एक्स्प्लोर

दक्षिण आफ्रिकेच्या वेगाला विराट ब्रिगेड कसं उत्तर देणार?

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं हे विश्वचषकाची मोहीम फत्ते करण्याइतकंच मोठं आहे.

मुंबई : मॉर्ने मॉर्कल... वरनॉन फिलॅण्डर... कागिसो रबादा... अँडिल फेलुकवायो... ख्रिस मॉरिस... आणि डेल स्टेन... हा आहे दक्षिण आफ्रिकेचा तोफखाना. एकदोन नाही, तर तब्बल अर्धा डझन तोफा चौदाजणांच्या दक्षिण आफ्रिकी फौजेच्या दिमतीला आहेत. त्यातली एखादी तोफ जरी निकामी ठरली, तरी दुसरी तोफ ही पहिलीपेक्षा दुपटीने आग ओकणारी आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजीची तटबंदी कितीही भक्कम असली तरी दक्षिण आफ्रिकेतल्या वेगवान आणि बाऊन्सी रणमैदानांवर या तोफांची परिणामकारकता कमालीची आहे. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं हे विश्वचषकाची मोहीम फत्ते करण्याइतकंच मोठं आहे. विराट कोहलीची टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकी वातावरणात दक्षिण आफ्रिकी वादळाच्या त्याच आव्हानाला सामोरी जाणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिली लढाई उद्यापासून केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधली तीन कसोटी सामन्यांची मालिका ही दोन बलाढ्य फौजांमधल्या युद्धाइतकीच तुंबळपणे लढली जाईल. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांच्यातलं द्वंद्व हे या युद्धाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरावं. त्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाला वेगवान आक्रमणानेच उत्तर देण्याचा टीम इंडियाचा मनसुबा आहे. त्यासाठी भारतीय फौजेत भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, ईशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या अशा वेगवान अस्त्रांचा समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाला थोपवण्यासाठी आणि प्रसंगी त्यावर हल्ला चढवण्यासाठी भारतीय फौजेत शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रिद्धिमान साहा अशी फलंदाजांची फळी मौजूद आहे. विराट कोहलीची टीम इंडिया हा कदाचित दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झालेला भारताचा सर्वात बलाढ्य आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला संघ ठरावा. विराट सेनेचा अश्वमेध सलग नऊ कसोटी मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. टीम इंडियाने त्या नऊपैकी सहा कसोटी मालिका मायदेशात, दोन श्रीलंकेत, तर एक वेस्ट इंडिजमध्ये जिंकली आहे. पण भारतात, श्रीलंकेत किंवा विंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकणं वेगळं आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं यात फरक आहे. विराट कोहलीला त्याची नेमकी कल्पना आहे. भारतीय संघाला गेल्या पंचवीस वर्षांत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. किंबहुना भारताने दक्षिण आफ्रिकेत सहापैकी पाच कसोटी मालिकांमध्ये हार स्वीकारली आहे, तर केवळ एकमेव कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात भारताला यश आलं आहे. या सहा कसोटी मालिकांच्या कालावधीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकी भूमीवर सतरा कसोटी सामन्यांध्ये खेळला. त्यापैकी दोन कसोटी सामने भारतानं जिंकले आहेत. एक राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली आणि दुसरा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली. भारतीय क्रिकेटरसिकांना आताच्या दौऱ्यात विराट सेनेकडून केवळ एका कसोटी विजयाची नाही, तर पहिल्या कसोटी मालिका विजयाची अपेक्षा आहे. विराट सेनेने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ती किमया करून दाखवली, तर तो नवा इतिहास ठरेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
Harshvardhan Sadgir : जेव्हा शासकीय नोकरीची गरज होती पण मिळाली नाही,आज हिमतीनं डबल महाराष्ट्र केसरी बनलो, मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
मला संपल्यात जमा केलेलं, डबल महाराष्ट्र केसरी झालो, आनंदानं मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
Maharashtra Kesari Final :मोठी बातमी, हर्षवर्धन सदगीर बनला सातवा डबल महाराष्ट्र केसरी, अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड पराभूत
मोठी बातमी, हर्षवर्धन सदगीर बनला सातवा डबल महाराष्ट्र केसरी, अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड पराभूत
Australia : ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार,बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा दौरा करणार, 2026-27 चं वेळापत्रक जाहीर  
ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार,बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा दौरा करणार, 2026-27 चं वेळापत्रक जाहीर  

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget