Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
हायटेक वंदे भारत रूळावर धावताना पाहून आपल्या रेल्वेनं कात टाकलीय असं अनेकजण अभिमानानं म्हणतात... हायड्रोजनवर धावणारी ट्रेन पाहून भारतीय रेल्वेचा अभिमान वाटतो...मात्र हाच अभिमान कॅगच्या एका अहवालामुळे दुषित पाण्यात विरघळून गेलाय.. असं काय आहे त्या कॅगच्या अहवालात.. पाहुयात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस..
मात्र पूर्ण नाव उच्चारण्याचा कंटाळा करणाऱ्यांसाठी, सीएसएमटी...
दररोज १२ लाख प्रवाशांची ये-जा असणाऱ्या
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरचा हा वॉटर कुलर
या वॉटर कुलरचं पाणी पिऊन तहान भागवणारे प्रवासी आजाराला आमंत्रण तर देत नाहीएत ना?
हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे, कॅगचा रिपोर्ट...
कॅगच्या अहवालानुसार,
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच्या वॉटर कुलरच्या पाण्यात,
अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरणारा ई-कोलाय जिवाणू आढळलाय..
खरं तर एवढी गंभीर बाब...
मात्र प्रशासन उदासीन आहे आणि प्रवासी अनभिज्ञ...
ई-कोलायमुळे संभाव्य आरोग्यधोके -
ई-कोलायच्या काही प्रकारांमुळे अतिसार आणि अन्नविषबाधा होऊ शकते.
पोटदुखी, उलट्या, मळमळ आणि पोटात कळा येऊ शकतात.
काही संसर्गांमध्ये रक्तमिश्रित जुलाब आणि ताप येऊ शकतो.
गंभीर संसर्गात डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो.
काही गंभीर प्रकारांमध्ये मूत्रपिंडांवरही परिणाम होऊ शकतो.
All Shows































