एक्स्प्लोर

Agriculture News : अवकाळीमुळं खडकाळ जमिनीवर फुलवलेली आंब्याची बाग उध्वस्त, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संकटात 

नांदेड जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळं कंधार तालुक्यातील बारुळ येथील शेतकऱ्याच्या केशर आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे.

Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी (Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण बदलत्या हवामानाचा (Climate Change) शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. सध्या राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. कुठे अवकाळी तर कुठे उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळं आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी होत आहे. नांदेड जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळं कंधार तालुक्यातील बारुळ येथील शेतकऱ्याच्या केशर आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. मोठ्या कष्टानं उभारलेली बाग अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं वाया गेली आहे. 

या हंगामात तीन लाख रुपयाचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती

कंधार तालुक्यातील बारुळ येथील प्रकाश बळीराम वाखरडे या तरुण शेतकऱ्यानं व्यवसाय करत गावाकडील खडकाळ जमिनीवर तीन एकरात नैसर्गिक पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलवली आहे. केशर आंब्याला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. शिवाय चांगला भाव मिळाल्याने एका हंगामातच तीन लाख रुपयाचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपीटीने खडकाळ जमिनीवरील सगळ्या आंब्याच्या बागेचं नुकसान झालं आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी प्रकाश बळीराम वाखरडे यांना बसला आहे. 

अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार गेल्या आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं बारुळ, तालुका कंधार येथील प्रकाश बळीराम वाखरडे या शेतकऱ्याचे मोठं नुकसान केलं आहे. नांदेड येथे व्यवसाय करत असताना प्रकाश वाखरडे यांनी आपल्या शेततात केशर आंबा आणि चिकू बागेची लागवड केली होती. चागलं उत्पन्न होईल या अपेक्षेने खडकाळ जमिनीची त्यांनी चांगली देखभाल केली. मात्र, अवकाळी पावसाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं आहे. 

प्रकाश बळीराम वाखरडे यांनी खडकाळ जमिनीवर आंब्याची बाग आणि चिकूची बाग केली आहे. बागेची लागवड करताना त्यांनी खड्ड्यामध्ये पहिला थर बुरशीनाशक पावडरचा टाकला. दुसऱ्या थरामध्ये पाला पाचोळा टाकला. तिसऱ्या थरामध्ये माती टाकण्यात आली आणि चौथ्या थरामध्ये शेणखत टाकण्यात आले. शेवटी माती टाकून पुन्हा त्याला अजून दहा दिवस तळू देण्यात आले. त्यानंतर जूनमध्ये त्यांनी आपल्या शेतात तयार केलेल्या खड्ड्यामध्ये 30 बाय 30 वर 60 आंब्याची झाडे आणि 120 चिकूची झाडे नैसर्गिक पद्धतीने लागवड केली. चार वर्षे सदरच्या झाडाला फळधारणाही होऊ दिली नाही. तसेच चार वर्षमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन आणि भुईमूग घेतले होते. यावर्षी आब्याच्या बागेला चांगले फळ लागले होते. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget