एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : शेतकऱ्याला कर्जमुक्ती हवी, माफी नको; सरकारवर ठाकरेंचा घणाघात
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि पीक नुकसानीच्या पंचनाम्यांवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'माफी गुन्हेगाराला करतात, शेतकऱ्याला कर्जमुक्ती पाहिजे', असे खडे बोल सुनावत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्या कृषीमंत्री कोण आहेत, हेच लोकांना माहीत नाही, अशी टीका करत त्यांनी प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवले. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनी पूर्ववत व्हायला दोन ते तीन वर्षे लागतील, पण सरकार पंचनामे कसे करणार, कारण शेतकरी पुढच्या पेरणीला लागला आहे, असा सवाल त्यांनी केला. 'MNREGA' मधून साडेतीन लाख रुपये कसे देणार, हा सर्व बोगस कारभार आहे, असे म्हणत त्यांनी सरकारच्या मदतीच्या घोषणेवर टीका केली. जोपर्यंत शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत सरकारला जाब विचारला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















