एक्स्प्लोर
Voter List Scam: 'मतचोरी'च्या आरोपांवरून काँग्रेस आक्रमक, पुरावे सादर करत BJP ला मोर्चात सामील होण्याचे आव्हान
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले आहेत. 'बीजेपीचा पिटू झालेला आहे इलेक्शन कमिशन आणि बीजेपी काहीही काम दाखवू न शकल्यामुळे निवडणूक आयोगाच्या मदतीनं निवडणुका जिंकत आहे,' असा थेट हल्ला लोंढे यांनी चढवला आहे. महाराष्ट्रातील राजुरा (Rajura) मतदारसंघाचा दाखला देत, तिथे ११,६६७ बनावट मतदार नोंदवले गेले आणि तक्रारीनंतर केवळ ६,८५३ नावे हटवण्यात आली, असा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करूनही ११ महिन्यांत कोणतीही कारवाई केली नाही, असेही ते म्हणाले. सोलापूरमध्ये (Solapur) मतदार पत्त्यावर सापडत नसल्याचा आणि कर्नाटकातील आळंदमध्येही (Aland) गैरप्रकार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. या 'मतचोरी' विरोधातील मोर्चात भाजपनेही सामील होऊन लोकशाहीवरील आपली निष्ठा सिद्ध करावी, असे आव्हान लोंढे यांनी दिले आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























