एक्स्प्लोर
Zero Hour Sarita Kaushik : शिंदेंच्या ठाण्यात दोस्तीत कुस्ती? एबीपी माझाची संपादकीय भूमिका काय?
महाराष्ट्रातील युती-आघाडीच्या राजकारणामुळे (Alliance Politics) निर्माण झालेला संभ्रम आणि जागावाटपासाठी (Seat Sharing) वापरण्यात येणारे दबाव तंत्र यावर 'एबीपी माझा'च्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक (Sarita Kaushik) यांनी भाष्य केले आहे. सरिता कौशिक यांनी मतदारांच्या मनातील संभ्रम मांडताना थेट सवाल केला की, 'गुंड पुंड नेते कार्यकर्त्यांचे आजवर आश्रयस्थान राहिलेले, काल नाही तर आज आश्रयस्थान असलेल्या पक्षांना मतदान करायचे का?'. त्यांनी स्पष्ट केले की निवडणुकीत मित्रपक्ष ही संकल्पना खोटी असून, प्रत्येक पक्ष स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी लढतो. स्वबळाचे नारे हे केवळ जागावाटपात दबाव आणण्यासाठी वापरले जातात. मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीचे उदाहरण देत, २०१२ मध्ये युतीत ११० जागा तर २०१७ मध्ये स्वतंत्र लढून शिवसेना-भाजपला (Shivsena-BJP) एकूण १६६ जागा मिळाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पक्षाचे नाव आणि चिन्ह यावरून न्यायालयात लढाई सुरू असताना आणि बोगस मतदानाच्या (Bogus Voting) शक्यतेमुळे मतदारासाठी योग्य उमेदवार निवडणे हेच सर्वात कठीण काम आहे, असे मत त्यांनी मांडले.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Advertisement
Advertisement




























