाळ जमिनीवर आंब्याची बाग आणि चिकूची बाग केली आहे. बागेची लागवड करताना त्यांनी खड्ड्यामध्ये पहिला थर बुरशीनाशक पावडरचा टाकला. दुसऱ्या थरामध्ये पाला पाचोळा टाकला. तिसऱ्या थरामध्ये माती टाकण्यात आली आणि चौथ्या थरामध्ये शेणखत टाकण्यात आले. शेवटी माती टाकून पुन्हा त्याला अजून दहा दिवस तळू देण्यात आले. त्यानंतर जूनमध्ये त्यांनी आपल्या शेतात तयार केलेल्या खड्ड्यामध्ये 30 बाय 30 वर 60 आंब्याची झाडे आणि 120 चिकूची झाडे नैसर्गिक पद्धतीने लागवड केली. चार वर्षे सदरच्या झाडाला फळधारणाही होऊ दिली नाही. तसेच चार वर्षमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन आणि भुईमूग घेतले होते. यावर्षी आब्याच्या बागेला चांगले फळ लागले होते. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
ह्रदयद्रावक... हिंगोलीच्या शेतकऱ्यानं स्वत:ला शेतातच घेतलं जाळून, भावानं सांगितली कर्जबाजारीपणाची व्यथा
ह्रदयद्रावक... हिंगोलीच्या शेतकऱ्यानं स्वत:ला शेतातच घेतलं जाळून, भावानं सांगितली कर्जबाजारीपणाची व्यथा
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
Devendra Fadnavis on Loan Waiver: कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget