Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report
पेट्रोल, डिझेल, इंधन टंचाई, इंधनाचे वाढलेले दर, पेट्रोल पंपावरच्या रांगा... या सगळ्याची गेल्या काही दिवसात राज्यभरात चर्चा आहे. इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र असं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र देशात पुरेसा इंधनसाठा असल्याचं विधान केलं. तर सरकारमधील काही मंत्र्यांनी इंधनटंचाईला साठेबाजी जबाबदार असल्याचं म्हटलंय.... पाहूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट....3
हिंगोलीत गेल्या काही दिवसांपासून
डिझेलचा तीव्र तुटवडा आहे....
याचा मोठा फटका ट्रॅक्टर चालकांना बसतोय...
बुलढाण्यात तर सलग सातव्या दिवशी
इंधन टंचाईच्या झळा सोसाव्या लागतायत
इथे अद्यापही निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही....
प्रशासनानं मात्र या सगळ्याचं खापर इंधनाच्या साठेबाजीवर फोडलंय...
परभणीतही सलग चौथ्या दिवशी
डिझेल टंचाईमुळे नागरिक हैराण झालेयत
जवळपास २ किलोमीटर वाहनांच्या रांगा
आणि कॅन घेऊन वाट पाहणारे नागरिक
हे चित्र चौथ्या दिवशीही दिसलं....
All Shows































