एक्स्प्लोर

Vote Counting Process In India: EVM ची मतमोजणी कशी होते? आतापर्यंत कोणीच न सांगितलेली माहिती

देशात येत्या चार जूनला 18 व्या लोकसभा निवडणुकीचं निकाल जाहीर होणारये. देशात एकूण सात टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. मतदान करण्यासाठी आपण Evm चा वापर केलाय. पण मतदानाची मोजणी कशी होती तुम्हाला माहितीये का? 

तर आजच्या या विडिओतून आपण मतदानाची मोजणी कधी केली जाते याची A to Z माहिती जाणून घेणार आहोत. 

 

देशात EVM वरून विरोधक नेहमी आक्रमक होताना पाहायला मिळतात. जर अमेरिका सारख्या देशामध्ये EVM हॅक होऊ शकतो तर भारतात का नाही? असा सवाल त्यांचा आहे. त्यामुळे EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. अशी त्यांची मागणी आहे. पण EVM हे सुरक्षित मशीन आहे असं निवडणूक आयोग सांगत आलाय.


EVM म्हणजे काय? 

Electric voter machine म्हणजेच त्याला आपण EVM म्हणतो. EVM चा प्रस्ताव सर्वात आधी १९७७ मध्ये मांडण्यात आला. त्यानंतर १९७९ मध्ये पहिल्यांदा EVM तयार करण्यात आले. त्यानंतर हळू हळू संपूर्ण देशात EVM वर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. देशात दोन ठिकाणी EVM मशीन तयार केले जातात. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन्ही कंपन्या भारत सरकारच्या मालकीचे आहेत. 

मतमोजणी कशी होते? 

मतदान झाल्यानंतर EVM ला सील मारून त्याला एका स्टोअर रूममध्ये ठेवण्यात येते. त्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय दलाचे जवान चोवीस तास तैनात असतात. 

जेव्हा निकालाचा दिवस असतो तेव्हा ती मशीन स्टोअर रूममधून बाहेर काढण्यात येते. मतमोजणी करत असताना एका वेळी फक्त 14 EVM मशीनचीच मोजणी केली जाते. त्यासाठी 14 टेबलची व्यवस्था करण्यात येते. 

प्रत्येक टेबलवर एक निवडणूक अधिकारी, उमेदवार आणि त्या त्या पक्षाचा एक सदस्य असतो. मतमोजणी सुरू असताना तो या संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवतो. उमेदवाराने EVM हात लावू नये यासाठी एक बरिकेट्स मध्ये ठेवण्यात येतो.


सर्वात आधी पोस्टल मतांची होते मोजणी?

सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होते. त्यानंतर अर्ध्या तासाने EVM मतांची मोजणी होते. EVM सुरू करण्याआधी त्याच्या सीलची तपासणी केले जाते. EVM सोबत कोणतीही छेडछाड तर झाली नाही ना? याची तपासणी मतमोजणी अधिकारी करून घेतो. त्यानंतरच मतमोजणीसाठी ते मशीन सुरू करण्यात येते. 

त्यांनतर रिझल्ट बटन दाबलं जात. कोणत्या उमेदवाराला किती मते पडली याची आकडेवारी समोर येते. 
त्यांनतर ही आकडेवारी फॉर्म क्रमांक 17C मध्ये नोंदवली जाते. त्यावर जो कोणी उमेदवाराच्या बाजूने मतमोजणीसाठी उपस्थित आहे त्याची सही घेण्यात येते. त्यानंतर त्या फॉर्मला रिटर्निंग ऑफिसर्सकडे पाठवण्यात येतं. 

आलेल्या निकालाला एका ब्लॅक अँड व्हाईट बोर्डवरती लिहण्यात येतं. प्रत्येक फेरीत होणाऱ्या मतमोजणीची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला सांगण्यात येते. ही प्रक्रिया जोपर्यंत मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत चालत राहते. 

शेवटी ज्या उमेदवाराला जास्त मते मिळाली अशा उमेदवाराला विजयाचं प्रमाणपत्र देऊन निवडणूक अधिकारी त्याला विजय घोषित करतात...

या निवडणुकीत EVM हटाओ देश बचाओ चा नारा विरोधकांकडून देण्यात आला होता. कारण ज्या उमेदवाराचा पराभव होतो त्याला असं वाटतं की EVM मुळे आपला पराभव झाला. त्यामुळे प्रत्येक निवणुकीत EVM चा मुद्दा हा समोर येत असतो..  

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget