एक्स्प्लोर

शिवसेनेनं बोलायला प्रवृत्त करु नये अन्यथा गोष्टी बाहेर येतील : Narayan Rane PC UNCUT : ABP Majha

माझी मुलं ही शिकलेली आहेत, हुशार आहेत, त्यांच्यावर माझं नियंत्रण आहे. माझ्या मुलांवर टीका करणाऱ्यांनी आपल्या मुलांनी काय पराक्रम करुन ठेवलाय ते पहिला पहावं असा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर पलटवार केला. संजय राऊतांनी आपल्याला बोलायला प्रवृत्त करु नये अन्यथा मोठ्या गोष्टी बाहेर येतील असा इशाराही त्यांनी दिला. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, "माझ्या मुलांवर माझं नियंत्रण असून त्यांच्या हातून कोणतीही वाईट गोष्ट घडणार नाही. त्या आधी आपल्या मुलांनी काय पराक्रम करुन ठेवलाय ते पहावं. ते कोणाला भेटतात, काय करतात, कोणत्या केसेसमध्ये त्यांची नावं आहेत याची चौकशी करावी. शिवसेनेने वैयक्तिक टीका बंद केली नाही तर मीही प्रहार करणार. कोणाचा मुलगा कोणत्या केस मध्ये आहे आहे हे बाहेर काढणार."

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील जनआशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी कणकवली येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेवर आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, "संजय राऊतांनी आपलं संदुक बाहेर काढावं, त्यांना कोण विचारतयं. आपल्या निराशेपोटी ते असं बोलत आहेत. ते शिवसेनेची वाट लावण्यासाठीच बोलतात. संजय राऊतांच्यामुळेच शिवसेनेची वाट लागली."

लसीकरणासाठी टेंडर काढण्यात आलं आणि 12 टक्के कमिशन द्या अशी मागणी राज्य सरकारने केली असल्याचा आरोप राणेंनी केली. या सगळ्या गोष्टींची चौकशी केंद्र सरकारकडून करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. 

शिवसेना घडायला माझाही हातभार
शिवसेना घडायला आपलाही हातभार असल्याचं नारायण राणेंनी सांगितलं. ते म्हणाले की, ज्यावेळी बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता त्यावेळी त्यांनी मला फोन केला. मी त्यांच्याोसोबत सावलीसारखं राहिलो. मिळेत ते खाऊन रात्री काढल्या. मातोश्री बाहेर रात्रभर पहारा देत बसायचो. 

महाराष्ट्राशी दुजाभाव नाही
महाराष्ट्रातील कोणतेही काम असो, मी कोणताही भेदभाव न करता न्याय देणार. राज्यातील कोणतीही कामं ही अडथळ्यांविना करणार. कोकणवासियांनी आणि राज्यातील नागरिकांनी उद्योजक बनावं. त्यांना लागेत ती मदत मी करायला तरार असल्याचं नारायण राणे म्हणाले. 

अजित पवार अज्ञानी
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, "अजित पवार हे अज्ञानी आहेत. त्यांनी पहिला आपल्या खात्याकडे पहावं. एका रात्रीतून आपल्यावरील केस कशा कमी करायच्या हे अजित पवारांकडून शिकावं."

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या महाड येथील जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं होतं. मंगळवारी नारायण राणेच्या अटकेनं आणि रात्री उशीराने मिळालेल्या जामिनाने राजकारणाचा नुसता धुरळा उडाला होता. त्यानंतरही राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. ते अजूनही शमण्याची चिन्ह नाहीत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top 10, 15 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 15 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget