एक्स्प्लोर

Palghar : फुलांचं गाव! पालघर जिल्ह्यातल्या 'गातेस' गावाला नवी ओळख, लाखो रुपयांची उलाढाल; वाचा सविस्तर... 

Agriculture News : पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील 'गातेस' (Gates) या गावानं  फुलशेतीतून (Flower Farming) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Agriculture News Palghar : शेतकरी (Farmers) सातत्यानं शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यामाध्यमातून चांगला नफाही मिळवत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग पालघर (Palghar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. वाडा तालुक्यातील 'गातेस' (Gates) या गावानं  फुलशेतीतून (Flower Farming) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाहुयात गातेस गावातील शेतकऱ्यांच्या फुलशेतीच्या प्रयोगाची यशोगाथा

50 ते 60 एकर क्षेत्रावर फुलशेती, आंतरपीक म्हणून भाजीपाला लागवड

पालघर जिल्ह्यात भात हे मुख्य पीक घेतलं जातं. त्यामुळं पालघर म्हटलं की, येथील शेतकरी हा भात पिकावर अवलंबून असणारा शेतकरी म्हणून ओळखला जातो. मात्र हीच ओळख वाडा तालुक्यातील गातेस या गावानं बदलत फुलशेतीतून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. गावातील 25 ते 30 शेतकऱ्यांनी एकत्र येत 50 ते 60 एकर पेक्षाही जास्त क्षेत्रावर फुलशेती आणि आंतरपीक म्हणून भाजीपाला लागवड करत जिल्ह्यात एक शेतीत नवीन आदर्श निर्माण केला आहे. 

इतर पिकांना हवामान बदलाचा फटका बसत असल्यानं फुल शेतीचा निर्णय

वाडा शहराच्या दक्षिणेस असलेलं हे गातेस गाव आहे. या गावात मागील अनेक वर्षांपासून वाडा, कोलम या वाणाची भात शेती केली जात होती. मात्र, सतत बदलणाऱ्या हवामान लहरींमुळं याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पुढे या गावातील अनेक शेतकरी हे रब्बी हंगामात हरभरा लागवडीकडे वळले होते. परंतू, कालांतराने यावरही हवामान बदलाचा परिणाम आणि उत्पादन खर्च वाढल्यानं येथील शेतकऱ्यांनी अखेर फुल शेतीचा निर्णय घेतला. गावातील 25 ते 30 शेतकऱ्यांनी एकत्र येत 50 एकर पेक्षाही जास्त क्षेत्रावर फुल शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे. या फुल उत्पादकांनी डिसेंबरच्या सुरुवातीपासून फुल शेतीची लागवड केली असून सध्या या गावात फुलशेती पासून उत्पन्न येण्यास सुरुवात झाली आहे.

आठवड्यातून दोनदा दहा हजार किलो फुलांची विक्री

मागील दहा वर्षांपासून या शेतकऱ्यांनी एकत्र येत हा अनोखा उपक्रम राबवला आहे. या फुलशेतीमुळं येथील शेतकऱ्यांची आर्थिक घडीही मजबूत होऊ लागली आहे. या गावात सध्या लाल आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांची लागवड होत असून, या फुलशेतीत आंतरपीक म्हणून टोमॅटो, भोपळा, कोबी या भाजीपाल्यांची पीक घेण्याची सुरुवात केली आहे. सध्या या गावातून आठवड्यातून दोनदा फुलांची विक्री होते. महिन्याला 25 ते 30 लाख रुपयांची उलाढाल होते. एका तोडणीला साधारण 8 ते 10 हजार किलो फुलांचे उत्पादन होते.

झेंडूच्या फुलांना प्रति किलो 40 ते 45 रुपयांचा दर

गातेस गावाने सध्या स्वतःची ओळख झेंडूच्या फुलांचे गाव अशी निर्माण केली आहे. येथील फुलं ही वाशी, मुंबई, कलकत्ता सुरत या भागात विक्रीसाठी जातात. सध्या झेंडूच्या फुलांना 40 ते 45 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. आठवडाभरात येथील एका शेतकऱ्याला 55 ते 60 हजार रुपयांचा नफा होत आहे. अवघ्या चार महिन्यात हे उत्पन्न घेतलं जात असलं तरी भात पिकापासून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा हा नफा अधिक असल्यानं येथील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर व्यापारीही जागेवर येऊन ही फुलं खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही वाचत आहे.

पर्यायी शेती केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत

पालघर जिल्ह्यात अनेक भागात रब्बी आणि हंगामी या दोन्ही वेळेस तांदळाची शेती म्हणून प्रमुख पीक पाहिलं जातं. मात्र, यातून येथील शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटत नसल्यानं या भागात स्थलांतरणाचं प्रमाणही जास्त आहे. मात्र, गातेस गावातील शेतकऱ्यांप्रमाणेच जर जिल्ह्यातील इतर शेतकरीही पर्यायी शेतीकडे वळले तर येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास वेळ लागणार नाही. 

महत्त्वाच्या बातम्या:

Valentine Day: नांदेड फुलबाजारामुळे फुलली फुलशेती, 'गुलाब' बनला तीन हजार कुटुंबांचा आधार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना"; अभिनव संकल्पना, कसे असणार कामकाज?
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेटSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देशAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना"; अभिनव संकल्पना, कसे असणार कामकाज?
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
शेअर बाजारातील घसरणीमुळं धक्के सुरुच, SIP खाती खटाखट बंद, जानेवारी महिन्यातील आकडे समोर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.