एक्स्प्लोर

Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे

Raj Thackeray and Uddhav Thackeray interview BMC Election 2026: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या 'दैनिक सामना'तील मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray interview BMC Election 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासकट बहुतांश राज्यकर्ते हे मुंबईतील नाहीत, ते मुंबईच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईकरांचे प्रश्न त्यांना कळू शकत नाहीत, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election 2026) मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज ठाकरे यांनी मुंबईकरांना विचार करायला लावणारा हा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे डेथ वॉरंट काढण्यात आले आहे. मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं (Marathi Manoos) डेथ वॉरंट काढलं जातंय, असे राज ठाकरे यांनी म्हटले. 'दैनिक सामना'च्या माध्यमातून संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी 'मूळ मुंबईकर' ही संकल्पना मांडत मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. 

देवेंद्र फडणवीस नागपूरचे. बाकीचेही सगळे बाहेरचे. एक उदाहरण म्हणून सांगतो. मी एकदा स्वीडनला गेलो होतो. तिथे मी तो देश पाहत होतो. गाड्या फिरतात, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे. सगळं सगळं व्यवस्थित छान. हे सगळं पाहताना माझ्या मनात पहिला प्रश्न आला की, इथला विरोधी पक्ष काय करतो? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर काय सांगत असेल, की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन… या कल्पनेच्या बाहेर होतो मी. मुंबईत मुंबईकरांना काय पाहिजे, हे मला असं वाटतं की तुम्हाला तिथं जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेरून येऊन जेव्हा तुम्ही एखादा देश बघता, शहर बघता ना, तुम्हाला समजणारच नाहीत की तिथले प्रश्न काय आहेत ते. उदाहरणार्थ समजा, तुमचा गृहनिर्माण मंत्री किंवा पीडब्ल्यूडी मिनिस्टर किंवा अजून कोणीतरी हे जेव्हा बाहेरचे असतात, ते जेव्हा मुंबईत येतात, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की, साला प्रॉब्लेम काय आहे या शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कम्पॅरिजन करतो त्याच्या रस्त्यांशी, त्याच्या लोड लोडिंगशी, त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तुमची मानसिकता कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Thane Mahanagarpalika Election 2026: उत्तर भारतातून महाराष्ट्रात रोज 56 ट्रेन येतात, 

महाराष्ट्रातील स्थिती आज गंभीर झालीय. जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येतात, तेवढे आधी येत नव्हते. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर उत्तरेतून जवळपास रोज 56 ट्रेन महाराष्ट्रात येतात. भरून येतात आणि रिकाम्या जातात. ठाणे जिल्हा पहा. हा जगातला एकमेव असा जिल्हा आहे, जिथे 8 ते 9 महानगरपालिका आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, यांचा डोलारा फक्त मोदींवर अवलंबून आहे! भिवंडी, त्यात पालघर जिल्हा वेगळा पकडू नका. वसई-विरार, मीरा-भाईंदर… म्हणजे जवळपास 8 ते 9  महापालिका आहेत. याची सुरुवात होते ग्रामपंचायत, पंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका… लोकसंख्येनुसार हे स्वरूप बदलत जाते. आज मुंबईत एक महानगरपालिका आहे, पुण्यात दोन आहेत. ठाणे जिल्ह्यात 8 ते 9  महानगरपालिका. याचं कारण काय? याचं कारण बाहेरून येणाऱ्यांचं वाढलेलं प्रमाण. तेच प्रमाण मुंबईत वाढतंय, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

आणखी वाचा

ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावर ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावर ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकार हाताळतंय असं वाटतं का? ABP Majha
Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Embed widget