Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसनं माघार घेतली अन् १० जणांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला... त्यानंतर काँग्रेसनं केलेल्या एका आगळ्या विक्रमाची आज राजकीय वर्तुळात चर्चा होती... हा विक्रम होता माघार घेण्याची हॅट ट्रिक... सलग तिसऱ्यांदा माघार घेतल्यावर काँग्रेसला ट्रोल केलं जात असताना पक्षाचे नेते मात्र आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करतायत...
एकट्या एप्रिल महिन्यात एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तिनदा माघार घेण्याची वेळ काँग्रेसवर आलीये...
बिनविरोध झालेल्या राज्यसभा निवडणुकीत सुरुवातीला शरद पवार यांच्या नावाला काँग्रेसनं विरोध केला...
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि काँग्रेसच्या मनात धाकधुक होती...
अखेर स्वतः शरद पवारांनी दिल्लीत मल्लिकार्जून खरगे यांच्याशी संपर्क साधला...
पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर प्रदेश काँग्रेसनं आपली तलवार म्यान केली...
त्यानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला...
All Shows































