Sanjay Raut On Thackeray Alliance : युती असो की आघाडी, राऊत बनाए जोडी Special Report
Sanjay Raut On Thackeray Alliance : युती असो की आघाडी, राऊत बनाए जोडी Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तर राजकारणामध्ये खुर्चीला किती महत्त्व असतं हे प्रत्येकालाच माहिती आहे. एका खुर्चीसाठी अनेक जण लढत असतात आणि खुर्चीवर बसलेल्याला खाली खेचण्यासाठी सुद्धा डावपे सुरू असतात. मात्र काही खुर्च्या अशा असतात ज्या काही खास कारणांसाठी राखून ठेवण्यात येतात. अशीच एक खुर्ची आज राखी होती कोणासाठी होती ही खुर्ची या खुर्चीची खासियत काय होती आणि या खुर्चीचा प्रवास कसा होता जाणून घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्ट मधून ठाकरे बंधू दोन मात्र खुरच्या तीन हे चित्र होतं मुंबईतील वरळीच्या ब्लू सी हॉटेल मधल अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा असणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद सुरू होणार होती माध्यमांचे कॅमेरे सज्ज होते प्रेस कॉन्फरन्सची रूम पत्रकारांनी आणि काही निवडक कार्यकर्त्यांच्या गर्दीन खचाखच भरली होती. आणि सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या समोर मांडलेल्या खुर्च्यांकडे. गेल्या काही दिवसातला दोन्ही पक्षांचा प्रवास माहीत असणाऱ्यांना तिसऱ्या खुर्चीच महत्त्व आधीपासूनच माहित होतं. कारण उजवीकडच्या दोन खुर्च्या एकमेकां शेजारी लागण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या व्यक्तीसाठी ही तिसरी खुर्ची ठेवण्यात आली होती आणि अखेर तो क्षण आला. ठाकरे बंधूंची व्यासपीठावर एंट्री झाली. कॅमेरे आधीपासूनच रोल होते. कॅमेऱ्यांचे फ्लॅश पडायला सुरुवात झाली. ठाकरे बंधू व्यासपीठावर आले. पण आल्या आल्या ते खुर्च्यांवर बसले नाहीत. ते वाट बघत होते तिसऱ्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीची. पुढच्याच क्षणी ती तिसरी व्यक्ती आली आणि तीन खुर्च्यांच औचित्य पूर्ण झालं. खासदार संजय राऊतांना राज ठाकरेंनी हातान खून करत तिसऱ्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि सुरू झाली ऐतिहासिक पत्रकार परिषद अर्थात या पत्रकार परिषदेची सुरुवातही तिसऱ्या खुर्चीनेच केली. >> आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. सकाळी मी कोणालातरी सांगितलं की आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जो संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रामध्ये आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता. आणि आज पुन्हा एकदा हा मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे आपल्यासमोर आलेले आहेत. पत्रकार परिषद संपल्यानंतरचा प्रसंग तर संजय रावतांच महत्त्व अधिकच अधुरेखित करणारा ठरला. दोन्ही ठाकरेंच्या उजव्या हाताला बसलेल्या संजय रावतांना राज ठाकरेंनी दोघांच्या मधोमध उभं केलं त्यानंतर ठाकरेंच्या संपूर्ण कुटुंबासह व्यासपीठावर दिसलं असं चित्र केवळ उद्धव आणि राज यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण ठाकरे कुटुंबासाठी राऊतांच स्थान काय आहे या प्रश्नाचं उत्तर शब्दांऐवजी या दृश्यांनीच दिलं. अर्थात संजय रावतांना हे स्थान काही एका दिवसात मिळालेलं नाहीये 5 जुलैच्या मराठी विजय मेळाव्याची वातावरण निर्मिती करण्यात संजय रावतांनी पुढाकार घेतला होता त्यानंतर 27 जुलैला राज ठाकंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या त्या भेटीमागेही संजय रावतांची शिष्टाई होती दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाचे सूत्रधार म्हणून संजय रावतांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे ठाकरेंच्या मनोमिलनाचे सूत्रधार दोन्ही नेत्यांमध्ये संवादाचा पूल उभा करणं ठाकरे ब्राँड बाबत सातत्याने वातावरण निर्मिती करणं युती होण्याच्या प्रक्रियेबाबत माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये सातत्याने भूमिका मांडण जागा वाटपा बाबत राज ठाकरे आणि मनसे सोबत वाटाघाटी करण अशी चौफेर भूमिका बजावणारे संजय राऊत हे दोन ठाकरें मधला दुवा ठरले 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या च्या स्थापनेतही संजय राऊतांचा मोठा वाटा होता. विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना महाविकास आघाडीच्या छताखाली आणण्यासाठी संजय राऊतांनी मातोश्री आणि सिल्वर ओकचे उंबरठे चांगलेच झिजवले होते. नुकत्याच एका गंभीर आजाराचा सामना करून परतलेल्या संजय राऊतांसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा हा राजकीय कारकिर्दीतला एक मोठा महिलाचा दगट ठरलाय. आता एका खुर्ची एवजी दोन खुर्च्यांची भूमिका मांडताना या तिसऱ्या खुर्चीची लेखणी आणि जीभ अधिक धारदार होणार यात शंकाच नाही.
All Shows

































