एक्स्प्लोर

Boka Rice: थंड पाण्यात शिजणारा 'हा' जादुई भात, तुम्ही कधी खाल्लाय? आसामचा 'बोका राईस'

Assam Boka Rice: आसामचा बोका राईस... गरम नाही थंड पाण्यात शिजतो, आहे ना मॅजिक... विविधतेनं नटलेल्या भारतातील आश्चर्य असलेला 'मॅजिकल राईस'

Assam Boka Rice: भारत हा जगातील सर्वात मोठ्या तांदूळ उत्पादक देशांपैकी एक. देशात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते. तांदूळ हे खरेदी हंगामातील प्रमुख नगदी पीक असलं तरी, अनेक राज्यांमध्ये बारमाही पीक घेतलं जातं. तांदळाचे असे प्रकार आहेत, जे फक्त भारतातच पिकतात. एवढंच नाहीतर हे प्रकार संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले आहेत. भारत बासमती तांदळाचाही मोठा निर्यातदार आहे. याशिवाय, काळ्या मीठाचा तांदूळ (Kalanamak Rice) देखील सर्वात खास प्रकारांपैकी एक. कोणत्याही प्रकारचा तांदूळ असो, त्याचं उत्पादन घेण्यासोबतच तो शिजवायलाही भरपूर पाणी लागतं. भात मुख्यतः गरम पाण्यात शिजवला जातो. पण तुम्ही कधी थंड पाण्यात शिजणाऱ्या तांदळाबाबत ऐकलंय का? 

भारतात भातापासून अनेक पदार्थ बनवले जातात. बरेच लोक तांदूळ पाण्यात उकडून खातात. भात शिजवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, असा एक तांदळाचा प्रकार आपल्या देशात पिकवला जातो, ज्यासाठी तुम्हाला गरम पाणी किंवा पाणी उकळण्याची गरजच भासत नाही, तर फक्त थंड पाण्यातच हा तांदूळ शिजतो. तुम्ही म्हणाल काही काय सांगताय? पण खरंच, हा तांदूळ शिजवण्यासाठी गरम पाण्याची किंवा पाणी उकळण्याची अजिबातच गरज भासत नाही. आम्ही आसाममध्ये (Aasam News) पिकणाऱ्या मॅजिकल राईसबाबत बोलत आहोत. म्हणजेच, बोका राईस (Boka Rice) किंवा आसाम राईस (Asam Rice). 

बोका तांदूळाचं वैशिष्ट्य काय? 

आसाममध्ये पिकणारा बोका राईस मॅजिकल राईस (Magic Rice) म्हणूनही ओळखला जातो. नैसर्गिक सुबत्तेचं वरदान लाभलेल्या आसामची माती आणि तेथील हवामान यामुळे या तांदळाला एक वेगळीच चव आणि सुगंध असतो. बोका राईसची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप या भागांत प्रामुख्यानं केली जाते. 

आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजेच, जून महिन्यात बोका राईसची पेरणी केली जाते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होतं. बोका तांदूळ किंवा बोका राईसची लागवड आसामच्या डोंगराळ भागांत राहणारे आदिवासी करतात. या तांदळात 10.73% फायबर आणि 6.8% प्रोटीन असतं. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटकही असतात. जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. 

एकेकाळी बोका राईस अहोम सैनिकांचं राशन होता

इतिहासाची पानं उलटली तर बोका राईसचा एक सुवर्ण इतिहास नक्कीच वाचायला मिळेल. याच तांदळापासून शिजवण्यात आलेल्या भातानं अनेक शत्रूंचा खात्मा करण्यास मदत केली आहे. तसेच, याच तांदळाच्या मदतीनं कित्येक युद्धे जिंकायला मदत केली आहे. ही कथा 17 व्या शतकातील आहे. जेव्हा अहोम सैनिक मुघल सैन्यापासून देशाचं रक्षण करण्यासाठी बोका राईस खात होते. हा तांदूळ सैनिकांचं राशन म्हणून युद्धात नेण्यात आला होता. या तांदळाला शिजवण्याची गरज नसल्यामुळे सैनिकांना युद्धभूमीवर त्याचं सेवन करणं सोयीचं ठरत होतं.  

बोका राईस 50 ते 60 मिनिटं पाण्यात भिजवल्यानंतर भात तयार व्हायचा. हा तांदूळ बोका राईस, बोका चोले आणि ओरिझा सॅटिवा म्हणून ओळखला जातो. आसाममधील बोका तांदळापासून अनेक प्रकारचे पारंपारिक पदार्थ बनवले जातात, ज्यामध्ये बोका तांदूळ दही, गूळ, दूध, साखर किंवा इतर खाद्यपदार्थांसोबत दिला जातो.

कसा पिकवला जातो बोका राईस? 

बोका राईसचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे, जो थेट आसामशी संबंधित आहे. यामुळेच भारत सरकारनं आसाममध्ये पिकवल्या जाणाऱ्या या तांदळाला जीआय टॅगही दिला आहे. आता या तांदळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही केली जाते.

बोका राईस शिजवायला जेवढा सोपा आहे, तेवढंच अवघड तो पिकवणं आहे. अर्धा एकर शेतातून केवळ पाच पोती तांदळाचं उत्पन्न येतं. इतर तांदळाच्या जातींच्या तुलनेत हा तांदूळ 145 दिवसांत पिकून काढणीला येतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Agri Innovation: वडील डॉक्टर अन् मुलगा शेतकरी... युट्युबवरुन शिकला स्ट्रॉबेरी फार्मिंग; आता करतोय लाखोंची कमाई

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार, मंत्री मुश्रीफांची माहिती, विरोधकांवर टीका
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Gold-Silver Rate: गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Embed widget