एक्स्प्लोर
Bhaskar Jadhav Allegations | अटकेसाठी दबाव, Brahmin समाजावर गंभीर आरोप
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी मुंबईतील शिवसेना भवनात गुहागरमधील मुंबईवासियांच्या मेळाव्यात बोलताना अनेक गौप्यस्फोट केले. २०२४ च्या निवडणुकीत प्रचारावेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव आणला होता, असा आरोप त्यांनी केला. ब्राह्मण समाजावरही त्यांनी टीका केली. ब्राह्मण समाज पाताळयंत्री असून समाजात तेढ निर्माण करणारा अनाजी पंच आहे, असे भास्कर जाधव म्हणाले. त्यांनी "सावध व्हा, हा शेवटचा वार आहे मी बाजूला झालो तर तुम्हाला दिऊन टाकतील," असा इशारा दिला. त्यांच्या अटकेसाठी एसपींवर दबाव आणला जात होता, मात्र पुरावा नसल्याने एसपींनी अटक करण्यास नकार दिला, असेही त्यांनी सांगितले. तसेच, वीस गावांचा दस्तभरडा करत असल्याचे आणि इनाम मिळालेली गावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion















