एक्स्प्लोर
Mahul Land Issue | माहूलच्या भूसंपादनावर भूमाफियांचा डोळा, भराव टाकून कांदळवनं नष्ट करण्याचा प्रयत्न
मुंबईतल्या चेंबूरनजिकच्या माहुल गावाला आधीच वायुप्रदूषणाचा विळखा पडला आहे. त्यात आता या गावाच्या भूसंपदेवरही भूमाफियांचा डोळा आहे. इथली कांदळवन आणि मोकळ्या भूखंडांवर मातीचा ढिगारा आणि कचरा टाकून पर्यावरणाची मोठी हानी करण्यात येत आहे. पण प्रशासन अजूनही ढिम्म आहे. माहुल कोळीवाड्याच्या किनारी मोठ्या प्रमाणात कांदळवनं आहेत. तसंच इथे अनेक मोकळे शासकीय भूखंडही आहेत. पण काही समाजकंटक त्यावर भराव टाकून ही कांदळवनं नष्ट करीत आहेत. शासनाच्या आरक्षित भूखंडांचं तर अनधिकृत डंपिंग ग्राऊंड करण्यात येत आहे. याबाबत माहुलच्या कोळी बांधवांनी अनेकवेळा तक्रार करुनही प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















