एक्स्प्लोर

दक्षिण आफ्रिकेच्या वेगाला विराट ब्रिगेड कसं उत्तर देणार?

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं हे विश्वचषकाची मोहीम फत्ते करण्याइतकंच मोठं आहे.

मुंबई : मॉर्ने मॉर्कल... वरनॉन फिलॅण्डर... कागिसो रबादा... अँडिल फेलुकवायो... ख्रिस मॉरिस... आणि डेल स्टेन... हा आहे दक्षिण आफ्रिकेचा तोफखाना. एकदोन नाही, तर तब्बल अर्धा डझन तोफा चौदाजणांच्या दक्षिण आफ्रिकी फौजेच्या दिमतीला आहेत. त्यातली एखादी तोफ जरी निकामी ठरली, तरी दुसरी तोफ ही पहिलीपेक्षा दुपटीने आग ओकणारी आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजीची तटबंदी कितीही भक्कम असली तरी दक्षिण आफ्रिकेतल्या वेगवान आणि बाऊन्सी रणमैदानांवर या तोफांची परिणामकारकता कमालीची आहे. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं हे विश्वचषकाची मोहीम फत्ते करण्याइतकंच मोठं आहे. विराट कोहलीची टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकी वातावरणात दक्षिण आफ्रिकी वादळाच्या त्याच आव्हानाला सामोरी जाणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिली लढाई उद्यापासून केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधली तीन कसोटी सामन्यांची मालिका ही दोन बलाढ्य फौजांमधल्या युद्धाइतकीच तुंबळपणे लढली जाईल. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांच्यातलं द्वंद्व हे या युद्धाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरावं. त्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाला वेगवान आक्रमणानेच उत्तर देण्याचा टीम इंडियाचा मनसुबा आहे. त्यासाठी भारतीय फौजेत भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, ईशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या अशा वेगवान अस्त्रांचा समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाला थोपवण्यासाठी आणि प्रसंगी त्यावर हल्ला चढवण्यासाठी भारतीय फौजेत शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रिद्धिमान साहा अशी फलंदाजांची फळी मौजूद आहे. विराट कोहलीची टीम इंडिया हा कदाचित दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झालेला भारताचा सर्वात बलाढ्य आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला संघ ठरावा. विराट सेनेचा अश्वमेध सलग नऊ कसोटी मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. टीम इंडियाने त्या नऊपैकी सहा कसोटी मालिका मायदेशात, दोन श्रीलंकेत, तर एक वेस्ट इंडिजमध्ये जिंकली आहे. पण भारतात, श्रीलंकेत किंवा विंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकणं वेगळं आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं यात फरक आहे. विराट कोहलीला त्याची नेमकी कल्पना आहे. भारतीय संघाला गेल्या पंचवीस वर्षांत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. किंबहुना भारताने दक्षिण आफ्रिकेत सहापैकी पाच कसोटी मालिकांमध्ये हार स्वीकारली आहे, तर केवळ एकमेव कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात भारताला यश आलं आहे. या सहा कसोटी मालिकांच्या कालावधीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकी भूमीवर सतरा कसोटी सामन्यांध्ये खेळला. त्यापैकी दोन कसोटी सामने भारतानं जिंकले आहेत. एक राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली आणि दुसरा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली. भारतीय क्रिकेटरसिकांना आताच्या दौऱ्यात विराट सेनेकडून केवळ एका कसोटी विजयाची नाही, तर पहिल्या कसोटी मालिका विजयाची अपेक्षा आहे. विराट सेनेने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ती किमया करून दाखवली, तर तो नवा इतिहास ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
Ajinkya Rahane : यशस्वी जयस्वालचं करिअर संकटात होतं, 4 सामन्यांच्या बंदीच्या कारवाईतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणेनं गुपित सांगितलं
यशस्वी जयस्वालला त्यावेळी वाईट वाटलं असेल, 4 सामन्यांच्या बंदीतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणे म्हणाला... 
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget