एक्स्प्लोर

दक्षिण आफ्रिकेच्या वेगाला विराट ब्रिगेड कसं उत्तर देणार?

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं हे विश्वचषकाची मोहीम फत्ते करण्याइतकंच मोठं आहे.

मुंबई : मॉर्ने मॉर्कल... वरनॉन फिलॅण्डर... कागिसो रबादा... अँडिल फेलुकवायो... ख्रिस मॉरिस... आणि डेल स्टेन... हा आहे दक्षिण आफ्रिकेचा तोफखाना. एकदोन नाही, तर तब्बल अर्धा डझन तोफा चौदाजणांच्या दक्षिण आफ्रिकी फौजेच्या दिमतीला आहेत. त्यातली एखादी तोफ जरी निकामी ठरली, तरी दुसरी तोफ ही पहिलीपेक्षा दुपटीने आग ओकणारी आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजीची तटबंदी कितीही भक्कम असली तरी दक्षिण आफ्रिकेतल्या वेगवान आणि बाऊन्सी रणमैदानांवर या तोफांची परिणामकारकता कमालीची आहे. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं हे विश्वचषकाची मोहीम फत्ते करण्याइतकंच मोठं आहे. विराट कोहलीची टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकी वातावरणात दक्षिण आफ्रिकी वादळाच्या त्याच आव्हानाला सामोरी जाणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिली लढाई उद्यापासून केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधली तीन कसोटी सामन्यांची मालिका ही दोन बलाढ्य फौजांमधल्या युद्धाइतकीच तुंबळपणे लढली जाईल. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांच्यातलं द्वंद्व हे या युद्धाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरावं. त्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाला वेगवान आक्रमणानेच उत्तर देण्याचा टीम इंडियाचा मनसुबा आहे. त्यासाठी भारतीय फौजेत भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, ईशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या अशा वेगवान अस्त्रांचा समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाला थोपवण्यासाठी आणि प्रसंगी त्यावर हल्ला चढवण्यासाठी भारतीय फौजेत शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रिद्धिमान साहा अशी फलंदाजांची फळी मौजूद आहे. विराट कोहलीची टीम इंडिया हा कदाचित दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झालेला भारताचा सर्वात बलाढ्य आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला संघ ठरावा. विराट सेनेचा अश्वमेध सलग नऊ कसोटी मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. टीम इंडियाने त्या नऊपैकी सहा कसोटी मालिका मायदेशात, दोन श्रीलंकेत, तर एक वेस्ट इंडिजमध्ये जिंकली आहे. पण भारतात, श्रीलंकेत किंवा विंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकणं वेगळं आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं यात फरक आहे. विराट कोहलीला त्याची नेमकी कल्पना आहे. भारतीय संघाला गेल्या पंचवीस वर्षांत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. किंबहुना भारताने दक्षिण आफ्रिकेत सहापैकी पाच कसोटी मालिकांमध्ये हार स्वीकारली आहे, तर केवळ एकमेव कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात भारताला यश आलं आहे. या सहा कसोटी मालिकांच्या कालावधीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकी भूमीवर सतरा कसोटी सामन्यांध्ये खेळला. त्यापैकी दोन कसोटी सामने भारतानं जिंकले आहेत. एक राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली आणि दुसरा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली. भारतीय क्रिकेटरसिकांना आताच्या दौऱ्यात विराट सेनेकडून केवळ एका कसोटी विजयाची नाही, तर पहिल्या कसोटी मालिका विजयाची अपेक्षा आहे. विराट सेनेने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ती किमया करून दाखवली, तर तो नवा इतिहास ठरेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget