Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आदर्श आचारसंहितेचं पालन करणं प्रत्येक राजकीय पक्षाला आणि नेत्याला बंधनकारक असतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षानं दाखल केलीय. त्यानंतर विरोधकांनी मोदींसह भाजपवर आगपाखड करायला सुरुवात केलीय. त्यामुळं घटनादुरुस्ती विधेयक हाणून पाडणाऱ्या विरोधकांवर भाजपची टीका आणि आचारसंहितेचा भंग केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांची टीका असा आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सध्या देशभर सुरु झालाय. याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
भाकपकडून पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
देशाला संबोधित करताना आचारसंहिता भंग केल्याचा आरोप
विरोधकांची मोदी सरकारवर जोरदार टीका
निवडणूक आयुक्त काय करतायत? संजय राऊतांचा सवाल
प्रसारणाचा खर्च भाजपकडून वसूल करण्याची विरोधकांची मागणी
भाजप आणि विरोधकांचे एकमेकांवर जोरदार आरोप
पश्चिम बंगाल, तमिळनाडूच्या मतदानावर काय होणार परिणाम?
आचारसंहितेचा भंग की राजकारणाचा रंग?
All Shows































