एक्स्प्लोर

Majha Vision 2021 : 6 महिन्यांत पूर्णपणे इथेनॉलवर चालणारं फ्लेक्स इंजिन : Nitin Gadkari

#NitinGadkari #MajhaMaharashtraMajhaVision #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन

Majha Maharashtra Majha Vision 2021 : देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते अनेक देशभक्तांच्या बलिदानातून मिळालं. हा इतिहास रक्त्याच्या थारोळातून, घामाच्या, बलिदानाच्या आणि परिश्रमाच्या थेंबातून लिहिला गेला आहे. त्यामुळे त्याची जाणीव ठेवत त्यांना अभिवादन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे, असं आपलं व्हिजन मांडताना नितीन गडकरी म्हणाले. तसेच राज्यातील कळीचा मुद्दा आहे पाणी. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, कोकणातील, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी भाग याठिकाणी आपल्याला सिंचनाच्या सुविधा वाढवाव्या लागतील, असं केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.

"देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते अनेक देशभक्तांच्या बलिदानातून मिळालं. हा इतिहास रक्त्याच्या थारोळातून, घामाच्या, बलिदानाच्या आणि परिश्रमाच्या थेंबातून लिहिला गेला आहे. त्यामुळे त्याची जाणीव ठेवत त्यांना अभिवादन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपण पंच्याहत्तरीत पदार्पण करत आहोत. आपल्याला आत्मनिर्बर भारत बनवायचाय, असं आपलं सर्वांचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याकरता सुखी, संपन्न, समृद्ध महाराष्ट्र व्हावा, हिदेखील आपल्या सर्वांच्या मनातील भावना आहे. देशाचा विकास करायचा असेल, तर गरीबी दूर झाली पाहिजे, गरिबी दूर करण्यासाठी रोजगार निर्माण करणं आवश्यक आहे. तसेच रोजगात निर्माण करण्यासाठी शेती आणि उद्योग क्षेत्राची प्रगती आणि विकास केला पाहिजे.", असं नितीन गडकरी म्हणाले. "महाराष्ट्र हे निर्यातीमध्ये आघाडीवर असणारं राज्य आहे. त्यामुळे निर्यात वाढून जास्तीत जास्त इनकम महाराष्ट्राला मिळावं यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे राज्यात आर्थिक समृद्धी येईल.", असंही ते म्हणाले. 

"राज्यातील कळीचा मुद्दा आहे पाणी. मी जलसंपदा मंत्री होतो, त्यावेळी मी 40 हजार कोटी महाराष्ट्राला दिले. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, कोकणातील, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी भाग याठिकाणी आपल्याला सिंचनाच्या सुविधा वाढवाव्या लागतील. आज राज्यात सिंचनाचं प्रमाण 22 टक्क्यांवर आहे. पण आपल्याला जलसंवर्धनाच्या मार्गातून आणि त्याचबरोबर सिंचन प्रकल्प वाढवून राज्यातील सिंचनाचं प्रमाण 50 टक्क्यांच्या वर नेणं गरजेचं आहे. हे केल्याशिवाय ग्रामीण महाराष्ट्र सुखी-समृद्ध होणार नाही.", असंही ते म्हणाले. 

"समृद्धी महामार्गाच्या बाजूनं मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर 25 ते 30 लाखांची नवी पाच शहरं विकसित करण्याची आवश्यकता आहे. या शहरांना रेल्वे स्थानक, विमानतळं निर्माण करण्याची गरज आहे. त्याकरता अनेक चांगल्या जागा आणि लोकेशन्स आहेत. कारण आपल्याला आवडो किंवा न आवडो हळूहळू शहरीकरण होत आहे. त्यामुळे जागा उपलब्ध नाही, यामुळे अनेक नव्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्याच्या विकासाऐवजी इतर जे टू-टायर सिटी आहेत, त्याचा विकास करणं गरजेचं आहे.", असं नितीन गडकरी म्हणाले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकले
Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकले

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget