एक्स्प्लोर
Jain Monk Politics: 'कबूतर के चक्कर में Mahayuti सरकार जाएगी', जैन मुनींचा थेट इशारा
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन मुनींनी आता थेट राजकारणात प्रवेश केला असून, 'शांतीदूत जनकल्याण पक्षा'ची स्थापना केली आहे. जैन मुनींनी मारवाडी आणि गुजराती समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. 'गांधींच्या नादात काँग्रेस गेली, कोंबडीच्या नादात शिवसेना, आता कबूतरांच्या नादात महायुती सरकार जाईल', असा थेट इशारा जैन मुनींनी दिला आहे. मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे अनेक कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावा करत, त्यांच्या आत्मशांतीसाठी आयोजित सभेत ही राजकीय घोषणा करण्यात आली. आगामी पालिका निवडणुकीत हा पक्ष उमेदवार उभे करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
पुणे
क्राईम
Advertisement
Advertisement

















